शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

पाचव्या सत्रात बी.एस्सीचे अर्धे विद्यार्थी नापास

By admin | Updated: March 16, 2015 01:53 IST

अमरावती विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यवतमाळातील अमोलकचंद महाविद्यालयातील बीएस्सी ..

यवतमाळ : अमरावती विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यवतमाळातील अमोलकचंद महाविद्यालयातील बीएस्सी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रातील परीक्षेत तब्बल अर्ध्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. विशेष म्हणजे परीक्षेसाठी एका वर्ग खोलीत बसलेले सर्वच विद्यार्थी नापास केले. यावरूनच उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना गोंधळ झाल्याचे स्पष्ट होते. बीएस्सी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रासाठी २०१४ मध्ये परीक्षा घेण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे चारही सत्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. त्या विद्यार्थ्यांचा भौतिकशास्त्र विषयात नापास करण्यात आले. खेदाची बाब म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणालाही दोन ते १७ पेक्षा अधिक गुण देण्यात आले नाही. तर याच सत्रातील दुसऱ्या वर्गखोलीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयात भरभरून गुणदान करण्यात आले. ५० ते ८० टक्क्याच्या दरम्यान गुण दिले. भौतिकशास्त्र या विषयाच्या पेपरची तपासणी करताना प्राध्यापकाने घोडचूक केली असावी असा संशय नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. परीक्षेसाठी एकाच वर्गात बसलेल्या ३८ विद्यार्थ्यांना नापास करण्यामागे नेमका कोणता हेतु होता असाही संशय व्यक्त केल्या जात आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा यांच्याकडे तक्रार केली. प्राचार्यांनी या तक्रारीची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र लिहिले आहे. सध्यातरी मेहनत करून नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्यच टांगणीला लागले आहे. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेला खेळ आहे. पेपरची तपासणीत विद्यार्थ्यांची मेहनत लक्षात घेऊनच गुणांकन करावे अशी अपेक्षाही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)