शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

जिल्ह्याची भूजल पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:11 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देउणे दोन मीटरची घट : धोक्याची घंटा, मोर्चे रोखण्यासाठी लावले फलक

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिलीमीटर आहे. गतवर्षी ५६२.९३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६१ टक्के आहे. अपुऱ्या पावसाने भूजलाची पातळी कमालीची घसरली. मार्चमध्ये भूजल पातळी -१ मिटर होती. आता भूजल सर्वेक्षण विभागाने मान्सूनपूर्व पातळी जाहीर केली. त्यात १६ तालुक्यांतील १८१ निरीक्षण विहिरी आणि ६४ पाणलोट क्षेत्रात भूजल पातळीत मोठी घट दिसून आली. यापूर्वी २००९ मध्ये ४७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी भूजल पातळी - २ अंशावर पोहोचली होती. २०१८ मध्ये भूजल पातळी -२.२१ ने खाली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची स्थिती अधिकच स्फोटक बनली आहे.धरणाचा ‘कॅचमेंट एरिया’ वगळता जिल्ह्यातील दोन हजार १३६ गावांची भूजल पातळी सरासरी -२.२१ मिटरने खाली गेली आहे. याचा फटका सर्व तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्याकरिता ही धोक्याची घंटा आहे.निळोणा, चापडोहचा जलसाठा संपलानिळोणा आणि चापडोह हे प्रकल्प गतवर्षी भरले नाही. यामुळे वेळेपूर्वीच जलप्रकल्पातील जलसाठा संपला. यानंतर या प्रकल्पामधील मृत साठा वापरण्यात आला. आता तोही संपला आहे. प्रारंभी चापडोह प्रकल्पातील जलसाठा संपला आणि शनिवारी निळोणा जलाशयातील साठा संपला. तसे फलकच जीवन प्राधिकरणाने आपल्या कार्यालयाबाहेर लावले आहे.अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्पांतील पाणी आटले. सध्या मोठ्या जलाशयात सरासरी ९.६० टक्के पाणी शिल्लक आहे. यामध्ये पूस प्रकल्पात १२.१२ टक्के, अरूणावती ४.९० टक्के, बेंबळा ११.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १५.८५ टक्के, तर लघु प्रकल्पांत ११.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पांपैकी दुरूग, उमर्डा, दत्तापूर, सिंगनडोह, अर्जुना, एकलारा, वारणा, राजूर, कुंभारकिन्ही, हातोला, लोहतवाडी, नेर, दुधाना, झटाळा, अंतरगाव, म्हैसदोडका, बोरडा, निंगनूर, अंबोना, सेनद, दराटी, मुडाणा, तरोडा, पोफाळी आदी २५ प्रकल्प कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई