शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अद्याप अर्धे विद्यार्थी गणवेशाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:44 IST

शैक्षणिक बाबीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, यावर्षी अर्धे सत्र संपत आले तरी गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही.

ठळक मुद्देअर्धे सत्र झाले : ४०० रुपयांसाठी करावा लागतोय दोन हजारांचा खर्च

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शैक्षणिक बाबीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, यावर्षी अर्धे सत्र संपत आले तरी गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. दारव्हा तालुक्यातील पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी या लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने बँकेत संयुक्त खाते उघडण्याची अट घालून देण्यात आली आहे. परंतु खाते उघडून त्यामध्ये दोन हजार रुपये जमा ठेवावे लागतात आणि भेटतात मात्र चारशे रुपये. त्यामुळे चारशे रुपयांसाठी दोन हजारांचा खर्च परवडणारा नसल्यामुळे पालकांची मोठी अडचण झाली आहे.जिल्हा परिषद शाळांमधील सर्व मुली अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांना मोफत शालेय गणवेश पुरविण्यात येतो. पूर्वी प्रत्येक शाळेतील पात्र विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम मुख्याध्यापकाच्या बँकेत जमा झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीमार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण करून गणवेश खरेदी व्हायची. त्यामुळे सर्वांना वेळेवर गणवेश मिळायचे. परंतु आता मात्र ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार पात्र विद्यार्थ्यांने आईसाबत बँकेत संयुक्त खाते उघडून गणवेशाची खरेदी करायची व त्याबाबतची पावती मुख्याध्यापकांना दाखविल्यानंतर त्याच्या खात्यात चारशे रुपये जमा केले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.कोणत्याच विद्यार्थ्याचे आईसोबत संयुक्त बँक खाते राहात नाही. नव्याने खाते उघडायचे म्हटले तर सध्या बँकांमध्ये किमान दोन हजार रुपये डिपॉझीट ठेवावे लागतात व इतर खर्च वेगळा. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. दारव्हा तालुक्यात एकूण पात्र विद्यार्थी ११ हजार ८४१ आहेत. त्यामध्ये सर्व मुली आठ हजार १७, अनुसूचीत जमाती मुले ९८४ अनुसूचित जमाती मुले ८६२ व दारिद्र्य रेषखालील मुले एक हजार ९७८ आहेत. या सर्वांची ४७ लाख ३६ हजार ४०० रुपये एवढी रक्कम प्रत्येकी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र, यापैकी केवळ ४० टक्के विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम वळती झाली असेल इतर ६० टक्के रक्कम तशीच मुख्याध्यापकाच्या खात्यात पडून असल्याची माहिती मिळाली. याबाबत आवश्यक ती प्रक्रिया शाळेकडूनही तत्परतेने होताना दिसत नाही.त्यामुळे दारव्हा तालुक्यातील जवळपास ६० टक्के विद्यार्थी शालेय गणवेशाविना शाळेत जात असल्याचे स्पष्ट होते. १५ आॅगस्टसारख्या महत्वाच्या दिवशीही या विद्यार्थ्यांच्या अंगावर शालेय गणवेश नव्हता. त्यामुळे २६ जानेवारीला तरी विद्यार्थी शालेय गणवेशात हजर राहतील की नाही, याबाबत शंका आहे. शासनाच्या या जाचक अटीला कंटाळून काही गावातील सर्व पालकांनी स्वत:च्या खर्चाने आपल्या पाल्यांकरिता गणवेश खरेदी केले. पिंपळगाव चोरखोपडी, यासह काही ठिकाणी हे प्रयोग झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जुलैला सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंतही गणवेशाचा घोळ संपला नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.माहिती गोळा करणे सुरूनेमक्या किती विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा झाली याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध नाही. मात्र, अनेकांना अद्यापही रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. गणवेशाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता मुख्याध्यापकांकडून ही माहिती मागविली जात असून, त्यानंतर काय तो निर्णय होईल.