शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

आरोग्य पथक आजारी

By admin | Updated: May 7, 2016 02:34 IST

नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले आरोग्य पथकच आजारी आहे.

१५ गावांचा प्रश्न : डोंगरखर्डा येथे पाणी व लाईटचीही योग्य सोय नाहीनिश्चल गौर डोंगरखर्डानागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले आरोग्य पथकच आजारी आहे. औषध आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. गेली काही महिन्यांपासून निर्माण झालेला हा प्रश्न सोडविण्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कळंब तालुक्यात येत असलेल्या येथील आरोग्य केंद्राला परिसरातील जवळपास १५ गावे जोडण्यात आलेली आहे. सुमारे ३० हजार नागरिकांना आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सुविधा सुरुवातीला उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कालांतराने त्यामध्ये प्रचंड शिथिलता आली. दर्जेदार सेवा तर दूर आवश्यक तो औषधी साठाही याठिकाणी उपलब्ध नाही. शिवाय पाणी आणि विजेचा प्रश्नही याठिकाणी आहे. कामचलावू सेवा याठिकाणी दिली जात आहे. डोंगरखर्डा गावाला अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या पाण्यात मेडिक्लोअर टाकल्यास बऱ्याचअंशी शुद्ध पाणी उपलब्ध होते. मात्र ते आरोग्य पथकात उपलब्ध नाही. ओआरएसचासुद्धा तुटवडा आहे. मलेरिया वर्कर्सचे पद अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने ब्लिचिंग पावडर, पाणी नमुने घेतले जात नाही. या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रकृती आणखी बिघडू नये म्हणून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. गरीब कुटुंबांना मात्र हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.लाखो रुपये खर्च करून आरोग्य पथकाची इमारत उभी करण्यात आली. आता मात्र दुरुस्तीवर २३ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. २१ लाख रुपये खर्च करून धर्मशाळा बांधण्यात येत आहे. एकीकडे आरोग्य पथकात नागरिकांना योग्य सोयी उपलब्ध करून दिल्या जात नाही. मात्र दुसरीकडे अवास्तव खर्च केला जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. पथकाला आरोग्य केंद्राचा दर्जा द्यावा, ही नागरिकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु शासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या ठिकाणी दिसून येत आहे. येथे कर्मचाऱ्यांना निवासाची सोय उपलब्ध आहे. पण पथकात पाणी व लाईटची समस्या आहे. या समस्या दूर करून रिक्त असलेली पदे तत्काळ भरावी, अशी मागणी होत आहे.