शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

दारव्हात ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली.

ठळक मुद्देसंडे अँकर । शेतकरी हवालदिल, सोयाबीन, कापूस, तुरीला परतीच्या पावसाचा फटका

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्याला परतीच्या पावसाने मोठा दणका दिला. यामुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला असून ३० हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी सतत १0 दहा दिवस परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. नंतर शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे कापूस, तूर जमिनदोस्त झाले. या प्रमुख पिकांना फटका बसल्याने पूर्ण हंगामाच शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. यावर्षी पिकांच्या योग्य पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला.१८ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत सतत पाऊस व ढगाळी वातावरण होते. याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन सवंगणी करून गंजी लावल्या. त्या पूर्णपणे पाण्यात भिजल्या. परिणामी सोयाबीनच्या दाण्यांना कोंब फुटले. ते काळे पडले. हे सोयाबीन व्यापारी घ्यायला तयार नाही. यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर कापूस, तुरीसह इतर पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण हंगामच शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे.महसूल राज्यमंत्र्यांकडून पाहणीनुकसानग्रस्त गावांना शनिवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून पाहणी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, याकरिता आपण शासनस्तरावर आग्रह धरणार असल्याचे ना.राठोड यांनी सांगितले. जाचक अटी लावून पीक विमा लाभ देण्यास टाळाटाळ झाल्यास विमा कंपन्यांना वठणीवर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला.दारव्हा तालुक्यात सर्व्हेक्षण प्रारंभपरतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण सुरू झाले. १८ ते २८ आँक्टोबरपर्यंतच्या पावसामुळे ३६ हजार ९६ शेतकऱ्यांचे २० हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने दिला. शुक्रवारी रात्रभर २२.७७ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे १० हजार हेक्टरच्यावर नुकसान झाले. दरम्यान, शनिवारपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. सवेक्षणानंतरच प्रत्यक्षात किती नुकसान झाले, हे कळणार आहे.

टॅग्स :agricultureशेती