शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

ग्रामपंचायतींना मिळाला विकासकामांसाठी निधी; या वर्षातील पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:38 IST

Yavatmal : बंधित, अबंधितसाठी ५३ कोटी रुपये प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ग्रामीण भागाच्या विकासासाठी वित्त आयोगाकडून थेट ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. या वर्षातील १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा झाला असून, पदाधिकारी जोमात आले आहे, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासकराज असल्याने त्यांना मात्र निधीपासून वंचितच राहावे लागले आहेत.

वित्त आयोगाचा ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येत असल्याने मालामाल होत आहे. त्यातुलनेत जिल्हा परिषद व पंचायत समितींची केवळ दहा टक्क्यांवरच बोळवण होत आली आहे. अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रशासकराज आहे. यामुळे त्यांना या निधीवर पाणी फेरावे लागत आहे. नुकताच बंधित व अबंधित कामासाठी ५३ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. २०२४-२५ या वर्षातील हा पहिलाच हप्ता आहे. निधी कधी मिळणार याकडे गावपुढाऱ्याचे लक्ष लागले होते. मात्र, निधी मिळाल्याने त्यांना गावात विकासकामे करता येणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामाचे प्रस्ताव तयार करून वर्क ऑर्डर काढण्याचा खटाटोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून होणार आहे.

बंधितसाठी ३२ कोटी ४३ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून सार्वजनिक शौचालय, बंदिस्त नाली, कंपोस्ट खत, शोष खड्डे, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आदी कामे करता येणार आहेत.

आठ ग्रामपंचायतींना नाही मिळाला निधी प्रशासकराज असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितींना  १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही. जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीत प्रशासक असल्याने त्यांनाही निधी मिळाला नाही. बंधित व अंबधित बाबींवर खर्च करण्याचे निर्देश असतात.

१५ व्या वित्त आयोगाचे अखेरचे वर्ष मार्च २०२० मध्ये १४ वा वित्त आयोगाचा कालावधी संपला. त्यानंतर पाच वर्षासाठी एप्रिल २०२०-२१ ते मार्च २०२४-२५ साठी १५ वा वित्त आयोग आला. त्याचाही कालावधी मार्च २०२५ मध्ये संपणार असून, त्यानंतर १६ वा वित्त आयोग सुरू होणार आहे. 

कात्री लावल्याचा संशयग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात वित्त आयोगाचा निधी येतो. यंदा हा निधी सप्टेंबर महिन्यात ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला. नेहमीपेक्षा कमी निधी जमा झाला. निधीला कात्री लावल्याचा संशय ग्रामसेवकां- कडून व्यक्त होत आहे,

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळgram panchayatग्राम पंचायत