शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गुरुजी, पाच वर्षांच्या जेवणावळीचा द्या हिशेब; पोषण आहाराचे लेखा परीक्षण सुरू

By अविनाश साबापुरे | Updated: July 29, 2023 21:30 IST

पुण्याचे चार्टर्ड अकाउंटंट झाले यवतमाळ जिल्ह्यात दाखल

अविनाश साबापुरे, यवतमाळ: अनेक अडथळ्यांची शर्यत ओलांडून शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या पोषण आहार योजनेचे लेखा परीक्षण करण्याला जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी प्रचंड विरोध केल्यानंतरही आता हे परीक्षण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, यासाठी थेट पुण्यातील चार्टर्ड अकाउंटंट कंपनीचे अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात गेल्या पाच वर्षातील हिशेबाची कागदपत्रे सादर करताना मुख्याध्यापकांची मात्र चांगलीच घाणाघाण होत आहे.

शालेय पोषण आहाराचे ऑडिट करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केला होता. मात्र त्यात पाच वर्षांचा हिशेब देणे बंधनकारक केल्याने शिक्षक संघटना संतापल्या होत्या. असा हिशेब देणे शक्यच नसल्याचा दावा करण्यात आला होता. राज्यभरातून होणारा विरोध लक्षात घेता शासनानेही मध्यम मार्ग काढला. प्रत्यक्ष शाळेत किंवा पंचायत समिती स्तरावर जाऊन कागदपत्रे तपासण्यापेक्षा पोषण आहार योजनेचे ऑनलाईन ऑडिट करण्याचा मधला मार्ग काढण्यात आला. या ऑनलाईन ऑडिटसाठी मुख्याध्यापकांना केवळ एक फाॅर्म भरून द्यायचा होता. त्यामुळे कोणत्याही संघटनेने विरोध केला नाही. दोन महिन्यांपूर्वी हे ऑनलाईन ऑडिट आटोपले. पण आता त्यात अनेक शाळांच्या माहितीत त्रृटी आढळल्याचे कारण पुढे करीत प्रत्यक्ष पंचायत समिती स्तरावर जाऊन ऑडिट सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता कागदपत्रे देताना त्रास होत असतानाही शिक्षक संघटनांचा विरोध मावळल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ऑडिट करण्यासाठी शासनस्तरावरून पुणे येथील शिंदे चव्हाण गांधी ॲन्ड कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीचे सीए जिल्ह्यात दाखल झाले असून २४ जुलैपासून एकेक पंचायत समितीनिहाय लेखा परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २०१५-१६ पासून तर २०१९-२० या शैक्षणिक सत्रापर्यंतचे मध्यान्ह भोजन योजनेचा हिशेब हे सीए तपासत आहेत. पाच वर्षातील कागदपत्रे देताना, त्याची पडताळणी जुळविताना मुख्याध्यापकांच्या मात्र नाकीनऊ येत आहेत. 

बाॅक्सकोणत्या तालुक्यात केव्हा ऑडिट?पुण्यातून आलेल्या सीए मंडळींनी २४ जुलैपासून ऑडिट सुरू केले. पहिल्या दिवशी उमरखेडमधील २३१ शाळा, २५ जुलैला महागावातील १७६ व आर्णीतील १६२ शाळांचे ऑडिट केले. तर २६ रोजी दिग्रस १४१ व दारव्हातील १८४ शाळा आटोपल्या. २७ जुलैला नेर १२८, बाभूळगाव ११० तसेच २८ जुलैला कळंब १४३ व राळेगावच्या १४० शाळांचे ऑडिट करण्यात आले. आता दोन दिवसांच्या सुट्या आटोपल्यानंतर ३१ जुलै रोजी घाटंजीतील १६९, पांढरकवड्यातील १६९ शाळांचे ऑडिट होणार आहे. १ ऑगस्ट रोजी वणी १८६, मारेगाव १२३, २ ऑगस्टला पुसदच्या ३१९ आणि झरीतील १३२ शाळांसह ३ ऑगस्ट रोजी यवतमाळ तालुक्यातील २५० शाळांचे ऑडिट केले जाणार आहे.

समग्र शिक्षाचे खाते बदलण्याचे पुन्हा टेन्शन

दरम्यान समग्र शिक्षाचा निधी मिळविण्यासाठी आता सर्व शाळांना पुन्हा एकदा बँक खाते बदलण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या सर्व शाळांचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असताना ते बंद करून एका खासगी बँकेत खाते काढावे लागणार आहे. यामुळे मुख्याध्यापकांच्या मागे नवे टेन्शन लागले आहे. कारण खाते बदलण्यासाठी आधी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी लागते. त्या बैठकीची नोटीस काढणे, ती सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवणे, बैठक घेणे, त्याचे इतिवृत्त लिहिणे, ठराव लिहिणे, कव्हरिंग लेटर लिहिणे, बँक खाते उघडण्याचा अर्ज आणणे, तो भरणे, सोबत इतिवृत्त-कव्हरिंग लेटर लावणे, अध्यक्ष तसेच मुख्याध्यापकांचे आवश्यक कागदपत्र लावणे, त्यावर वरिष्ठांच्या स्वाक्षरी घेणे, हे सर्व केल्यानंतर प्रस्ताव बँकेत पोहोचवणे इतक्या झंझटी मुख्याध्यापकाला कराव्या लागणार आहेत. केवळ राज्य स्तरावरील काही वरिष्ठांच्या ‘इच्छा’ पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणा वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप मुख्याध्यापकांमधून होत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक