शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

आरोग्य सैनिक निघाले तापाशी लढायला

By admin | Updated: November 4, 2014 22:47 IST

डेंग्यू, मलेरिया, चंडिपुरा, चिकन गुण्या, व्हायरल फिवर आदी प्रकारच्या तापाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सैनिक सज्ज झाले आहेत.

यवतमाळ : डेंग्यू, मलेरिया, चंडिपुरा, चिकन गुण्या, व्हायरल फिवर आदी प्रकारच्या तापाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सैनिक सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात या विभागाकडून ताप उद्रेक नियंत्रण धडक मोहीम राबविली जात आहे. गावोगावी मोहीम राबविली जात असल्याने या सैनिकांना ताप नियंत्रणात येईल, असा विश्वास आहे. गावातील उकिरडे, सांड पाण्याच्या तुंबलेल्या नाल्या, जागोजागी तयार झालेली गटारं यामुळे तापाचा उद्रेक वाढला आहे. पावसाळा संपून महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही ग्रामपंचायती किंवा आरोग्य विभागाने तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्याविषयी पावले उचलली नाही. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला. गावागावात विविध प्रकारच्या तापाचे रुग्ण वाढत आहे. यात डेंग्यूसदृश आजाराचेही रुग्ण आहेत. रुग्णांमुळे शासकीय आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहे. आता डासांवर नियंत्रण हाच एक प्रभावी उपाय असल्याने आरोग्य विभागाने गाव रोगराईमुक्त करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. यासाठी पथक निर्माण करण्यात आली. आरोग्य सैनिक गावोगावी जावून टेमीफॉसचा वापर, रक्त नमुने घेणे, नाले-गटारे साफ ठेवणे, घरोघरी स्वच्छता या बाबत जागृती करत आहेत. उकिरडे गावापासून दूर असावे असा सल्ला दिला जात आहे. कित्येक वर्षांपासून गावालगतचे उकिरडे दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना होत नाही. शिवाय आरोग्य विभागालाही याविषयी कुठलेही सोयरसुतक नव्हते. आता मात्र हा विभाग खडबडून जागा झाला आहे. गावागावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले जात आहे. (वार्ताहर)