शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्यावे

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा

यवतमाळ : ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिीनाथ कलशेट्टी यांनी केले. ते पाणी व्यवस्थापन कार्यशाळेला मार्गदर्शन करीत होते.पाणी मनुष्याचे जीवन आहे. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. पावसाळा आला की पाणी प्रदूषणाला सुरुवात होते. दूषित पाणी पिल्यामुळे साथ रोगाचा उद्रेक होतो. जिल्ह्यातील साथ रोगांना नियंत्रित करण्यासाठी पावसाळापूर्व नियोजन म्हणून पाणी व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के. झेड. राठोड, शल्य चिकित्सक डॉ.सोनोने व कार्यकारी अभियंता किरण मानकर उपस्थित होते. ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तर यांनी कामाचे योग्य नियोजन करून काम केल्यास साथ रोगांवर नियंत्रण मिळविता येईल. साथ रोग नियंत्रणात कार्यतत्परतेने काम करावे, असे आवाहन प्रवीण देशमुख यांनी केले. या वेळी शाखा अभियंता अनिल त्रिवेदी, प्रांजली नंदूरकर, सचिन मातळे, डॉ. रणमले, अरुण मोहोड, पुंजाजी देशमुख आदींनीसुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, वेगवेगळ्या विभागांचे विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तालुका स्तरावरील गटसमन्वयक व समूह समन्वयक, तालुका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)