शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

सरकारच निर्माण करतेय स्फोटक परिस्थिती - सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:29 IST

जाती-धर्माच्या मुद्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

नेर (यवतमाळ) : आरक्षण असो अथवा इतर मुद्दे विविध जाती समूहांना एकमेकांसमोर उभे करून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडूनच सुरू आहे. नागरिकांनी या मागचे कारस्थान ओळखून सरकारला विकासाच्या मुद्यावर प्रश्न विचारावेत, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.

नेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी रात्री आयोजित महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या. यावेळी मंचावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख यांच्यासह बाबू पाटील जैत, संतोष ढवळे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, रविपाल गंधे, सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर राठोड आदींची उपस्थिती होती. माझ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस वाट बघत आहेत. मात्र, मला कशाची भीती नसल्याचे सांगत यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्रश्न ‘जैसे थे’ आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा घणाघात अंधारे यांनी केला. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्याच पैशातून सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अंधारे यांनी जोरदार टीका केली. भाजपने दोन पक्ष फोडले. मात्र, त्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागल्याचे त्या म्हणाल्या. पोहरादेवीसारख्या पवित्र ठिकाणीही सरकारकडून राजकारण खेळले जात आहे. तेथे तोंड बघून निधीचे वितरण केले जात असून महंत सुनील महाराजांच्या परिसरात निधी दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता जाती-धर्माच्या नावावर ते मते मागायला येतील. मात्र, यामध्ये गुरफुटून न जाता तुम्ही पोटा-पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारा. अदानी, अंबानींच्या मुलांना ज्या दर्जाचे शिक्षण मिळते ते शिक्षण कष्टकऱ्यांच्या मुलांना कधी मिळणार, असा सवाल करीत या सरकारच्या काळात महाराष्ट्राची सर्वस्तरात पीछेहाट झाल्याचे त्या म्हणाल्या.

प्रारंभी संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कापसाचे दर पडले आहे, तीच परिस्थिती सोयाबीनची आहे. दुसरीकडे महागाई वाढली असून हा संताप नागरिकांनी येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSushma Andhareसुषमा अंधारेYavatmalयवतमाळState Governmentराज्य सरकार