शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:49 IST

दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.

ठळक मुद्देतंत्रज्ञाचा अभाव : शस्त्रक्रियेचा दहा लाखांचा खर्च व्यर्थ ठरण्याची पालकांना भीती, अधिष्ठात्यांकडे धाव

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.जन्मत: कर्णबधीर असलेल्या मुलांना बोलण्याचे कौशल्य अवगत होत नाही. अशा मुलांवर पालकांनी साडेदहा लाख रुपयांची जुळवाजुळव करून यशस्वी शस्त्रक्रियाही करून घेतली. मात्र शस्त्रक्रियेनंतर जवळपास तीन वर्षापर्यंत या मुलांना नियमित स्पीच थेरपी घ्यावी लागते. यवतमाळ जिल्ह्यात स्पीच थेरपीची सर्वोत्तम सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध आहे. त्यामुळे घाटंजी, वणी, उमरखेड, पुसद, महागावसारख्या गावातील पालक आपल्या शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना येथील मेडिकलमध्ये आणतात.आजपर्यंत मेडिकलमध्ये डॉ. नीता मेश्राम यांनी अतिशय उत्तम स्पीच थेरपी दिली. मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांच्या सहायकाची लातूर येथे बदली झाली. तर डॉ. मेश्राम यांच्याकडे अन्य विभागाचाही अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे स्पीच थेरपीसाठी वेळ देणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शस्त्रक्रिया झालेले जवळपास ३० चिमुकले दररोज तर काही जण दर आठवड्याला थेरपीसाठी मेडिकलमध्ये येत आहे. मात्र थेरपी मिळत नसल्याने दिवसभर वाट पाहून सायंकाळी परत जात आहे. अखेर त्रस्त पालकांनी शुक्रवारी अधिष्ठातांकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी तात्पुरता टेक्निशीयन नेमण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे अधिष्ठातांनी पालकांना सांगितले. मात्र ही जागा तातडीने न भरल्यास चिमुकल्यांचे भवितव्य संकटात सापडण्याची भीती आहे.बोलण्यात वाढतेय व्यंगशस्त्रक्रिया झालेले ३० चिमुकले स्पीच थेरपीसाठी मेडिकलच्या चकरा मारत आहे. शस्त्रक्रिया न झालेलेही तेवढेच चिमुकले थेरपीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अर्धवट ऐकू येणारे, गतिमंद अशा मुलांचाही समावेश आहे. शस्त्रक्रियेनंतर तीन वर्ष नियमित थेरपी न घेतल्यास मुलांच्या बोलण्यात व्यंग निर्माण होते. गेल्या दीड महिन्यांपासून स्पीच थेरपीमध्ये खंड पडत असल्यामुळे काही मुलांचे बोलणे चुकत आहे. आंबा म्हणताना आबा असा उच्चार होत आहे. त्यामुळे पालकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.मी रोजमजुरी करून आणि शासकीय मदत मिळवून माझ्या तीन वर्षाच्या मुलीवर नागपुरात शस्त्रक्रिया केली. आता स्पीच थेरपीसाठी यवतमाळच्या मेडिकलमध्ये मुलीला नियमित घेऊन जातो. मात्र दीड महिन्यांपासून संबंधित डॉक्टरची सेवा उपलब्ध होणे कठीण झाले आहे.- मोहम्मद अमीर शेखपालक, कुऱ्हाड ता. घाटंजी