शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

घातक रसायने उठली जंगलाच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:59 IST

घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याचा धोका असतो.

ठळक मुद्देदुर्लक्ष कुणाचे? : झाडांसह वन्यजीव आणि पक्षांना मोठा धोका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याचा धोका असतो. यामुळे काही व्यावसायिक वापरल्या गेलेल्या रसायनाचा कचरा शहराबाहेर नेऊन फेकतात. जंगलामध्ये आता या रसायनांचा खच दिसत आहे. विशेष म्हणजे, जंगलातील वन्यप्राणी आणि पक्षी यावर ताव मारतात. यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.संपूर्ण शहर माळरानावर वसले आहे. शहराच्या चारही दिशेने जंगलाचा मोठा भाग आहे. शहरापासून काही अंतर गेल्यानंतर घाट पहायला मिळतो. दारव्हा, अमरावती, घाटंजी, बाभूळगाव या मार्गावर वळणाचा रस्ता पहायला मिळतो. प्रत्येक वळणवाटेवर मोठी वनसंपदाही आहे. याच भूभागावर कॅरिबॅगचा मोठा कचरा जमा झाला आहे. घाटंजी आणि आर्णी मार्गावर अशा प्रकारचे कॅरीबॅगचे अच्छादन पहायला मिळते.तर दारव्हा, अमरावती आणि बाभूळगाव मार्गावर रसायनाचा कचरा अलीकडे दृष्टीस पडतो आहे. पर्यावरणासोबत वन्यजीवालाही यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. आंबे, केळी, टरबुज आणि खरबुज यासोबत द्राक्षे आणि पपई पिकविण्यासाठी रसायनाचा वापर होतो. काही व्यापारी कच्च्या स्वरूपात आणलेले फळ या रसायनामधून बुचकळून काढतात. त्या फळांना पेपरचे अच्छादन गुंडाळल्या जाते. दुसºया दिवशी ही पिकलेली फळे बाजारात येतात. याचवेळी अच्छादनाकरिता गुंडाळलेले पेपर कचरा म्हणून रसायनासोबत एका बाजूला गोळा केल्या जातात. त्याला शहराबाहेर नेऊन फेकले जाते. यासोबत सडलेली फळेही जंगलात फेकली जातात. जंगलातील प्राणी असे ढिगारे उकरून काढतात. त्यातील खाद्यपदार्थ खातात. आणि कागदाचा लगदा तिथेच पडून असतो. रसायनाचा हा कागद वन्यप्राण्यांच्या पोटात जातो. कॅरिबॅगमुळे झाडांना पाणी मिळत नाही.औषधी, इंजेक्शन, सलाईनही...औषधी, गोळ्या, इंजेक्शन, सलाईन आणि विविध वस्तू या जंगलामध्ये सिलबंद अवस्थेत फेकलेल्या आहेत. या औषधी जंगलात का फेकण्यात आल्या, याचे कोडे कायम आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गरजू रूग्णाला रूग्णालयात औषधी मिळत नाही. पण ती जंगलात फेकली जाते. विशेष म्हणजे, ‘डेट’ संपली असेल तर अशा औषधीच्या संपुष्टाकरिता विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते. त्याचा अहवाल पाठवावा लागतो. यातून कुठलाही ससेमिरा नको, म्हणून औषधी फेकल्याची शक्यता आहे.हा प्रकार धोकादायक आहे. औषधांची विल्हेवाट लावण्यापूर्वी स्थानिक पातळीवरच्या समितीकडे हा विषय जातो. नंतर एका विशिष्ट पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची असते. औषधी उघड्यावर फेकल्याने नियमालाच बगल दिली आहे. ही औषधी कोणाची आहे, याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.- दुर्योधन चव्हाणजिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ 

टॅग्स :forestजंगल