शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दारव्हात ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली.

ठळक मुद्देसंडे अँकर । शेतकरी हवालदिल, सोयाबीन, कापूस, तुरीला परतीच्या पावसाचा फटका

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्याला परतीच्या पावसाने मोठा दणका दिला. यामुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला असून ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी सतत १0 दहा दिवस परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. नंतर शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे कापूस, तूर जमिनदोस्त झाले. या प्रमुख पिकांना फटका बसल्याने पूर्ण हंगामाच शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. यावर्षी पिकांच्या योग्य पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला.१८ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत सतत पाऊस व ढगाळी वातावरण होते. याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन सवंगणी करून गंजी लावल्या. त्या पूर्णपणे पाण्यात भिजल्या. परिणामी सोयाबीनच्या दाण्यांना कोंब फुटले. ते काळे पडले. हे सोयाबीन व्यापारी घ्यायला तयार नाही. यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण हंगामच शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे.महसूल राज्यमंत्र्यांकडून पाहणीनुकसानग्रस्त गावांना शनिवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून पाहणी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, याकरिता आपण शासनस्तरावर आग्रह धरणार असल्याचे ना.राठोड यांनी सांगितले. जाचक अटी लावून पीक विमा लाभ देण्यास टाळाटाळ झाल्यास विमा कंपन्यांना वठणीवर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला.दारव्हा तालुक्यात सर्व्हेक्षण प्रारंभपरतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण सुरू झाले. १८ ते २८ आँक्टोबरपर्यंतच्या पावसामुळे ३६ हजार ९६ शेतकऱ्यांचे २० हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने दिला. शुक्रवारी रात्रभर २२.७७ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे १० हजार हेक्टरच्यावर नुकसान झाले. दरम्यान, शनिवारपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. सवेक्षणानंतरच प्रत्यक्षात किती नुकसान झाले, हे कळणार आहे.

टॅग्स :agricultureशेती