शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:49 IST

दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.

ठळक मुद्देतंत्रज्ञाचा अभाव : शस्त्रक्रियेचा दहा लाखांचा खर्च व्यर्थ ठरण्याची पालकांना भीती, अधिष्ठात्यांकडे धाव

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे.जन्मत: कर्णबधीर असलेल्या मुलांना बोलण्याचे कौशल्य अवगत होत नाही. अशा मुलांवर पालकांनी साडेदहा लाख रुपयांची जुळवाजुळव करून यशस्वी शस्त्रक्रियाही करून घेतली. मात्र शस्त्रक्रियेनंतर जवळपास तीन वर्षापर्यंत या मुलांना नियमित स्पीच थेरपी घ्यावी लागते. यवतमाळ जिल्ह्यात स्पीच थेरपीची सर्वोत्तम सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध आहे. त्यामुळे घाटंजी, वणी, उमरखेड, पुसद, महागावसारख्या गावातील पालक आपल्या शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना येथील मेडिकलमध्ये आणतात.आजपर्यंत मेडिकलमध्ये डॉ. नीता मेश्राम यांनी अतिशय उत्तम स्पीच थेरपी दिली. मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांच्या सहायकाची लातूर येथे बदली झाली. तर डॉ. मेश्राम यांच्याकडे अन्य विभागाचाही अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे. त्यामुळे स्पीच थेरपीसाठी वेळ देणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शस्त्रक्रिया झालेले जवळपास ३० चिमुकले दररोज तर काही जण दर आठवड्याला थेरपीसाठी मेडिकलमध्ये येत आहे. मात्र थेरपी मिळत नसल्याने दिवसभर वाट पाहून सायंकाळी परत जात आहे. अखेर त्रस्त पालकांनी शुक्रवारी अधिष्ठातांकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी तात्पुरता टेक्निशीयन नेमण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे अधिष्ठातांनी पालकांना सांगितले. मात्र ही जागा तातडीने न भरल्यास चिमुकल्यांचे भवितव्य संकटात सापडण्याची भीती आहे.बोलण्यात वाढतेय व्यंगशस्त्रक्रिया झालेले ३० चिमुकले स्पीच थेरपीसाठी मेडिकलच्या चकरा मारत आहे. शस्त्रक्रिया न झालेलेही तेवढेच चिमुकले थेरपीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अर्धवट ऐकू येणारे, गतिमंद अशा मुलांचाही समावेश आहे. शस्त्रक्रियेनंतर तीन वर्ष नियमित थेरपी न घेतल्यास मुलांच्या बोलण्यात व्यंग निर्माण होते. गेल्या दीड महिन्यांपासून स्पीच थेरपीमध्ये खंड पडत असल्यामुळे काही मुलांचे बोलणे चुकत आहे. आंबा म्हणताना आबा असा उच्चार होत आहे. त्यामुळे पालकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.मी रोजमजुरी करून आणि शासकीय मदत मिळवून माझ्या तीन वर्षाच्या मुलीवर नागपुरात शस्त्रक्रिया केली. आता स्पीच थेरपीसाठी यवतमाळच्या मेडिकलमध्ये मुलीला नियमित घेऊन जातो. मात्र दीड महिन्यांपासून संबंधित डॉक्टरची सेवा उपलब्ध होणे कठीण झाले आहे.- मोहम्मद अमीर शेखपालक, कुऱ्हाड ता. घाटंजी