शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीत त्यांनी उघड्यावर काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:02 IST

वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली.

ठळक मुद्देरस्त्यासाठी हटविले अतिक्रमण : महिनाभरापूर्वीच बजावल्या होत्या नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. शेकोट्या पेटवून जागणाऱ्या नागरिकांनी शासकीय धोरणावर प्रचंड रोष नोंदविला. संवेदनाहीन लोकप्रतिनिधींमुळेच उघड्यावर पडल्याची तिखट प्रतिक्रिया या नागरिकांनी नोंदविली.गतवर्षी फेबु्रवारी महिन्यातच धामणगाव रोड ते लोहारा या बायपास मार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. हायब्रीड अ‍ॅन्यूईटी मॉडेलच्या माध्यमातून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने रस्त्यासाठी अतिक्रमण काढण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या होत्या. पावसाळा आणि नंतर दिवाळी आल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. आता प्रत्यक्ष कामकाज करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून ४०० मिटर रस्ता रुंदीकरणावरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.यावेळी वातावरणाचा कुठलाही विचार केला गेला नाही. गुरूवारपासून संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. यानंतरही त्याचा विचार न करता सलग दोन दिवस अतिक्रमण मोहीम राबविली गेली. यातील अनेक कुटुंबीयांना पर्यायी व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अशा कुटुंबीयांनी कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर आश्रय घेतला. त्यावर पाल ठोकून उघड्यावर कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढली. काही कुटुंबीयांनी तर बसस्थानक, लोहारा मंदिर, शहरातील केदारेश्वर मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात धाव घेतली. दोन दिवस थंडीचा सामना केला.अतिक्रमणधारकांना घरकुल देण्याची मागणीशनिवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अतिक्रमणधारकांच्या घरकुलाचा मुद्दा खासदार भावना गवळी यांनी उचलून धरला. त्यावर विचार होईल, असे सांगण्यात आले. मात्र ही प्रक्रिया राबवताना प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याची बाब पुढे आली आहे. वर्षभरापासून हा विषय प्रशासनापुढे असतानाही ठोस उपाययोजना झाल्या नाही.रोजगाराचे कटले तुटलेअतिक्रमणधारकांच्या घरावर बुलडोझर चालविताना त्यामध्ये असलेले लोटगाडे मोडले गेले. यामुळे चहा कॅन्टीन, फळ-भाजीविक्रेत्यांचा रोजगारही बुडला. आता घरही नाही अन् रोजगारही नाही, असे दुहेरी संकट नागरिकांना सोसावे लागत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण