शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अखेर पालकमंत्री बदलले

By admin | Updated: December 30, 2016 00:06 IST

जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याने पालकमंत्रीही भाजपाचाच द्यावा,

मदन येरावारांकडे जिल्ह्याची धुरा : संजय राठोडांकडे वाशिम यवतमाळ : जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याने पालकमंत्रीही भाजपाचाच द्यावा, ही मागणी दोन वर्षानंतर का होईना प्रत्यक्षात साकारली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ऊर्जा व बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांची वर्णी लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. गेली दोन वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळणाऱ्या महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे लगतच्या वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्रीपदी बदल करताना ‘सहपालकमंत्री’ हे पद निर्माण करण्यात आले आहे. यवतमाळात आता ना. येरावार हे पालकमंत्री तर ना. संजय राठोड हे सहपालकमंत्री राहणार आहे. या उलट क्रम वाशिममध्ये राहील. तेथे ना. राठोड पालकमंत्री तर ना. मदन येरावार सहपालकमंत्री राहणार आहे. वाशिमची अतिरिक्त जबाबदारी आतापर्यंत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे होती. मुख्यमंत्री गुरुवारी कळंबच्या दौऱ्यावर आले होते. येथून मुंबईत परतताच नव्या पालकमंत्र्यांची यादी जारी करण्यात आली. ते पाहता कळंबमध्येच पालकमंत्री बदलाचे राजकारण शिजले असावे, असा तर्क राजकीय गोटात लावला जात आहे. निवडणुकीसाठी ‘बुस्ट’ फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. येरावार यांना मिळालेले पालकमंत्रीपद म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ‘जिल्ह्यात भाजपाला बुस्ट’ दिल्याचे मानले जाते. या पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत गतवेळ पेक्षा अधिक जागा खेचून आणण्याची जबाबदारी ना. येरावार आणि पक्षाच्या अन्य चार आमदारांवर वाढली आहे, एवढे निश्चित. भाजपा कार्यकर्ते सुखावले एकमेव आमदार असताना शिवसेनेला जिल्ह्याचे पालकमंत्री पद कसे ? असा प्रश्न उपस्थित करीत मदन येरावार यांनी सुरुवातीपासूनच ‘चेंज’चा नारा दिला होता. त्यांना जिल्ह्यातील आमदारांचीही साथ लाभली. भाजपाच्या या मंत्री-आमदारांकडून दबाव वाढल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनाही पालकमंत्री पदावरील हा फेरबदल अधिककाळ टाळता आला नाही. गुरुवारी ना. मदन येरावार यांच्या नावावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची मोहर उमटविण्यात आली. या बदलामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर शिवसैनिकांमध्ये काहीसा निरुत्साह पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) युतीचा फॉर्म्युला फेल जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असता ना. संजय राठोड यांनी हा बदल अशक्य असल्याचे सांगताना युतीचा फॉर्म्युला पुढे केला होता. सरकार स्थापनेच्यावेळी पालकमंत्री म्हणून भाजपा आणि शिवसेनेचे जिल्हे निश्चित झाले आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, त्यामुळे पालकमंत्री बदलाच्या चर्चा ना. राठोड यांनी निरर्थक ठरविल्या होत्या. परंतु गुरुवारी झालेला ‘चेंज’ पाहता युतीचा कथीत फॉर्म्युलाच निरर्थक ठरल्याचे दिसून येते.