शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नेरमध्ये हागणदारीमुक्त गाव योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी

By admin | Updated: August 7, 2016 01:21 IST

नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या हागणदारीमुक्त गाव योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे.

अनुदानाची ‘वाट’ : घाणयुक्त रस्त्यांमुळे आरोग्याचा प्रश्न नेर : नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या हागणदारीमुक्त गाव योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला खीळ बसला आहे. दुसरीकडे घाणयुक्त रस्त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर प्रामुख्याने घाणीमुळे दुष्परिणाम होत असल्याची बाब सिद्ध झाली आहे. यासाठीच शासनाने हागणदारीमुक्त गाव योजना हाती घेतली. या अंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना सुरू करण्यात आली. प्रत्येक गरजवंताला शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया संबंधितांकडून पूर्ण झाल्यानंतर लाभ देण्यात येतो. मात्र अनेकांनी या निधीचा वापर इतरत्र केल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला शौचास जाणाऱ्यांची संख्या पाहता हे स्पष्ट होते. काही लोकांनी जुनेच शौचालय दाखवून अनुदान लाटल्याचे प्रकार घडले आहेत. हागणदारीमुक्त गावाला शासनाकडून दोन लाखांचा पुरस्कार दिला जातो. प्रत्यक्षात संबंधित गाव पुरस्कारासाठी कसे पात्र ठरले, हा प्रश्न उभा राहतो. या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या गावातील रस्ते आजही घाणीने बरबटलेले दिसतात. कागदोपत्री माहितीच्या आधारे हा पुरस्कार काही गावांनी पदरात पाडून घेतला असावा, असे सांगितले जाते. घाणीने बरबटलेल्या रस्त्यांमुळे साथीचे आजार पसरण्याची चिन्हे बळावली आहे. शौचालयासाठी अनुदान घेणारेही शौचास बाहेर जात असल्याचे दिसून येते. एकूणच या योजनेची वाट लागल्याचे चित्र आहे. योजनेसाठी अनुदान देताना संबंधितांनी योग्य ती तपासणी करण्याची गरज आहे. लाभार्थ्याने शौचालयाचे बांधकाम केले आहे की नाही याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही. अनुदान देऊन मोकळे होण्यापुरतीच जबाबदारी मानली जाते. यातूनच भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. असा प्रकार लक्षात आल्यानंतरही कुणावर कारवाई होत नाही. अनुदानाचा गैरवापर होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि ग्रामसचिवांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी जगन बन्सोड यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)