शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

‘एम्बासिंग’मध्ये अडले अनुदान

By admin | Updated: June 20, 2015 00:20 IST

‘आधी खरेदी करा, नंतर अनुदान घ्या’ या कृषी योजनेवर विश्वास ठेवलेले परिसरातील ५८८ शेतकरी अडचणीत सापडले आहे.

शेतकरी अडचणीत : वडकी परिसरात उसनवार करून खरेदी केले तुषार संचवडकी : ‘आधी खरेदी करा, नंतर अनुदान घ्या’ या कृषी योजनेवर विश्वास ठेवलेले परिसरातील ५८८ शेतकरी अडचणीत सापडले आहे. ‘एम्बासिंग’ अर्थात विशिष्ट ओळख तुषार संचावर नसल्याने त्यांचे अनुदान अडविण्यात आले आहे. उसनवार करून खरेदी केलेल्या संचाची रक्कम मिळावी यासाठी हे शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पेरणीच्या दिवसात होत असलेली फरफट त्यांच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे. सिंचनातून समृद्धीसाठी कृषी विभागाने विविध योजना जाहीर केल्या आहे. तुषार संच योजना हीसुद्धा त्यातीलच एक भाग आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला ७५ टक्के आणि साधारण शेतकऱ्याला ५० टक्के अनुदानावर हे संच उपलब्ध करून दिले जातात. मात्र त्यासाठी कृषी विभागाने सांगितलेल्या विक्रेत्याकडून १०० टक्के रक्कम भरून संचाची उचल करावी लागते. यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम साधारणत: दोन-चार महिन्यांपासून आरटीजीएस प्रक्रियेद्वारे जमा केली जाते. गतवर्षापर्यंत याच प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळत आले आहे. अनुदानावर संच मिळत असल्याने परिसरातील एकूण ५८८ शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून तुषार संच खरेदी केले. शेतात लावून ओलितही सुरू केले. संच तपासणी अहवाल संबंधित कृषी सहायकांनी मोका तपासणी करून जिल्हा कृषी विभागाकडे पाठविला. पण, त्यात ‘एम्बासिंग’चा खोडा घालण्यात आला. अनुदानास पात्र सर्व ५८८ शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. शेतात तुषार संच लावून वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर ही अडचण निर्माण करण्यात आली. तुषार संचाचे अनुदान मिळाले असते तर ते शेतकऱ्यांना खरिपासाठी उपयोगात आले असते. आता जवळपास शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि रासायनिक खतांची खरेदी केली. यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना मोठी कसरत त्यांना करावी लागली. तुषार संचासाठी घेतलेल्या रकमेची परतफेड झाली नसतानाच आता त्यांना पेरणीसाठी पैसा जुळवावा लागला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाविषयी कमालीचा रोष आहे. (वार्ताहर)काय आहे ‘एम्बासिंग’?एका संचावर दोन वेळा अनुदान दिले जावू नये किंवा घेवू नये यासाठी संचावर विशिष्ट ओळख तयार केली जाते. तुषार संच पाईपच्या जोडावर, फिमेल पोर्टवर शेतकऱ्याचे नाव, गाव, संच बसविल्याचे वर्ष लिहिले जाते. ही माहिती वितरकाकडून संच हस्तांतरित करण्यापूर्वी कोरून टाकली जाते. यानंतर त्यावर रंग दिला जातो. मजकूर सहजासहजी नष्ट होणार नाही, अशा पद्धतीने मजकूर कोरला जातो. हा मजकूर लिहिला असल्याची खात्री केल्यानंतरच अनुदान मंजूर केले जाते.सिंचनातून समृद्धी साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी आडाचे दीड करून तुषार संचाची खरेदी केली. प्रसंगी घरातील दागदागिनेही गहाण ठेवले. शासनाचे अनुदान मिळाल्यानंतर ते सोडवून आणता येईल, या अपेक्षेने ही सर्व तडजोड करण्यात आली. परंतु प्रशासनातील दिरंगाईमुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. आता अनुदान केव्हा मिळेल, दागिने केव्हा सोडवून आणणार, अशी विचारणा कुटुंबातील सदस्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.काही त्रुटींमुळे अनुदान देण्यास विलंब झाला. येत्या काही दिवसातच संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाईल.- प्रशांत नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ