शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मालधक्का व रॅक पॉर्इंट अधांतरीच

By admin | Updated: April 27, 2017 00:32 IST

रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून

 नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात : मंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले वणी : रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून हटविण्यासाठी नागरिक सातत्याने मागणी करीत आहे. तसेच रेल्वेच्या कायर रेल्वे स्टेशनवर रासायनीक खताचा रॅक पॉर्इंट देण्याची मागणीही कृषी साहित्य विक्रेता व शेतकरी करीत आहे. मात्र या दोन्ही समस्या सुटण्याचा कोणताही संकेत दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. वणीचे रेल्वे स्टेशन मानवी वस्तीला लागून आहे. या रेल्वे स्टेशनवरून चार रेल्वे गाड्या धावतात. मात्र या स्टेशनवरून प्रवासासाठी येणारा-जाणारा प्रवासही स्टेशनच्या दैनावस्थेकडे पाहून हे रेल्वे स्टेशन आहे, की कोळाचे आगार असा प्रश्न विचारतात. वणी परिसरात दगडी कोळशाच्या डझनभर खाणी आहेत. या खाणीतून निघणारा कोळसा दररोज रेल्वेने वीज निर्मिती केंद्राना व इतर उद्योगांना पाठविला जातो. खाणीतील कोळसा ट्रकद्वारे रेल्वे स्टेशनजवळ आणून रिचविला जातो. स्टेशनलगतच कोळशाचा मालधक्का बनविण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशन लगतच कोळशाचे ढिगारे दिसून येतात. या ठिकाणी कोळसा जेसीबीद्वारे रेल्वे वॅगनमध्ये भरला जातो. कोळसा भरताना उडलेली कोळशाची भूकटी परिसरात पसरते. त्यामुळे स्टेशनसह परिसर काळवंडून जातात. स्टेशनवर बसायला स्वच्छ जागा नाही. त्यामुळे नागरिकांना श्वास घेतानाही त्रास होतो. घराच्या छतावर वाळायला टाकलेले कपडे वाळेपर्यंत काळे डाग पडून घाणेरडे होतात. दिवसभर चालणारी जेसीबीची घरघर तर नागरिकांच्या कानठिण्या बसवून टाकत आहे. त्यामुळे मालधक्का येथून हटवावा, अशी मागणी होत आहे. या मागणीवरून केंद्रीय राज्यमंत्री यांनी हा मालधक्का लवकरच येथून हटवणार, असे अश्वासन सतत चार-पाच वर्षापासून देत आहे. मात्र आश्वासनाची पूर्तता अजूनही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच कायर स्टेशनवर रासायनीक खताची रॅक पॉर्इंटही मंजुर झाल्याचे नागरिक व शेतकरी तीन वर्षापासून अहीर यांच्या तोंडून ऐकत आहे. मात्र त्याचीही पूर्तता अजून झाली नाही. मागील वर्षी पिंपळखुटी स्टेशनवर एक रॅक उतरली. मात्र कायर वणीच्या जवळ असूनही कायर स्टेशनला न्याय मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिक दराने खत विकत घ्यावे लागत आहे. वरील दोन्ही समस्या अहीर साहेब केव्हा सोडविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)