शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची भूजल पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:11 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देउणे दोन मीटरची घट : धोक्याची घंटा, मोर्चे रोखण्यासाठी लावले फलक

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिलीमीटर आहे. गतवर्षी ५६२.९३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६१ टक्के आहे. अपुऱ्या पावसाने भूजलाची पातळी कमालीची घसरली. मार्चमध्ये भूजल पातळी -१ मिटर होती. आता भूजल सर्वेक्षण विभागाने मान्सूनपूर्व पातळी जाहीर केली. त्यात १६ तालुक्यांतील १८१ निरीक्षण विहिरी आणि ६४ पाणलोट क्षेत्रात भूजल पातळीत मोठी घट दिसून आली. यापूर्वी २००९ मध्ये ४७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी भूजल पातळी - २ अंशावर पोहोचली होती. २०१८ मध्ये भूजल पातळी -२.२१ ने खाली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची स्थिती अधिकच स्फोटक बनली आहे.धरणाचा ‘कॅचमेंट एरिया’ वगळता जिल्ह्यातील दोन हजार १३६ गावांची भूजल पातळी सरासरी -२.२१ मिटरने खाली गेली आहे. याचा फटका सर्व तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्याकरिता ही धोक्याची घंटा आहे.निळोणा, चापडोहचा जलसाठा संपलानिळोणा आणि चापडोह हे प्रकल्प गतवर्षी भरले नाही. यामुळे वेळेपूर्वीच जलप्रकल्पातील जलसाठा संपला. यानंतर या प्रकल्पामधील मृत साठा वापरण्यात आला. आता तोही संपला आहे. प्रारंभी चापडोह प्रकल्पातील जलसाठा संपला आणि शनिवारी निळोणा जलाशयातील साठा संपला. तसे फलकच जीवन प्राधिकरणाने आपल्या कार्यालयाबाहेर लावले आहे.अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्पांतील पाणी आटले. सध्या मोठ्या जलाशयात सरासरी ९.६० टक्के पाणी शिल्लक आहे. यामध्ये पूस प्रकल्पात १२.१२ टक्के, अरूणावती ४.९० टक्के, बेंबळा ११.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १५.८५ टक्के, तर लघु प्रकल्पांत ११.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पांपैकी दुरूग, उमर्डा, दत्तापूर, सिंगनडोह, अर्जुना, एकलारा, वारणा, राजूर, कुंभारकिन्ही, हातोला, लोहतवाडी, नेर, दुधाना, झटाळा, अंतरगाव, म्हैसदोडका, बोरडा, निंगनूर, अंबोना, सेनद, दराटी, मुडाणा, तरोडा, पोफाळी आदी २५ प्रकल्प कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई