शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कडाक्याच्या थंडीत त्यांनी उघड्यावर काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:02 IST

वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली.

ठळक मुद्देरस्त्यासाठी हटविले अतिक्रमण : महिनाभरापूर्वीच बजावल्या होत्या नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. शेकोट्या पेटवून जागणाऱ्या नागरिकांनी शासकीय धोरणावर प्रचंड रोष नोंदविला. संवेदनाहीन लोकप्रतिनिधींमुळेच उघड्यावर पडल्याची तिखट प्रतिक्रिया या नागरिकांनी नोंदविली.गतवर्षी फेबु्रवारी महिन्यातच धामणगाव रोड ते लोहारा या बायपास मार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. हायब्रीड अ‍ॅन्यूईटी मॉडेलच्या माध्यमातून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने रस्त्यासाठी अतिक्रमण काढण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या होत्या. पावसाळा आणि नंतर दिवाळी आल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. आता प्रत्यक्ष कामकाज करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून ४०० मिटर रस्ता रुंदीकरणावरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.यावेळी वातावरणाचा कुठलाही विचार केला गेला नाही. गुरूवारपासून संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. यानंतरही त्याचा विचार न करता सलग दोन दिवस अतिक्रमण मोहीम राबविली गेली. यातील अनेक कुटुंबीयांना पर्यायी व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अशा कुटुंबीयांनी कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर आश्रय घेतला. त्यावर पाल ठोकून उघड्यावर कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढली. काही कुटुंबीयांनी तर बसस्थानक, लोहारा मंदिर, शहरातील केदारेश्वर मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात धाव घेतली. दोन दिवस थंडीचा सामना केला.अतिक्रमणधारकांना घरकुल देण्याची मागणीशनिवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अतिक्रमणधारकांच्या घरकुलाचा मुद्दा खासदार भावना गवळी यांनी उचलून धरला. त्यावर विचार होईल, असे सांगण्यात आले. मात्र ही प्रक्रिया राबवताना प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याची बाब पुढे आली आहे. वर्षभरापासून हा विषय प्रशासनापुढे असतानाही ठोस उपाययोजना झाल्या नाही.रोजगाराचे कटले तुटलेअतिक्रमणधारकांच्या घरावर बुलडोझर चालविताना त्यामध्ये असलेले लोटगाडे मोडले गेले. यामुळे चहा कॅन्टीन, फळ-भाजीविक्रेत्यांचा रोजगारही बुडला. आता घरही नाही अन् रोजगारही नाही, असे दुहेरी संकट नागरिकांना सोसावे लागत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण