शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शासन बळीराजा चेतना अभियान गुंडाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 21:53 IST

शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे.

ठळक मुद्दे२४ जुलै अंतिम मुदत : मुदतवाढ की, दुसऱ्या योजनेत विलिनीकरण?

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रयोगाला लगाम लागणार आहे.सदर अभियान राबविण्यासाठी दरवर्षी ३२ कोटी रूपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात तीन वर्षात जिल्ह्याला कधीही ३२ कोटींची रक्कम एकमुस्त मिळाली नाही. शेवटच्या वर्षी तर अभियानासाठी निधी वळता करताना सरकारने आखडता हात घेतला. निधीअभावी बळीराजा चेतना अभियानाचे गाव पातळीवरील कार्यक्रम थांबले. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, कीर्तन, प्रबोधन मेळावे, स्वच्छता अभियान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वर्ग १ मधील १०१ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या अधिकाऱ्यांकडे १०१ महसूल मंडळे दत्तक देण्यात आली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यावर हे अधिकारी काम करणार होते. प्रारंभी काही दिवस हे काम चालले. नंतर बैठका बंद झाल्या. शैक्षणिक अडचण आणि कॅन्सरग्रस्त रूग्णांना मदतीचे वाटप अभियानातून करण्यात आली. सामूहिक विवाह मेळावे पार पडले. मात्र या मेळाव्याचा निधी अडकला आहे.लोकसहभागातून लाखोंचा निधीअभियानाच्या अंमलबजावणीसाठी लोकसहभागातून लाखोंचा निधी गोळा झाला. यातून कामाला गती मिळाली होती. नंतर अभियानाची गती मंदावली. यामुळे अभियानाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. गावपातळीवर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पाच हजारापर्यंत मदत देण्याच्या सूचना होत्या. या निधी वाटपात गावपातळीवर हेराफेरी झाल्याच्या तक्रारी जिल्हा आल्या. यानंतर अभियानाच्या कामाची गती मंदावली.ग्रामपंचायतींना अद्यापही पुस्तकांची प्रतीक्षाबळीराजा चेतना अभियानातून जाणीव जागृतीसाठी ग्रामपंचायतीमध्ये वाचनालयाची संकल्पना मांडण्यात आली. १८४८ ग्रामपंचायतींसाठी १०१ पुस्तकांचा संच तयार करण्यात आला. प्रत्यक्षात २०० सार्वजनिक वाचनालयांना ही पुस्तके मिळाली. मात्र ग्रामपंचायतीच्या वाचनालयांना ही पुस्तके अद्यापही मिळालेली नाहीत.नानाजी देशमुख अभियानात विलिनीकरणाच्या हालचालीशासकीय स्तरावर नानाजी देशमुख अभियान राज्य शासनाने नव्याने हाती घेतले आहे. बळीराजा चेतना अभियानाची मुदत संपत आहे. यामुळे या अभियानाला नव्याने मुदतवाढ देण्याऐवजी नानाजी देशमुख अभियानात विलीन करण्याच्या हालचाली सुरू आहे. प्रत्यक्षात राज्य शासन काय निर्णय घेणार, यावरच हे अभियान अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीgram panchayatग्राम पंचायत