शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

दारव्हा परिक्षेत्रातील वनसंपदेची प्रचंड हानी

By admin | Updated: May 5, 2016 02:38 IST

यवतमाळ वनवृत्तात अव्वल असणाऱ्या आणि वनसंपदेने नटलेल्या दारव्हा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खुलेआम अवैध वृक्षतोड, गौण खनिज उत्खननमुकेश इंगोले  दारव्हायवतमाळ वनवृत्तात अव्वल असणाऱ्या आणि वनसंपदेने नटलेल्या दारव्हा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून त्यामुळे वनसंपदेची प्रचंड हानी होत असल्याच्या तक्रारी आहे. वेळीच या प्रकारांना पायबंद घातला गेला नाही तर वनसंपत्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.वनपरिक्षेत्राची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड, माती, गौण खनिजाची चोरी आणि वन्यजीवांची हत्या करण्याच्या घटना घडत आहे. मात्र त्या तुलनेत संबंधितांविरुद्ध कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या वन परिक्षेत्रात मौल्यवान वृक्ष, बिबट, लांडगे, कोल्हे, हरीण, काळवीट, निलगाय, ससे, मोर, रोही आदी वन्यप्राणी व मोठ्या प्रमाणात लाल माती, खनिज संपत्ती, तसेच वन औषधी आहे. परंतु या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण होत नसल्याने त्यावर अनेकांकडून घाला घातला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. शहरालगतचा वन परिसर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केल्या जाते. अधूनमधून एखादी कारवाई दाखविली जाते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वृक्षतोडीसाठी कारवाई नगण्य असल्यामुळे यासाठी चोरट्यांना मूकसंमती तर दिली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो.त्याचबरोबर वन जमिनीवरील मातीची चोरी, अवैध गौण खनिज उत्खनन केल्या जाते. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. हे सर्व डोळ्यासमोर असूनसुद्धा अधिकारी मात्र झोपेत आहे. यापूर्वी या भागात लागोपाठ तीन बिबट मृत्युमुखी पडले होते. तसेच मोराची शिकार होत असल्याचे उघडकीस आले होते. याचा अर्थ या वनपरिक्षेत्रात वन्यजीवांची शिकार करणारे सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. परंतु या शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना आखलेल्या दिसत नाही. मध्यंतरीच्या काळात वन माती नाला बांध, वन्यजीव पाणी साठवण तलाव, वनतळे आदी कामांकरिता लाखो रुपयाचा निधी आला होता. परंतु यातील काही कामे नियमबाह्य करण्यात आली व कामात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. सध्याच्या तीव्र तापमानात जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत असतात. याचा शिकारी फायदा घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र अधिकाऱ्यांना याचे कोणतेही सोयरसूतक नसल्यासारखे त्यांचे वागणे आहे. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना बदलीचे वेधयेथील वनपरिक्षेत्र अधिकारी पी.व्ही. नाल्हे यांना सध्या बदलीचे वेध लागल्याचे वन विभागात बोलले जात आहे. त्यांच्या बदलीच्या मानसिकतेमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचारीवर्गात चर्चील्या जात आहे. तसेही त्यांना अनेकदा संपर्क साधला तेव्हा यवतमाळ येथील मिटींग इतर कामकाज, न्यायालयीन कामे असल्याने बाहेरगावी असल्याचे उत्तर मिळते. त्यामुळे विभागाच्या कामासाठी त्यांना कधी वेळ मिळतो हे सांगणे कठीण आहे.