शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

राज्यपाल साहेब, बीटीचे नवे तंत्रज्ञान द्या; शेतकरी घालणार साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 10:42 IST

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलपती असलेल्या महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या यवतमाळ दौऱ्याकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देबोंडअळीच्या आक्रमणाने कपाशीचा खरीप हंगाम बुडाला

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलपती असलेल्या महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या यवतमाळ दौऱ्याकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बीटीच्या नव्या तंत्रज्ञानाची या कापूस उत्पादकांंना प्रतीक्षा आहे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळातील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या इमारत लोकार्पणासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. कुलपती विद्यासागर राव यांनी आपल्या चारही कृषी विद्यापीठातील तमाम संशोधकांना बियाण्यांच्या नव्या संशोधनाची जबाबदारी द्यावी, अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे. या विद्यापीठांनी बियाण्यांबाबत खरोखरच किती संशोधन केले, हाच मुळात संशोधनाचा विषय ठरावा, अशी विदारक स्थिती आहे. विदर्भात कृषी विद्यापीठ असतानाही तेथील संशोधकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविता आल्या नाही. शेतकऱ्यांना सक्षम पर्याय उभे करून देता आलेले नाही.बीटी तंत्रज्ञानाचा दावा करणाऱ्या कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. आतापर्यंत पाना-फुलावर दिसणारी ही अळी यावेळी चक्क बोंडाच्या आत शिरली. त्यामुळे बीटी बियाणे कंपन्यांचे दावे फोल ठरले. शेतकरी देशोधाडीला लागला. कपाशीवर आलेल्या अळ्यांचा कीटकनाशक फवारणीद्वारे मुकाबला करताना खुद्द शेतकरीच धारातिर्थी पडले. यंदाचा हंगाम पूर्णत: बेकार गेला. कपाशीच्या शेतात ट्रॅक्टर घालून उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शेतकऱ्यांना आता पुढील हंगामाची चिंता सतावू लागली आहे. कृषी विद्यापीठांनी बीटीचे नवे तंत्रज्ञान हंगामापूर्वी शोधून काढावे, त्यासाठी राज्यपालांनी स्वत: संशोधकांच्या खांद्यावर ही जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळेच बुधवारी राज्यपाल काही दिलासादायक घोषणा करतात काय याकडेही नजरा लागल्या आहेत.

पर्यायी पीक द्या, अथवा दराची हमी द्याशेतकऱ्यांना कापसाच्या पिकाचा पूर्णत: अभ्यास आहे. यामुळे कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कापसाला पर्यायी पीक लावायचे झाले तर त्या पिकाचे हमीदर निश्चित असणे गरजेचे आहे. लागवडीपूर्वीच हे दर जाहीर झाल्यास शेतकरी त्या दृष्टीने विचार करतील.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी