शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

वणी तालुक्यात सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा

By admin | Updated: May 31, 2014 00:13 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनच्या बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी विभागाने मात्र शेतकर्‍यांना घरचे

वणी : यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनच्या बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी विभागाने मात्र शेतकर्‍यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.रोहिणी नक्षत्र सुरू होताच शेतकर्‍यांनी बियाण्यांसाठी धावपळ सुरू केली आहे. येत्या ८ जूनपासून मृगाला सुरूवात होत असल्याने बळीराजा पेरणीसाठी लगबग करीत आहे. पावसाची चाहूल लागल्याने आता शेतकरी बांधव बियाणे खरेदी करण्याकडे वळले आहे. मात्र बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यात जवळपास चार हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे.वणी तालुक्यात ९२ हजार ३१८ हेक्टर एकूण क्षेत्र आहे. त्यापैकी ६४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडीयोग्य आहे. त्यापैकी यावर्षी केवळ १0 हजार ७९८ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन पेरणीचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. मागीलवर्षी हेच क्षेत्र ११ हजार ९९७ हेक्टर होते. त्यात यावर्षी घट होणार आहे. त्यासाठी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा कारणीभूत ठरत आहे. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याचे कृषी विभागानेही कबूल केले आहे. त्यामुळे त्यांनी शेतकर्‍यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. एकट्या वणी तालुक्याला खरीपात आठ हजार १00 क्विंटल सोयाबिनचे बियाणे लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात यापैकी केवळ चार हजार १00 क्विंटल बियाणेच उपलब्ध झाले आहे. अर्थात अद्याप सोयाबिनच्या चार हजार क्विंटल बियाण्यांचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना आपल्या घरचे सोयाबीन वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना कृषी विभाग मदतही करणार आहे. शेतकर्‍यांकडील सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता ते गावातच तपासून देणार आहे. सोयाबिनची उगवण क्षमता तपासून देण्यासाठी कृषी विभागाचे पथक गावात जाणार आहे. यातून काही प्रमाणात बियाणे टंचाई कमी होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे. सोबतच वणीतील वेअर हाऊसधून ९५0 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत हालचाल सुरू आहे. वेअर हाऊस आणि शेतकर्‍यांकडील बियाणे मिळूनही उर्वरित चार हजार क्विंटल बियाण्यांचा तुटवडा भरून निघणे अशक्य आहे. त्यामुळे तालुक्यात किमान दोन हजार ५00 क्विंटल बियाण्यांचा तुटवडा राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)