शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

जिल्ह्यातील ग्रामपंचायती होणार ‘स्मार्ट’

By admin | Updated: December 22, 2016 00:06 IST

प्रत्येक कामात पारदर्शकता यावी म्हणून शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

३२ गावे कॅशलेस : जिल्हा परिषदेने उचलले पाऊल, राज्य शासन पुरविणार स्वाईप मशीन रूपेश उत्तरवार यवतमाळ प्रत्येक कामात पारदर्शकता यावी म्हणून शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आता नवीन वर्षात ‘स्मार्ट’ ग्रामची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३२ गावे कॅशलेस करण्यासाठी जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. या गावांना राज्य शासन स्वाईप मशीन पुरविणार आहे. राज्यात स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तसा अध्यादेश पंचायत विभागात धडकला. गावातील स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक व आरोग्य विषयक जागृती करून ग्रामपंचायतींच्या स्वयंसमृद्धिसाठी यातून प्रयत्न केले जाणार आहे. या योजनेत गावाची लोकसंख्या, पायाभूत सुविधा यांचा विचार केला जाणार आहे. मोठी ग्रामपंचायत, आदिवासी ग्रामपंचायत, शहरालगतची ग्रामपंचायत, पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायती, असे वर्गीकरण करून ग्रामपंचायतींची निवड केली जाणार आहे. स्वच्छता, व्यवस्थापन, दायीत्व, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण व पारदर्शकता, यावर अधिक भर दिला जाणार आहे. तालुका स्तरावरील स्मार्ट ग्रामपंचायतीला १०, तर जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे. डिसेंबरपासून स्मार्ट ग्रामच्या कामाला सुरूवात झाली. २६ जानेवारीला तालुक्यातील विजेत्या गावांची नावे घोषित होईल, तर १ मे रोजी जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम घोषित होणार आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतींमध्ये स्मार्ट ग्रामची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ग्रामसभा घेतल्या जात आहेत. या संपूर्ण कामावर गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. ३२ गावांमध्ये कॅशलेस पणाली कॅशलेस महाराष्ट्राच्या दृष्टीनेही राज्याने पावले उचलली आहे. या योजनेचा एक भाग म्हणून नवीन वर्षारंभापासून स्वस्तधान्य दुकानात कॅशलेस व्यवहार होणार आहे. सर्वच ठिकाणी हा व्यवहार शक्य नाही. यामुळे प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये स्वाईप मशीन बसविल्या जाणार आहे. या स्वाईप मशीन राज्य शासन पुरविणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची याकरिता निवड करण्यात आली आहे. तेथील ग्राहकांना आता स्वस्त धान्य खरेदी करताना पैसे न देता धान्याची उचल करता येणार अहे. त्यासाठी मोाईलचा वापर केला जाणार आहे. मोबाईल कसा हाताळायचा, बँक खात्यातून पैसे कसे काढायचे, याची माहिती देण्यासाठी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात रविवारी प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सहकारी बँकांना कॅशलेसमधून वगळले स्वस्त धान्य दुकानातून कॅशलेस व्यवहार करण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यासाठी कोड नंबर देण्यात आले. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उल्लेख नाही. परिणामी जिल्हा सहकारी बँकेचे खाते असणाऱ्यार ग्राहकांना कॅशलेस प्रणालीत व्यवहार करता येणार नाही. तथापि स्वस्त धान्य उचलणाऱ्या बहुतांश ग्राहकांचे याच बँकेत खाते आहे. त्यामुळे ही योजना राबविताना अडचण येण्याची शक्यता आहे. आता ग्राहकांना कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे. तरच त्यांना कॅशलेसचा लाभ घेता येईल.