शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डेंग्यूच्या शोधार्थ आरोग्य यंत्रणा घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:03 IST

गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देबालिकेचा मृत्यू : वणी शहरात डास अळीनाशक औषधांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. त्याअनुषंगाने आशा वर्कर, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी यांच्या मदतीने शहरातील संवेदनशील भागातील प्रत्येक घरी जाऊन त्याठिकाणी असलेल्या पाण्यात डास अळीनाशक औषध सोडले. असे असले तरी अद्याप डेंग्यूचे समूळ उच्चाटन झाले नाही.दरम्यान, डेंग्यूने वणी शहरात एका १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची बाब उजेडात आली आहे. खुशी राकेश बन्सोड असे डेंग्यूने मृत पावलेल्या बालिकेचे नाव असून ती शहरातील एसपीएम शाळेची विद्यार्थिनी होती. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. वणी शहरातील अनेक डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला घुग्गूस येथील नातलगांकडे ठेवण्यात आले. नातलगांनी तिच्यावर घुग्गूस येथील एका खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला १४ आॅक्टोबरला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वाटतेच तिचे निधन झाले. वणी शहरातील डेंग्यूची पहिली बळी ती ठरली.डेंग्यूला कारणीभूत ठरणारा डास हा स्वच्छ पाण्यात जन्म घेतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा नागरिकांनी ‘ड्राय डे’ पाळावा, ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी साचून आहे, ते पाणी नष्ट करावे, यातून डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या अनेक वर्षात वणी भागात डेंग्यूची अशी साथ कधीच पसरली नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागातही असे रूग्ण आढळून येत नव्हते. मात्र गेल्या एक महिन्यापासून डेंग्यूच्या रूग्णात सातत्याने वाढ होत असल्याने डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. वणीतील खासगी रूग्णालय तर रूग्णांनी तुडूंब भरलेले आहेत.तपासणी कीटचा पुरवठाच नाहीडेंग्यूचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी कीट अद्यापही वणी ग्रामीण रूग्णालय अथवा कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आली नाही. त्यामुळे रूग्णांना खासगी पॅथालॉजीमध्ये जाऊन रक्ताची तपासणी करावी लागत आहे. नेमका याचाच फायदा पॅथालॉजीधारक घेत असून शासनाने आकारून दिलेल्या दरापेक्षा अवाच्या सवा पैसे घेऊन रूग्णांची लूट करीत आहे. मात्र यावर आरोग्य यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू