शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आरोग्य, शिक्षणावर सर्वाधिक भर

By admin | Updated: January 12, 2017 00:49 IST

नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या

नगराध्यक्ष अर्चना मंगाम करणार शहराचा कायापालट नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी ‘लोकमत’शी चर्चा केली. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जाईल. शहराच्या काही भागामध्ये पथदिवे नाहीत. पुढील काही दिवसात प्रत्येक चौक आणि परिसर पथदिव्यांमुळे उजळून निघेल, असा विश्वास त्यांनी दिला. महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाईल. प्रत्येक चौकात महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उभारण्यात येईल. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होते. काहीप्रसंगी अपघातही होतात, त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त केला जाईल. नगरपरिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. शिक्षकाची पत्नी असल्याने ती आपली पहिली जबाबदारी असेल, असे त्या म्हणाल्या. पालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जाईल. सत्ताधारी, विरोधक आणि जनतेच्या सहकार्याने शहराचा विकास केला जाईल. प्रत्येक समस्या मार्गी लावून शहराचा कायापालट करण्यात येईल, असे नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य - उपाध्यक्ष राजीव वीरखेडे आर्णी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजीव वीरखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि अग्निशमन दलाचे वाहन शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून घेतले जाईल. शहरातील आठवडी बाजार आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला बसून व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. गरजूंना शासकीय नियमानुसार घरकूल देण्यात येईल. शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाईल. उद्यानाची निर्मिती करण्यात येईल. आवश्यक त्या ठिकाणी प्रसाधनगृह उभारले जाईल. पालिकेतील पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहर विकास साधला जाईल.