शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

पाणी व गृहकर वसुलीत ग्रामपंचायती माघारल्या

By admin | Updated: November 16, 2016 00:39 IST

ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या.

पदाधिकारी सुस्त : गावाच्या विकासावर परिणामनेर : ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या. या योजनांचे नियोजन सांभाळणाऱ्या ग्रामपंचायती कर वसुलीत मात्र माघारल्या आहे. त्याचा परिणाम योजनांची देखभाल व दुरुस्तीवर होत आहे. ग्रामसेवक शासकीय योजनेचा लाभ आणि दाखला देतेवेळी कर भरण्यासंदर्भात बोलतो. परंतु इतरवेळी कर वसुलीसाठी कष्ट उचलताना दिसत नाही. पंचायत समितीचे अधिकारीही या ग्रामसेवकांना कर वसुलीसाठी तंबी देत नसल्याने पाणी कर, गृहकर वसुलीचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. ग्रामपंचायतीचा मुख्य कणा म्हणून सचिव असतो. मात्र सचिवच मुख्यालयी न राहता शहरातून ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध नसल्याचे अनेक बाबीवरून दिसून येते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवितात. या योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविली जाते. याविषयात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बेजबाबदार बनल्या आहेत. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी दिले जाणारे ब्लिचिंग पावडरही ग्रामपंचायती नेत नाही. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची आदर्श आकारणी करून नियमित वसूल करण्याची जबाबदारी सचिवांची असते. परंतु सचिवच गावाला दांडी मारत महिन्यात दहा ते पंधरा दिवस गावात जातात. कर वसुलीला ठेंगा ग्रामसचिवच दाखवित आहे. त्यातच पदाधिकारी, गृह व पाणी कर वसुलीसाठी प्रयत्न करीत नाही.ग्रामपंचायतीने कर वसुली करून उत्पन्न वाढवावे, जेणेकरून गाव विकासाला मदत होईल, अशी भूमिका बजावत नाही. कर वसुलीसाठी ग्रामसेवक आणि पदाधिकारी पुढाकार घेत नसल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या बाबतीत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)