शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

शासन बळीराजा चेतना अभियान गुंडाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 21:53 IST

शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे.

ठळक मुद्दे२४ जुलै अंतिम मुदत : मुदतवाढ की, दुसऱ्या योजनेत विलिनीकरण?

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रयोगाला लगाम लागणार आहे.सदर अभियान राबविण्यासाठी दरवर्षी ३२ कोटी रूपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात तीन वर्षात जिल्ह्याला कधीही ३२ कोटींची रक्कम एकमुस्त मिळाली नाही. शेवटच्या वर्षी तर अभियानासाठी निधी वळता करताना सरकारने आखडता हात घेतला. निधीअभावी बळीराजा चेतना अभियानाचे गाव पातळीवरील कार्यक्रम थांबले. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, कीर्तन, प्रबोधन मेळावे, स्वच्छता अभियान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वर्ग १ मधील १०१ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या अधिकाऱ्यांकडे १०१ महसूल मंडळे दत्तक देण्यात आली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यावर हे अधिकारी काम करणार होते. प्रारंभी काही दिवस हे काम चालले. नंतर बैठका बंद झाल्या. शैक्षणिक अडचण आणि कॅन्सरग्रस्त रूग्णांना मदतीचे वाटप अभियानातून करण्यात आली. सामूहिक विवाह मेळावे पार पडले. मात्र या मेळाव्याचा निधी अडकला आहे.लोकसहभागातून लाखोंचा निधीअभियानाच्या अंमलबजावणीसाठी लोकसहभागातून लाखोंचा निधी गोळा झाला. यातून कामाला गती मिळाली होती. नंतर अभियानाची गती मंदावली. यामुळे अभियानाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. गावपातळीवर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पाच हजारापर्यंत मदत देण्याच्या सूचना होत्या. या निधी वाटपात गावपातळीवर हेराफेरी झाल्याच्या तक्रारी जिल्हा आल्या. यानंतर अभियानाच्या कामाची गती मंदावली.ग्रामपंचायतींना अद्यापही पुस्तकांची प्रतीक्षाबळीराजा चेतना अभियानातून जाणीव जागृतीसाठी ग्रामपंचायतीमध्ये वाचनालयाची संकल्पना मांडण्यात आली. १८४८ ग्रामपंचायतींसाठी १०१ पुस्तकांचा संच तयार करण्यात आला. प्रत्यक्षात २०० सार्वजनिक वाचनालयांना ही पुस्तके मिळाली. मात्र ग्रामपंचायतीच्या वाचनालयांना ही पुस्तके अद्यापही मिळालेली नाहीत.नानाजी देशमुख अभियानात विलिनीकरणाच्या हालचालीशासकीय स्तरावर नानाजी देशमुख अभियान राज्य शासनाने नव्याने हाती घेतले आहे. बळीराजा चेतना अभियानाची मुदत संपत आहे. यामुळे या अभियानाला नव्याने मुदतवाढ देण्याऐवजी नानाजी देशमुख अभियानात विलीन करण्याच्या हालचाली सुरू आहे. प्रत्यक्षात राज्य शासन काय निर्णय घेणार, यावरच हे अभियान अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीgram panchayatग्राम पंचायत