शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

घातक रसायने उठली जंगलाच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:59 IST

घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याचा धोका असतो.

ठळक मुद्देदुर्लक्ष कुणाचे? : झाडांसह वन्यजीव आणि पक्षांना मोठा धोका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याचा धोका असतो. यामुळे काही व्यावसायिक वापरल्या गेलेल्या रसायनाचा कचरा शहराबाहेर नेऊन फेकतात. जंगलामध्ये आता या रसायनांचा खच दिसत आहे. विशेष म्हणजे, जंगलातील वन्यप्राणी आणि पक्षी यावर ताव मारतात. यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.संपूर्ण शहर माळरानावर वसले आहे. शहराच्या चारही दिशेने जंगलाचा मोठा भाग आहे. शहरापासून काही अंतर गेल्यानंतर घाट पहायला मिळतो. दारव्हा, अमरावती, घाटंजी, बाभूळगाव या मार्गावर वळणाचा रस्ता पहायला मिळतो. प्रत्येक वळणवाटेवर मोठी वनसंपदाही आहे. याच भूभागावर कॅरिबॅगचा मोठा कचरा जमा झाला आहे. घाटंजी आणि आर्णी मार्गावर अशा प्रकारचे कॅरीबॅगचे अच्छादन पहायला मिळते.तर दारव्हा, अमरावती आणि बाभूळगाव मार्गावर रसायनाचा कचरा अलीकडे दृष्टीस पडतो आहे. पर्यावरणासोबत वन्यजीवालाही यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. आंबे, केळी, टरबुज आणि खरबुज यासोबत द्राक्षे आणि पपई पिकविण्यासाठी रसायनाचा वापर होतो. काही व्यापारी कच्च्या स्वरूपात आणलेले फळ या रसायनामधून बुचकळून काढतात. त्या फळांना पेपरचे अच्छादन गुंडाळल्या जाते. दुसºया दिवशी ही पिकलेली फळे बाजारात येतात. याचवेळी अच्छादनाकरिता गुंडाळलेले पेपर कचरा म्हणून रसायनासोबत एका बाजूला गोळा केल्या जातात. त्याला शहराबाहेर नेऊन फेकले जाते. यासोबत सडलेली फळेही जंगलात फेकली जातात. जंगलातील प्राणी असे ढिगारे उकरून काढतात. त्यातील खाद्यपदार्थ खातात. आणि कागदाचा लगदा तिथेच पडून असतो. रसायनाचा हा कागद वन्यप्राण्यांच्या पोटात जातो. कॅरिबॅगमुळे झाडांना पाणी मिळत नाही.औषधी, इंजेक्शन, सलाईनही...औषधी, गोळ्या, इंजेक्शन, सलाईन आणि विविध वस्तू या जंगलामध्ये सिलबंद अवस्थेत फेकलेल्या आहेत. या औषधी जंगलात का फेकण्यात आल्या, याचे कोडे कायम आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गरजू रूग्णाला रूग्णालयात औषधी मिळत नाही. पण ती जंगलात फेकली जाते. विशेष म्हणजे, ‘डेट’ संपली असेल तर अशा औषधीच्या संपुष्टाकरिता विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते. त्याचा अहवाल पाठवावा लागतो. यातून कुठलाही ससेमिरा नको, म्हणून औषधी फेकल्याची शक्यता आहे.हा प्रकार धोकादायक आहे. औषधांची विल्हेवाट लावण्यापूर्वी स्थानिक पातळीवरच्या समितीकडे हा विषय जातो. नंतर एका विशिष्ट पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची असते. औषधी उघड्यावर फेकल्याने नियमालाच बगल दिली आहे. ही औषधी कोणाची आहे, याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.- दुर्योधन चव्हाणजिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ 

टॅग्स :forestजंगल