शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

नेरमधील ढाबे बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

By admin | Updated: June 2, 2015 00:13 IST

तालुक्याच्या प्रमुख मार्गावर असलेले ढाबे अवैध धंद्यांचे मोहरघर बनले आहे.

पोलिसांची मूकसंमती : आर्थिक व्यवहाराचा संशयनेर : तालुक्याच्या प्रमुख मार्गावर असलेले ढाबे अवैध धंद्यांचे मोहरघर बनले आहे. परवाण्याशिवाय याठिकाणी दारू विक्री केली जाते. शिवाय ढाबा बंद करण्यासाठी कुठलेही नियम पाळले जात नाही. या प्रकाराला पोलिसांचीच मूकसंमती तर नसावी, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कुठल्याही ढाब्यावर कारवाई होत नसल्याने या प्रश्नाला बळ मिळत आहे.तालुक्यातून जाणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख मार्गांवर ढाब्यांची गर्दी वाढली आहे. दिवसभर रिकामे दिसणारे ढाबे रात्री फुल्ल होतात. रात्री ९ वाजतानंतरची गर्दी अनेक प्रश्नांना जन्म देणारी आहे. शहर आणि परिसरातील काही लोकांची अशा ढाब्यांवर नेहमीच ऊठ-बस असते. शिवाय रात्री त्यांचा ठिय्या असतो. या ढाब्यांवर अवैधरीत्या दारूची विक्री करण्यासोबतच मटका, जुगारही खेळला जातो. या प्रकारात काही लोकांमध्ये वादाचे प्रकारही घडतात. ढाब्यावर बसण्यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नाही. मटका, जुगार खेळणारे जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत ढाबा चालकही आपल्या ढाब्याच्या झडपा पाडत नाही.रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या ढाब्यांवर पोलिसांची नजर कशी जात नाही, हा प्रश्न आहे. शहरालगत तसेच गावापासून दूर अंतरावर मात्र नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात रात्री १२-१ वाजतापर्यंत ढाबे सुरू असतात. वास्तविक १० वाजताच ही दुकानदारी बंद व्हायला पाहिजे. मात्र पोलिसांकडूनच कारवाई होत नसल्याने ढाबा चालकांचे चांगलेच फावत आहे. स्थानिक वरिष्ठ पोलिसांचेही या बाबीकडे ‘दुर्लक्ष’ सुरू आहे. जिल्हा ठिकाणचे पथकही कधी कारवाई करत नाही. ढाबा चालकांची पोलिसांशी असलेली जवळीक ही या बाबीला कारणीभूत ठरत आहे. कारंजा मार्गावरील एक ढाबा तर रात्री ९ वाजतानंतर विशेष सजविला जातो. विशिष्ट प्रकारची गाणी या ढाब्यावर वाजविली जातात. या गाण्यांवर डोलणाऱ्यांची संख्याही अधिक असते. पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कारवाई होणे अपेक्षित आहे. (तालुका प्रतिनिधी)हॉटेलचालकांनीही गुंडाळले नियमनेर शहर आणि तालुक्यात असलेल्या हॉटेलमध्येही नियमांचे पालन केले जात नाही. रात्री हॉटेल बंद करण्याची वेळ ठरलेली असताना उशिरापर्यंत ती सुरू असतात. यावरही कारवाई करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.