शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

डेंग्यूच्या शोधार्थ आरोग्य यंत्रणा घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:03 IST

गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देबालिकेचा मृत्यू : वणी शहरात डास अळीनाशक औषधांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. त्याअनुषंगाने आशा वर्कर, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी यांच्या मदतीने शहरातील संवेदनशील भागातील प्रत्येक घरी जाऊन त्याठिकाणी असलेल्या पाण्यात डास अळीनाशक औषध सोडले. असे असले तरी अद्याप डेंग्यूचे समूळ उच्चाटन झाले नाही.दरम्यान, डेंग्यूने वणी शहरात एका १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची बाब उजेडात आली आहे. खुशी राकेश बन्सोड असे डेंग्यूने मृत पावलेल्या बालिकेचे नाव असून ती शहरातील एसपीएम शाळेची विद्यार्थिनी होती. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. वणी शहरातील अनेक डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला घुग्गूस येथील नातलगांकडे ठेवण्यात आले. नातलगांनी तिच्यावर घुग्गूस येथील एका खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला १४ आॅक्टोबरला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वाटतेच तिचे निधन झाले. वणी शहरातील डेंग्यूची पहिली बळी ती ठरली.डेंग्यूला कारणीभूत ठरणारा डास हा स्वच्छ पाण्यात जन्म घेतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा नागरिकांनी ‘ड्राय डे’ पाळावा, ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी साचून आहे, ते पाणी नष्ट करावे, यातून डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या अनेक वर्षात वणी भागात डेंग्यूची अशी साथ कधीच पसरली नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागातही असे रूग्ण आढळून येत नव्हते. मात्र गेल्या एक महिन्यापासून डेंग्यूच्या रूग्णात सातत्याने वाढ होत असल्याने डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. वणीतील खासगी रूग्णालय तर रूग्णांनी तुडूंब भरलेले आहेत.तपासणी कीटचा पुरवठाच नाहीडेंग्यूचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी कीट अद्यापही वणी ग्रामीण रूग्णालय अथवा कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आली नाही. त्यामुळे रूग्णांना खासगी पॅथालॉजीमध्ये जाऊन रक्ताची तपासणी करावी लागत आहे. नेमका याचाच फायदा पॅथालॉजीधारक घेत असून शासनाने आकारून दिलेल्या दरापेक्षा अवाच्या सवा पैसे घेऊन रूग्णांची लूट करीत आहे. मात्र यावर आरोग्य यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू