शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

‘कृृषी’च्याच शेतात गवत

By admin | Updated: November 22, 2014 23:10 IST

कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.

रमेश झिंगरे - बोटोणीकृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.वणी तालुक्यातील निंबाळा येथे सन १९६० पासून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या पांढरकवडा उपविभागांतर्गत कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. ही शेती डॉ.नुरजहा बेगम यांची होती. ती सिलींग कायद्याने शासनाने अधिगृहीत केल्याचे जाणकार सांगतात. या केंद्रात कृषी प्रशिक्षण केंद्राची तब्बल ७० एकर शेती आहे. त्यापैकी ४० एकर शेती वहितीत आहे. मात्र ही शेती सांभाळण्यासाठी येथील पर्यवेक्षकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.शासन कृषी विकासाचा स्तर उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना आखते. परंतु निंबाळा येथील सिंचनाअभावी कृषी चिकित्सालय अखेरच्या घटका मोजत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी करून तेथे ४० एकरात २५ बॅगा सोयाबीन, तुरीची ट्रॅक्टरनेच पेरणी करण्यात आली. शेजारच्या शेतातील पीकात डवरणी सुरू होती, त्यावेळी या शेतात पेरणी सुरू होती. पूर्वी बैलजोड्या होत्या. आता डवरणी, वखरणी करण्यासाठी भाड्याने औत सांगावे लागते. यावर्षी औताने डवरणी करण्यात आली नाही. निंदन, खुरपणही करण्यात आले नाही. परिणामी ४० एकरात सोयाबीन कुठेच दिसत नसून सगळीकडे गवताचेच साम्राज्य आहे.सोयाबीन गवताने झाकले गेले आहे. सोयाबिनखाली तर गवत वर दिसत आहे. केवळ तुरी उंच वाढत असल्याने गवताच्यावर दिसत आहे. पूर्वी या शेतात कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके घेतली जात होती. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता केवळ सोयाबीन व तुरीचेच पीक घेतले जाते. लागवडी एवढेच उत्पन्न निघते. अनुदानाच्या विलंबामुळे पेरणी उशीरा होते. शिवारात डवरणी, फवारणी सुरू असताना या केंद्रात पेरणी सुरू असते. परिणामी उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो.शेतकऱ्यांना बियाणे व शेतीबाबतचे अद्ययावत ज्ञान मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात तालुका बिज गुण प्रक्षेत्रअंतर्गत गांडूळ खत व गांडूळ कल्चर उत्पादन केले जाते. वणी-मारेगाव या राज्य मार्गावर असलेल्या या शेतीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते. मात्र प्रत्यक्षात शेतीची पार दुर्दशा झाली आहे. तेथे पिकाऐवजी गवतच दिसून येते. त्यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.