शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

‘कृृषी’च्याच शेतात गवत

By admin | Updated: November 22, 2014 23:10 IST

कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.

रमेश झिंगरे - बोटोणीकृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.वणी तालुक्यातील निंबाळा येथे सन १९६० पासून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या पांढरकवडा उपविभागांतर्गत कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. ही शेती डॉ.नुरजहा बेगम यांची होती. ती सिलींग कायद्याने शासनाने अधिगृहीत केल्याचे जाणकार सांगतात. या केंद्रात कृषी प्रशिक्षण केंद्राची तब्बल ७० एकर शेती आहे. त्यापैकी ४० एकर शेती वहितीत आहे. मात्र ही शेती सांभाळण्यासाठी येथील पर्यवेक्षकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.शासन कृषी विकासाचा स्तर उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना आखते. परंतु निंबाळा येथील सिंचनाअभावी कृषी चिकित्सालय अखेरच्या घटका मोजत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी करून तेथे ४० एकरात २५ बॅगा सोयाबीन, तुरीची ट्रॅक्टरनेच पेरणी करण्यात आली. शेजारच्या शेतातील पीकात डवरणी सुरू होती, त्यावेळी या शेतात पेरणी सुरू होती. पूर्वी बैलजोड्या होत्या. आता डवरणी, वखरणी करण्यासाठी भाड्याने औत सांगावे लागते. यावर्षी औताने डवरणी करण्यात आली नाही. निंदन, खुरपणही करण्यात आले नाही. परिणामी ४० एकरात सोयाबीन कुठेच दिसत नसून सगळीकडे गवताचेच साम्राज्य आहे.सोयाबीन गवताने झाकले गेले आहे. सोयाबिनखाली तर गवत वर दिसत आहे. केवळ तुरी उंच वाढत असल्याने गवताच्यावर दिसत आहे. पूर्वी या शेतात कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके घेतली जात होती. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता केवळ सोयाबीन व तुरीचेच पीक घेतले जाते. लागवडी एवढेच उत्पन्न निघते. अनुदानाच्या विलंबामुळे पेरणी उशीरा होते. शिवारात डवरणी, फवारणी सुरू असताना या केंद्रात पेरणी सुरू असते. परिणामी उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो.शेतकऱ्यांना बियाणे व शेतीबाबतचे अद्ययावत ज्ञान मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात तालुका बिज गुण प्रक्षेत्रअंतर्गत गांडूळ खत व गांडूळ कल्चर उत्पादन केले जाते. वणी-मारेगाव या राज्य मार्गावर असलेल्या या शेतीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते. मात्र प्रत्यक्षात शेतीची पार दुर्दशा झाली आहे. तेथे पिकाऐवजी गवतच दिसून येते. त्यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.