शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची भूजल पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:11 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देउणे दोन मीटरची घट : धोक्याची घंटा, मोर्चे रोखण्यासाठी लावले फलक

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिलीमीटर आहे. गतवर्षी ५६२.९३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६१ टक्के आहे. अपुऱ्या पावसाने भूजलाची पातळी कमालीची घसरली. मार्चमध्ये भूजल पातळी -१ मिटर होती. आता भूजल सर्वेक्षण विभागाने मान्सूनपूर्व पातळी जाहीर केली. त्यात १६ तालुक्यांतील १८१ निरीक्षण विहिरी आणि ६४ पाणलोट क्षेत्रात भूजल पातळीत मोठी घट दिसून आली. यापूर्वी २००९ मध्ये ४७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी भूजल पातळी - २ अंशावर पोहोचली होती. २०१८ मध्ये भूजल पातळी -२.२१ ने खाली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची स्थिती अधिकच स्फोटक बनली आहे.धरणाचा ‘कॅचमेंट एरिया’ वगळता जिल्ह्यातील दोन हजार १३६ गावांची भूजल पातळी सरासरी -२.२१ मिटरने खाली गेली आहे. याचा फटका सर्व तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्याकरिता ही धोक्याची घंटा आहे.निळोणा, चापडोहचा जलसाठा संपलानिळोणा आणि चापडोह हे प्रकल्प गतवर्षी भरले नाही. यामुळे वेळेपूर्वीच जलप्रकल्पातील जलसाठा संपला. यानंतर या प्रकल्पामधील मृत साठा वापरण्यात आला. आता तोही संपला आहे. प्रारंभी चापडोह प्रकल्पातील जलसाठा संपला आणि शनिवारी निळोणा जलाशयातील साठा संपला. तसे फलकच जीवन प्राधिकरणाने आपल्या कार्यालयाबाहेर लावले आहे.अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्पांतील पाणी आटले. सध्या मोठ्या जलाशयात सरासरी ९.६० टक्के पाणी शिल्लक आहे. यामध्ये पूस प्रकल्पात १२.१२ टक्के, अरूणावती ४.९० टक्के, बेंबळा ११.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १५.८५ टक्के, तर लघु प्रकल्पांत ११.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पांपैकी दुरूग, उमर्डा, दत्तापूर, सिंगनडोह, अर्जुना, एकलारा, वारणा, राजूर, कुंभारकिन्ही, हातोला, लोहतवाडी, नेर, दुधाना, झटाळा, अंतरगाव, म्हैसदोडका, बोरडा, निंगनूर, अंबोना, सेनद, दराटी, मुडाणा, तरोडा, पोफाळी आदी २५ प्रकल्प कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई