शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्यावे

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा

यवतमाळ : ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिीनाथ कलशेट्टी यांनी केले. ते पाणी व्यवस्थापन कार्यशाळेला मार्गदर्शन करीत होते.पाणी मनुष्याचे जीवन आहे. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. पावसाळा आला की पाणी प्रदूषणाला सुरुवात होते. दूषित पाणी पिल्यामुळे साथ रोगाचा उद्रेक होतो. जिल्ह्यातील साथ रोगांना नियंत्रित करण्यासाठी पावसाळापूर्व नियोजन म्हणून पाणी व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के. झेड. राठोड, शल्य चिकित्सक डॉ.सोनोने व कार्यकारी अभियंता किरण मानकर उपस्थित होते. ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तर यांनी कामाचे योग्य नियोजन करून काम केल्यास साथ रोगांवर नियंत्रण मिळविता येईल. साथ रोग नियंत्रणात कार्यतत्परतेने काम करावे, असे आवाहन प्रवीण देशमुख यांनी केले. या वेळी शाखा अभियंता अनिल त्रिवेदी, प्रांजली नंदूरकर, सचिन मातळे, डॉ. रणमले, अरुण मोहोड, पुंजाजी देशमुख आदींनीसुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, वेगवेगळ्या विभागांचे विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तालुका स्तरावरील गटसमन्वयक व समूह समन्वयक, तालुका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)