शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

डौलदार पिकांमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदी छटा

By admin | Updated: August 24, 2015 00:15 IST

मृग नक्षत्रातच यंदा मान्सूनचा पाऊस आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने खंड दिल्याने ऐन उगवणीच्या काळात ...

समाधानकारक परिस्थिती : यावर्षी तरी संकटातून तरण्याची अपेक्षा, योग्य काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहनदारव्हा : मृग नक्षत्रातच यंदा मान्सूनचा पाऊस आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने खंड दिल्याने ऐन उगवणीच्या काळात पिकांना फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात समाधानकार पाऊस झाल्याने तालुक्यातील पीक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकपाणी हातातून गेले. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या आशा आहेत. मागिल वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कपाशी लागवडीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. तब्बल ४१ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र मात्र घटले आहे. सोयाबिनचा पेरा १५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर आहे. सुरूवातीला मृगाच्या पावसात कपाशीची लागवड जवळपास शेतकऱ्यांनी आटोपली. मध्यंतरी झालेल्या पावसाने या कपाशीला उभारी मिळाली असून आज कपाशीचे पीक डौलाने उभे आहे. या समोरही निसर्गाची साथ योग्यरित्या मिळाल्यास चांगल्या पिकांची अपेक्षा करण्यास हरकत नाही. परंतु कृषी तज्ञांच्या सल्ल्याने वेळेवर आवश्यकतेनुसार किटकनाशकांच्या फवारण्या आणि योग्य काळजी शेतकऱ्यांना घेणे गरजेचे आहे. तसे पाहता मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी फवारण्या फारशा करण्याची सध्या तरी गरज दिसत नाही. सध्या सोयाबिन व कापूस हे दोन्ही प्रमुख पीक फुलावस्थेत आहे. पिकांना फुलधारणा व फळधारणा या दोन अवस्थेत पाण्याची गरज अधिक भासत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने योग्यवेळी पिकांना संजिवनी मिळाली आहे. सोयाबिनवर सध्या चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव बघता प्रतिबंधात्मक फवारण्या सुरू आहेत. काहींनी कपाशीला उर्वरित रासायनिक खतांच्या मात्रा देणे सुरू केले आहे. ज्वारी पिकाला सध्या नत्राची गरज आहे. नत्राची योग्य मात्रा युरिया खतातून दिल्या जात असते. परंतु सध्या तालुक्यात युरियाची टंचाई आहे. या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पुढील काही दिवसातच खताची रॅक लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावर्षी दारव्हा तालुक्यात आतापर्यंत ५०१ मिमि. पावसाची नोंद झाली आहे. येत्या काळात आणखी पावसाची गरज असून निसर्गाने तशी साथ दिल्यास शेतकऱ्यांच्या पदरात दोन-तीन वर्षानंतर दोन पैसे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)