शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आरोग्य, शिक्षणावर सर्वाधिक भर

By admin | Updated: January 12, 2017 00:49 IST

नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या

नगराध्यक्ष अर्चना मंगाम करणार शहराचा कायापालट नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी ‘लोकमत’शी चर्चा केली. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जाईल. शहराच्या काही भागामध्ये पथदिवे नाहीत. पुढील काही दिवसात प्रत्येक चौक आणि परिसर पथदिव्यांमुळे उजळून निघेल, असा विश्वास त्यांनी दिला. महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाईल. प्रत्येक चौकात महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उभारण्यात येईल. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होते. काहीप्रसंगी अपघातही होतात, त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त केला जाईल. नगरपरिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. शिक्षकाची पत्नी असल्याने ती आपली पहिली जबाबदारी असेल, असे त्या म्हणाल्या. पालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जाईल. सत्ताधारी, विरोधक आणि जनतेच्या सहकार्याने शहराचा विकास केला जाईल. प्रत्येक समस्या मार्गी लावून शहराचा कायापालट करण्यात येईल, असे नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य - उपाध्यक्ष राजीव वीरखेडे आर्णी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजीव वीरखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि अग्निशमन दलाचे वाहन शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून घेतले जाईल. शहरातील आठवडी बाजार आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला बसून व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. गरजूंना शासकीय नियमानुसार घरकूल देण्यात येईल. शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाईल. उद्यानाची निर्मिती करण्यात येईल. आवश्यक त्या ठिकाणी प्रसाधनगृह उभारले जाईल. पालिकेतील पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहर विकास साधला जाईल.