शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जलप्रकल्पांचा साठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:13 IST

यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याचे वेध : लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पातही अपुरे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.मोठ्या पूस प्रकल्पामध्ये ५५.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अरूणावती प्रकल्पात ३७.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बेंबळा प्रकल्पात २९.७३ टक्के तर इसापूर धरणात ५२.५७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांची अवस्था उत्तम आहे. मात्र मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था बिकट आहे. अडाण प्रकल्पात ४०.४५ टक्के, नवरगाव ५१.१२ टक्के, गाकी ४८.४७ टकके, वाघाडी ५२.२१, सायखेडा ४२.७९, अधरपूस ५५.६, बोरगाव ४०.८५, निळोणा ८१.३७, चापडोह ८५.३१ तर १०७ लघु प्रकल्पामध्ये ३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.मुबलक पाणी असूनही कपात लादलीजिल्ह्यातील एकूण प्रकल्पाचा आढावा घेतला तर निळोणा आणि चापडोह या दोन्ही प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ८५ टक्के जलसाठा आहे. तरी यवतमाळकरांना पाण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागते. अनेक भागत तर वेळेवर नळ येत नाही. तर शहरातील अनेक भागात पाईपलाईन सतत फुटत राहते. मात्र यवतमाळकरांना पाणी मिळत नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. यामुळे मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची याकडे डोळेझाक सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी