शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: June 21, 2015 00:08 IST

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य सेवेची वाट लागली आहे. कर्मचाऱ्यांची काम टाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे.

पावसाळ्यात संकट : कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, ग्रामीण रूग्णालयच आजारीमारेगाव : गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य सेवेची वाट लागली आहे. कर्मचाऱ्यांची काम टाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. केवळ कागदोपत्री आरोग्य योजना राबविल्या जात असल्याचे अहवाल वरिष्ठांना पाठविले जातात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत आरोग्य यंत्रणेबाबत प्रचंड रोष दिसून येत आहे.सध्या तालुक्यात सर्वात ढेपाळलेला विभाग जर कोणता असेल, तर आरोग्य विभाग आहे. या विभागाचे कर्मचारी अक्षरश: जनतेच्या जिवाशी खेळत आहे. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीवच दिसून येत नाही. या विभागात प्रत्येक कर्मचाऱ्यांत कामचुकारपणा करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्याची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे आहे. पावसाळ्यात ग्रामीण आरोग्य बिघडते. साथीचे आजार फोफावतात. मात्र तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात जाऊन जनतेला मार्गदर्शन करते, असे चित्र कधीही पाहायला मिळत नाही. परिचारिका कधी गावात जात नाही. गावांना भेटीही देत नाही. बहुतांश परिचारिका मुख्यालयी राहणे तर सोडाच, त्या इतर तालुक्यातून अप-डाऊन करतात. कोण काय करते, कोणाचा थांगपत्ता कुणाला नाही. तालुक्यात मार्डी, वेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. नवरगाव येथे आयुर्वेदीक रूग्णालय, म्हैसदोडका व पेंढरी येथे फिरते रूग्णालय आहे. इतर ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. प्रत्येक गावासाठी आरोग्य सेविका आहे. मात्र या कर्मचाऱ्यांचा लाभ जनतेला होताना दिसत नाही. अनेक परीचारिका तर गावात जातच नाही. अंगणवाडी सेविकेशी भ्रमणध्वनीवरून माहिती घेऊन कागदी घोडे नाचवितात. केवळ टीएचओनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित राहणे, एवढाच त्यांचा उपक्रम सुरू आहे. तालुका आरोग्य अधिकारी अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची हिंमत वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अप-डाऊनचा आजार जडला आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यवतमाळ येथून अप-डाऊन करतात. रात्री कुणी आजारी पडले, तर डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यातून अनुचित घटना घडतात. साध्या-साध्या औषधांचा तुटवडा, ही तर नित्याचीच बाब झाली आहे. तालुका आरोग्य विभागाच्या कारभाराची ही अवस्था असताना येथील ग्रामीण रूग्णालयाचीही वाट लागली आहे. नुकतीच कुंभा-टाकळी येथे वीज कोसळली. रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र साध्या सलाईन लावायलासुद्धा तेथे औषधी नव्हत्या. रूग्ण व नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला, तर डॉक्टरच रूग्णांच्या नातेवाईकांशी हमरी-तुमरीवर उतरले. नागरिकांनी आमदारांच्या कानावर ही गोष्ट घातली. आमदारांनी रूग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे कळते. (शहर प्रतिनिधी)दवाखान्यावर वचक कोणाचा ?येथील ग्रामीण रूग्णालयावर वचक कोणाचा, हा गहन विषय आहे. नुकताच १८ जूनला एका आॅटोचा अपघात घडला. नऊ ते १० प्रवासी जखमी झाले. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांसोबत बघ्यांची गर्दी झाली. तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सफाई कर्मचाऱ्यांची धावपळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. रूग्णालयात आलेल्या नागरिकांना आणि स्थानिक पत्रकारांना त्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांसमोर ज्या भाषेत हाकलून लावले, त्यावरून ग्रामीण रूग्णालयावर वचक कुणाचा, असा प्रश्न उपस्थितांना पडला.उपकेंद्रातील औषधी जाते कुठे ?प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अनेक आजारांवरील औषधे रूग्णांना मोफत देण्यासाठी येतात. मात्र गाव पातळीवर जायला कुणीच तयार नसल्याने आणि ही औषधी अशीच पडून राहत असल्याने सर्वसहमतीने ही औषधे खुल्या बाजारात विकली जात असल्याची कुजबुज सुरू आहे. ग्रामीण जनताही या आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्रात जाण्याऐवजी उपस्थित खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. परिणामी केंद्रातील औषधी तशीच पडून राहाते. त्याचा विनियोग आरोग्य कर्मचारी परस्पर करून टाकतात.