शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

मालधक्का व रॅक पॉर्इंट अधांतरीच

By admin | Updated: April 27, 2017 00:32 IST

रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून

 नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात : मंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले वणी : रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून हटविण्यासाठी नागरिक सातत्याने मागणी करीत आहे. तसेच रेल्वेच्या कायर रेल्वे स्टेशनवर रासायनीक खताचा रॅक पॉर्इंट देण्याची मागणीही कृषी साहित्य विक्रेता व शेतकरी करीत आहे. मात्र या दोन्ही समस्या सुटण्याचा कोणताही संकेत दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. वणीचे रेल्वे स्टेशन मानवी वस्तीला लागून आहे. या रेल्वे स्टेशनवरून चार रेल्वे गाड्या धावतात. मात्र या स्टेशनवरून प्रवासासाठी येणारा-जाणारा प्रवासही स्टेशनच्या दैनावस्थेकडे पाहून हे रेल्वे स्टेशन आहे, की कोळाचे आगार असा प्रश्न विचारतात. वणी परिसरात दगडी कोळशाच्या डझनभर खाणी आहेत. या खाणीतून निघणारा कोळसा दररोज रेल्वेने वीज निर्मिती केंद्राना व इतर उद्योगांना पाठविला जातो. खाणीतील कोळसा ट्रकद्वारे रेल्वे स्टेशनजवळ आणून रिचविला जातो. स्टेशनलगतच कोळशाचा मालधक्का बनविण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशन लगतच कोळशाचे ढिगारे दिसून येतात. या ठिकाणी कोळसा जेसीबीद्वारे रेल्वे वॅगनमध्ये भरला जातो. कोळसा भरताना उडलेली कोळशाची भूकटी परिसरात पसरते. त्यामुळे स्टेशनसह परिसर काळवंडून जातात. स्टेशनवर बसायला स्वच्छ जागा नाही. त्यामुळे नागरिकांना श्वास घेतानाही त्रास होतो. घराच्या छतावर वाळायला टाकलेले कपडे वाळेपर्यंत काळे डाग पडून घाणेरडे होतात. दिवसभर चालणारी जेसीबीची घरघर तर नागरिकांच्या कानठिण्या बसवून टाकत आहे. त्यामुळे मालधक्का येथून हटवावा, अशी मागणी होत आहे. या मागणीवरून केंद्रीय राज्यमंत्री यांनी हा मालधक्का लवकरच येथून हटवणार, असे अश्वासन सतत चार-पाच वर्षापासून देत आहे. मात्र आश्वासनाची पूर्तता अजूनही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच कायर स्टेशनवर रासायनीक खताची रॅक पॉर्इंटही मंजुर झाल्याचे नागरिक व शेतकरी तीन वर्षापासून अहीर यांच्या तोंडून ऐकत आहे. मात्र त्याचीही पूर्तता अजून झाली नाही. मागील वर्षी पिंपळखुटी स्टेशनवर एक रॅक उतरली. मात्र कायर वणीच्या जवळ असूनही कायर स्टेशनला न्याय मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिक दराने खत विकत घ्यावे लागत आहे. वरील दोन्ही समस्या अहीर साहेब केव्हा सोडविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)