शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

रुग्णांसाठीचा तक्रार निवारण कक्ष कागदावरच; केवळ १७ जिल्ह्यांत स्थापना

By अविनाश साबापुरे | Updated: June 23, 2023 12:09 IST

माहिती अधिकारात समोर आली माहिती

अविनाश साबापुरे

यवतमाळ : शारीरिक व्याधी, आर्थिक अडचण आणि मानसिक धक्का अशी संकटांची मालिका घेऊन रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात आला. मात्र, कायद्यानुसार स्थापन करावयाच्या रुग्ण तक्रार निवारण कक्षाकडे रुग्णालयांनी साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील केवळ १७ जिल्ह्यांत हा कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्यातीलही अनेक ठिकाणी हा कक्ष केवळ कागदोपत्री असल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे.

रुग्णांच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास स्थानिक पातळीवरच दाद मागता यावी, यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना बंधनकारक करण्यात आली. विशेष म्हणजे या कक्षाची गरज लक्षात घेऊन सरकारने १९४९ मधील महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्यात २०२१ साली सुधारणा केली. त्यानुसार प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषद आणि शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीत रुग्ण तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे बंधनकारक आहे.

या कक्षासाठी स्वतंत्र टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. अधिनियमात सुधारणा होऊन आता दोन वर्षे झाल्यानंतरही महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा अधिक जिल्ह्यांनी हा कक्ष उघडलेलाच नाही. याबाबत माहितीच्या अधिकाराद्वारे राज्याची माहिती मागितली असता, केवळ २३ जिल्ह्यांमधून माहिती देण्यात आली. त्यात ११ महापालिका, ९ जिल्हा परिषदा आणि ३ शल्य चिकित्सकांचा समावेश आहे. त्यातही २३ पैकी केवळ १७ जिल्ह्यांमध्ये हा कक्ष कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात आले. इतर जिल्ह्यांनी मात्र अद्यापही कायद्यातील या तरतुदीकडे गांभीर्याने पाहिलेलेच नाही.

विशेष म्हणजे, जेथे कक्ष कार्यान्वित झाला, तेथेही कक्षाचे काम केवळ कागदोपत्री दिसते. १७ पैकी तब्बल १३ ठिकाणी या कक्षासाठी स्वतंत्र टोल फ्री नंबर देण्यात आलेला नाही. तेथे नियमित कार्यालयीन फोन नंबरच तक्रार निवारण कक्षाचा नंबर म्हणून देण्यात आला आहे. त्या नंबरची कुठेही प्रचार प्रसिद्धीही करण्यात आलेली नाही. केवळ सांगली, कोल्हापूर, नाशिक व पुणे या चारच ठिकाणी स्वतंत्र टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ‘एमपीजे’ संघटनेतर्फे या अधिनियमाची अंमलबजावणी होतेय की नाही, यासाठी महाराष्ट्रभर ‘रुग्णहक्क मोहीम’ राबविण्यात आली. त्यानंतर नुकतेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन पाठवून नर्सिंग होम नोंदणी अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आलीय.

कुठे कुठे झाला कक्ष कार्यरत?

नागपूर, कोल्हापूर, भिवंडी निजामपूर, पुणे, मालेगाव, सांगली या सहा महापालिकांनी कक्ष कार्यान्वित केलाय. तर वाशिम, चंद्रपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, पालघर, सोलापूर, लातूर या आठ जिल्हा परिषदांनी तसेच अमरावती, अहमदनगर आणि भंडारा या तीन शल्य चिकित्सक स्तरावर तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित झाला. परंतु, धुळे, कल्याण-डोंबिवली, नांदेड, हिंगोली येथे कक्ष स्थापनेची कार्यवाही सुरू असल्याचे माहितीच्या अधिकारात कळविण्यात आले.

कायद्यात सुधारणा होऊन दोन वर्षे लोटल्यानंतरही रुग्ण तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यातून स्पष्ट होते. आता आपापल्या शहरात असा कक्ष सुरू करण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

- विशाल ठाकरे, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Healthआरोग्यYavatmalयवतमाळ