शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गुजरात, बिहारचे विद्यार्थी आत्महत्याग्रस्त गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:13 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांनी शनिवार आणि रविवार ....

ठळक मुद्देशेलू, दाभडीला भेट : शिक्षण, आरोग्य, सामाजिक कुप्रथांचेही नोंदविले निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांनी शनिवार आणि रविवार असा दोन दिवस जिल्ह्यात दौरा करून विविध निरीक्षणे नोंदविली.चेन्नई येथील एशियन कॉलेज आॅफ जर्नालिझमचे २५ विद्यार्थी आणि त्यांचे तीन शिक्षक सध्या यवतमाळ दौºयावर आहेत. हे विद्यार्थी तमीळनाडूसह बिहार, गुजरात, आसाम, दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. शनिवारी त्यांनी आर्णी तालुक्यातील शेलू गावाला भेट देऊन तेथील शेतकºयांशी संवाद साधला, तर रविवारी दाभडी गावाला भेट दिली.त्यानंतर यवतमाळ येथे स्थानिक पत्रकारांशी चर्चा करताना जिल्ह्यातील परिस्थिती पाहून धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शासनाने शौचालय बांधण्याची मोहीमच उघडली आहे. परंतु, गावांमध्ये पिण्यासाठीच पाणी नाही तर ते शौचालयात जादा पाणी कसे वापरतील? हा प्रश्न या चमूतील विद्यार्थिनींनी उपस्थित केला. येथे शिक्षणासाठी गावा-गावांमध्ये शाळा आहेत. मात्र, मुले आईवडिलांना मदत म्हणून मजुरी करायला जातात, ही परिस्थिती त्यांना भयावह वाटली. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असूनही सिंचनाचे प्रमाण अत्यल्प आहे. कसेबसे पीक काढल्यावर शेतमालाला भाव मिळत नाही, असे असतानाही स्थानिक पत्रकार त्याविरुद्ध आवाज का उठवित नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.शेतकरी कितीही गरीब असला तरी मुलीच्या लग्नात त्याला हुंडा द्यावाच लागतो, महिला शेतमजुराला पुरुष मजुरापेक्षा कमी मजुरी मिळते, आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच नसतात हे विदारक चित्र विद्यार्थ्यांनी नोंदवून घेतले. शेतकºयांची परिस्थिती एवढी हलाखीची आहे, तर खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची संख्या का दिसते? शेतकऱ्यांना ही वाहने वापरणे परवडते तरी कसे? असा प्रश्नही त्यांना पडला. पीककर्ज मिळविताना अनेक अडचणी असल्या तरी वाहनकर्ज देण्यासाठी कंपन्या शेतकऱ्यांना सवलती देतात, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. मक्ता, बटईने शेती करणारा शेतकरी कोणत्याही शासकीय मदतीला पात्र ठरत नाही, पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली म्हणजे नेमके काय झाले, खासगी सावकारांकडूनच शेतकरी कर्ज का घेतात अशा विविध गोष्टी त्यांनी समजावून घेतल्या. यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार उपस्थित होते.कुणाकडेच माती आरोग्यपत्रिका नाहीशेलू गावात विचारपूस केली असता एकाही शेतकऱ्याकडे सॉईल हेल्थ कार्ड नव्हते. मग या शेतकºयांनी पेरणी कशाच्या भरवशावर केली? असा प्रश्न परराज्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांना पडला. शेतीचे प्रशिक्षण कुणीच घेत नाही, सेंद्रीय शेती कळते पण कुणीच का करीत नाही, असे प्रश्न घेऊन हे विद्यार्थी दाभडी गावातही फिरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या गावात येऊन स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले, तेथील शेतकरी सुखी आहेत का, याचा अभ्यास केल्यावर विद्यार्थी निराशच झाले.