शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गुजरात, बिहारचे विद्यार्थी आत्महत्याग्रस्त गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:13 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांनी शनिवार आणि रविवार ....

ठळक मुद्देशेलू, दाभडीला भेट : शिक्षण, आरोग्य, सामाजिक कुप्रथांचेही नोंदविले निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांनी शनिवार आणि रविवार असा दोन दिवस जिल्ह्यात दौरा करून विविध निरीक्षणे नोंदविली.चेन्नई येथील एशियन कॉलेज आॅफ जर्नालिझमचे २५ विद्यार्थी आणि त्यांचे तीन शिक्षक सध्या यवतमाळ दौºयावर आहेत. हे विद्यार्थी तमीळनाडूसह बिहार, गुजरात, आसाम, दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. शनिवारी त्यांनी आर्णी तालुक्यातील शेलू गावाला भेट देऊन तेथील शेतकºयांशी संवाद साधला, तर रविवारी दाभडी गावाला भेट दिली.त्यानंतर यवतमाळ येथे स्थानिक पत्रकारांशी चर्चा करताना जिल्ह्यातील परिस्थिती पाहून धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शासनाने शौचालय बांधण्याची मोहीमच उघडली आहे. परंतु, गावांमध्ये पिण्यासाठीच पाणी नाही तर ते शौचालयात जादा पाणी कसे वापरतील? हा प्रश्न या चमूतील विद्यार्थिनींनी उपस्थित केला. येथे शिक्षणासाठी गावा-गावांमध्ये शाळा आहेत. मात्र, मुले आईवडिलांना मदत म्हणून मजुरी करायला जातात, ही परिस्थिती त्यांना भयावह वाटली. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असूनही सिंचनाचे प्रमाण अत्यल्प आहे. कसेबसे पीक काढल्यावर शेतमालाला भाव मिळत नाही, असे असतानाही स्थानिक पत्रकार त्याविरुद्ध आवाज का उठवित नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.शेतकरी कितीही गरीब असला तरी मुलीच्या लग्नात त्याला हुंडा द्यावाच लागतो, महिला शेतमजुराला पुरुष मजुरापेक्षा कमी मजुरी मिळते, आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच नसतात हे विदारक चित्र विद्यार्थ्यांनी नोंदवून घेतले. शेतकºयांची परिस्थिती एवढी हलाखीची आहे, तर खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची संख्या का दिसते? शेतकऱ्यांना ही वाहने वापरणे परवडते तरी कसे? असा प्रश्नही त्यांना पडला. पीककर्ज मिळविताना अनेक अडचणी असल्या तरी वाहनकर्ज देण्यासाठी कंपन्या शेतकऱ्यांना सवलती देतात, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. मक्ता, बटईने शेती करणारा शेतकरी कोणत्याही शासकीय मदतीला पात्र ठरत नाही, पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली म्हणजे नेमके काय झाले, खासगी सावकारांकडूनच शेतकरी कर्ज का घेतात अशा विविध गोष्टी त्यांनी समजावून घेतल्या. यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार उपस्थित होते.कुणाकडेच माती आरोग्यपत्रिका नाहीशेलू गावात विचारपूस केली असता एकाही शेतकऱ्याकडे सॉईल हेल्थ कार्ड नव्हते. मग या शेतकºयांनी पेरणी कशाच्या भरवशावर केली? असा प्रश्न परराज्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांना पडला. शेतीचे प्रशिक्षण कुणीच घेत नाही, सेंद्रीय शेती कळते पण कुणीच का करीत नाही, असे प्रश्न घेऊन हे विद्यार्थी दाभडी गावातही फिरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या गावात येऊन स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले, तेथील शेतकरी सुखी आहेत का, याचा अभ्यास केल्यावर विद्यार्थी निराशच झाले.