शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व गृहकर वसुलीत ग्रामपंचायती माघारल्या

By admin | Updated: November 16, 2016 00:39 IST

ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या.

पदाधिकारी सुस्त : गावाच्या विकासावर परिणामनेर : ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या. या योजनांचे नियोजन सांभाळणाऱ्या ग्रामपंचायती कर वसुलीत मात्र माघारल्या आहे. त्याचा परिणाम योजनांची देखभाल व दुरुस्तीवर होत आहे. ग्रामसेवक शासकीय योजनेचा लाभ आणि दाखला देतेवेळी कर भरण्यासंदर्भात बोलतो. परंतु इतरवेळी कर वसुलीसाठी कष्ट उचलताना दिसत नाही. पंचायत समितीचे अधिकारीही या ग्रामसेवकांना कर वसुलीसाठी तंबी देत नसल्याने पाणी कर, गृहकर वसुलीचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. ग्रामपंचायतीचा मुख्य कणा म्हणून सचिव असतो. मात्र सचिवच मुख्यालयी न राहता शहरातून ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध नसल्याचे अनेक बाबीवरून दिसून येते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवितात. या योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविली जाते. याविषयात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बेजबाबदार बनल्या आहेत. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी दिले जाणारे ब्लिचिंग पावडरही ग्रामपंचायती नेत नाही. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची आदर्श आकारणी करून नियमित वसूल करण्याची जबाबदारी सचिवांची असते. परंतु सचिवच गावाला दांडी मारत महिन्यात दहा ते पंधरा दिवस गावात जातात. कर वसुलीला ठेंगा ग्रामसचिवच दाखवित आहे. त्यातच पदाधिकारी, गृह व पाणी कर वसुलीसाठी प्रयत्न करीत नाही.ग्रामपंचायतीने कर वसुली करून उत्पन्न वाढवावे, जेणेकरून गाव विकासाला मदत होईल, अशी भूमिका बजावत नाही. कर वसुलीसाठी ग्रामसेवक आणि पदाधिकारी पुढाकार घेत नसल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या बाबतीत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)