शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पाचव्या सत्रात बी.एस्सीचे अर्धे विद्यार्थी नापास

By admin | Updated: March 16, 2015 01:53 IST

अमरावती विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यवतमाळातील अमोलकचंद महाविद्यालयातील बीएस्सी ..

यवतमाळ : अमरावती विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यवतमाळातील अमोलकचंद महाविद्यालयातील बीएस्सी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रातील परीक्षेत तब्बल अर्ध्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. विशेष म्हणजे परीक्षेसाठी एका वर्ग खोलीत बसलेले सर्वच विद्यार्थी नापास केले. यावरूनच उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना गोंधळ झाल्याचे स्पष्ट होते. बीएस्सी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रासाठी २०१४ मध्ये परीक्षा घेण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे चारही सत्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. त्या विद्यार्थ्यांचा भौतिकशास्त्र विषयात नापास करण्यात आले. खेदाची बाब म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणालाही दोन ते १७ पेक्षा अधिक गुण देण्यात आले नाही. तर याच सत्रातील दुसऱ्या वर्गखोलीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयात भरभरून गुणदान करण्यात आले. ५० ते ८० टक्क्याच्या दरम्यान गुण दिले. भौतिकशास्त्र या विषयाच्या पेपरची तपासणी करताना प्राध्यापकाने घोडचूक केली असावी असा संशय नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. परीक्षेसाठी एकाच वर्गात बसलेल्या ३८ विद्यार्थ्यांना नापास करण्यामागे नेमका कोणता हेतु होता असाही संशय व्यक्त केल्या जात आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा यांच्याकडे तक्रार केली. प्राचार्यांनी या तक्रारीची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र लिहिले आहे. सध्यातरी मेहनत करून नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्यच टांगणीला लागले आहे. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेला खेळ आहे. पेपरची तपासणीत विद्यार्थ्यांची मेहनत लक्षात घेऊनच गुणांकन करावे अशी अपेक्षाही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)