शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

यवतमाळ भाजीमंडईतील हर्रास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही.

ठळक मुद्देठोक भाजी विक्रेत्यांचा निर्णय : सील केलेल्या भागातूनही येतात किरकोळ खरेदीदार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाचा धोका थांबविण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. येथील मुख्य भाजी मंडईत खरेदीसाठी थेट सील केलेल्या भागातील खरेदीदार येत असल्याने भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनने गुरुवारपासून भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून भाजी मार्केटमध्ये सुविधा मिळत नाही. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, यातून जीविताला धोका असल्याची चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे.विठ्ठलवाडीतील भाजी मंडई सुदर्शन ठोक भाजी विक्रेता वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चालविली जाते. या संघटनेअंतर्गत सर्व भाजी अडते काम करतात. रात्री ३ वाजतापासून भाजी मंडईचे कामकाज सुरू होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक प्रतिबंध येथील व्यवहारावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही. भाजी मार्केटमध्ये जंतू नाशकाची फवारणी करावी, अशी मागणी नगरपरिषदेकडे वारंवार केली. त्यानंतरही याकडे लक्ष दिले जात नाही. किरकोळ भाजी विक्रेत्यासोबतच काही घरगुती खरेदीदारही मंडईत येतात. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. भाजी खरेदी-विक्रीही प्रत्यक्ष हात लावूनच केली जाते. कोरोना रुग्ण सापडलेल्या प्रतिबंधित भागातून मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते मंडईत येतात. प्रतिबंधित भागातील विक्रेते घराबाहेर पडतातच कसे हे कोडे आहे. यातून शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची भीती आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने अडचणीच्या काळातही मंडईतील हर्रास बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.पोलिसांच्या जाचक अटींमुळे अनेकदा भाजीपाल्याची विक्री होत नाही. किरकोळ विक्रेत्यांना उधारीत माल द्यावा लागतो. यामुळे ठोक विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे. नगरपालिकेचे पथक येऊन मंडईत मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे यांच्याबद्दल थेट ठोक भाजी विक्रेत्यालाच जबाबदार धरतात. त्यांच्या दंडात्मक कारवाईची भीती वाटते. या सर्व कारणांनीच ठोक भाजी विक्रेता असोसिएशनने व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवेच्या पासनंतरही पडतात लाठ्याठोक व किरकोळ भाजी विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवेची पास दिली आहे. त्यानंतरही रात्री ३ वाजता भाजीमंडईत जाताना पोलिसांकडून हटकले जाते. एका किरकोळ भाजी विक्रेत्याला पोलिसांच्या लाठ्या बसल्या. यात त्याच्या हाताचे बोटही फ्रॅक्चर झाले. संकटकाळात सेवा देणे हा आमचा उद्देश आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने आणखी धोका पत्करू शकत नाही, असे भाजी विक्रेत्यांनी स्पष्ट केले.प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास या संकटात ठोक भाजी विक्रेते काम करायला तयार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान व किरकोळ विक्रेत्यांचा रोजगार बुडतो, त्यामुळे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.- गजानन बरेअध्यक्ष, ठोक भाजी विक्रेता असोसिएशन.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार