शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ भाजीमंडईतील हर्रास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही.

ठळक मुद्देठोक भाजी विक्रेत्यांचा निर्णय : सील केलेल्या भागातूनही येतात किरकोळ खरेदीदार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाचा धोका थांबविण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. येथील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी थेट सील केलेल्या भागातील खरेदीदार येत असल्याने भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनने गुरुवारपासून भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून भाजी मार्केटमध्ये सुविधा मिळत नाही. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, यातून जीविताला धोका असल्याची चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे.विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही. भाजी मार्केटमध्ये जंतू नाशकाची फवारणी करावी, अशी मागणी नगरपरिषदेकडे वारंवार केली. त्यानंतरही याकडे लक्ष दिले जात नाही. किरकोळ भाजी विक्रेत्यासोबतच काही घरगुती खरेदीदारही मंडईत येतात. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. भाजी खरेदी-विक्रीही प्रत्यक्ष हात लावूनच केली जाते. कोरोना रुग्ण सापडलेल्या प्रतिबंधित भागातून मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते मंडईत येतात. प्रतिबंधित भागातील विक्रेते घराबाहेर पडतातच कसे हे कोडे आहे. यातून शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची भीती आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने अडचणीच्या काळातही मंडईतील हर्रास बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.पोलिसांच्या जाचक अटींमुळे अनेकदा भाजीपाल्याची विक्री होत नाही. किरकोळ विक्रेत्यांना उधारीत माल द्यावा लागतो. यामुळे ठोक विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे. नगरपालिकेचे पथक येऊन मंडईत मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे यांच्याबद्दल थेट ठोक भाजी विक्रेत्यालाच जबाबदार धरतात. त्यांच्या दंडात्मक कारवाईची भीती वाटते. या सर्व कारणांनीच ठोक भाजी विक्रेता असोसिएशनने व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवेच्या पासनंतरही पडतात लाठ्याठोक व किरकोळ भाजी विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवेची पास दिली आहे. त्यानंतरही रात्री ३ वाजता भाजीमंडईत जाताना पोलिसांकडून हटकले जाते. एका किरकोळ भाजी विक्रेत्याला पोलिसांच्या लाठ्या बसल्या. यात त्याच्या हाताचे बोटही फ्रॅक्चर झाले. संकटकाळात सेवा देणे हा आमचा उद्देश आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने आणखी धोका पत्करू शकत नाही, असे भाजी विक्रेत्यांनी स्पष्ट केले.प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास या संकटात ठोक भाजी विक्रेते काम करायला तयार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान व किरकोळ विक्रेत्यांचा रोजगार बुडतो, त्यामुळे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.- गजानन बरेअध्यक्ष, ठोक भाजी विक्रेता असोसिएशन.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार