शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्यावे

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा

यवतमाळ : ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिीनाथ कलशेट्टी यांनी केले. ते पाणी व्यवस्थापन कार्यशाळेला मार्गदर्शन करीत होते.पाणी मनुष्याचे जीवन आहे. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. पावसाळा आला की पाणी प्रदूषणाला सुरुवात होते. दूषित पाणी पिल्यामुळे साथ रोगाचा उद्रेक होतो. जिल्ह्यातील साथ रोगांना नियंत्रित करण्यासाठी पावसाळापूर्व नियोजन म्हणून पाणी व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के. झेड. राठोड, शल्य चिकित्सक डॉ.सोनोने व कार्यकारी अभियंता किरण मानकर उपस्थित होते. ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तर यांनी कामाचे योग्य नियोजन करून काम केल्यास साथ रोगांवर नियंत्रण मिळविता येईल. साथ रोग नियंत्रणात कार्यतत्परतेने काम करावे, असे आवाहन प्रवीण देशमुख यांनी केले. या वेळी शाखा अभियंता अनिल त्रिवेदी, प्रांजली नंदूरकर, सचिन मातळे, डॉ. रणमले, अरुण मोहोड, पुंजाजी देशमुख आदींनीसुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, वेगवेगळ्या विभागांचे विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तालुका स्तरावरील गटसमन्वयक व समूह समन्वयक, तालुका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)