शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

‘कृृषी’च्याच शेतात गवत

By admin | Updated: November 22, 2014 23:10 IST

कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.

रमेश झिंगरे - बोटोणीकृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.वणी तालुक्यातील निंबाळा येथे सन १९६० पासून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या पांढरकवडा उपविभागांतर्गत कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. ही शेती डॉ.नुरजहा बेगम यांची होती. ती सिलींग कायद्याने शासनाने अधिगृहीत केल्याचे जाणकार सांगतात. या केंद्रात कृषी प्रशिक्षण केंद्राची तब्बल ७० एकर शेती आहे. त्यापैकी ४० एकर शेती वहितीत आहे. मात्र ही शेती सांभाळण्यासाठी येथील पर्यवेक्षकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.शासन कृषी विकासाचा स्तर उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना आखते. परंतु निंबाळा येथील सिंचनाअभावी कृषी चिकित्सालय अखेरच्या घटका मोजत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी करून तेथे ४० एकरात २५ बॅगा सोयाबीन, तुरीची ट्रॅक्टरनेच पेरणी करण्यात आली. शेजारच्या शेतातील पीकात डवरणी सुरू होती, त्यावेळी या शेतात पेरणी सुरू होती. पूर्वी बैलजोड्या होत्या. आता डवरणी, वखरणी करण्यासाठी भाड्याने औत सांगावे लागते. यावर्षी औताने डवरणी करण्यात आली नाही. निंदन, खुरपणही करण्यात आले नाही. परिणामी ४० एकरात सोयाबीन कुठेच दिसत नसून सगळीकडे गवताचेच साम्राज्य आहे.सोयाबीन गवताने झाकले गेले आहे. सोयाबिनखाली तर गवत वर दिसत आहे. केवळ तुरी उंच वाढत असल्याने गवताच्यावर दिसत आहे. पूर्वी या शेतात कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके घेतली जात होती. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता केवळ सोयाबीन व तुरीचेच पीक घेतले जाते. लागवडी एवढेच उत्पन्न निघते. अनुदानाच्या विलंबामुळे पेरणी उशीरा होते. शिवारात डवरणी, फवारणी सुरू असताना या केंद्रात पेरणी सुरू असते. परिणामी उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो.शेतकऱ्यांना बियाणे व शेतीबाबतचे अद्ययावत ज्ञान मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात तालुका बिज गुण प्रक्षेत्रअंतर्गत गांडूळ खत व गांडूळ कल्चर उत्पादन केले जाते. वणी-मारेगाव या राज्य मार्गावर असलेल्या या शेतीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते. मात्र प्रत्यक्षात शेतीची पार दुर्दशा झाली आहे. तेथे पिकाऐवजी गवतच दिसून येते. त्यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.