शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

सरकारच निर्माण करतेय स्फोटक परिस्थिती - सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:29 IST

जाती-धर्माच्या मुद्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

नेर (यवतमाळ) : आरक्षण असो अथवा इतर मुद्दे विविध जाती समूहांना एकमेकांसमोर उभे करून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडूनच सुरू आहे. नागरिकांनी या मागचे कारस्थान ओळखून सरकारला विकासाच्या मुद्यावर प्रश्न विचारावेत, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.

नेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी रात्री आयोजित महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या. यावेळी मंचावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख यांच्यासह बाबू पाटील जैत, संतोष ढवळे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, रविपाल गंधे, सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर राठोड आदींची उपस्थिती होती. माझ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस वाट बघत आहेत. मात्र, मला कशाची भीती नसल्याचे सांगत यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्रश्न ‘जैसे थे’ आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा घणाघात अंधारे यांनी केला. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्याच पैशातून सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अंधारे यांनी जोरदार टीका केली. भाजपने दोन पक्ष फोडले. मात्र, त्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागल्याचे त्या म्हणाल्या. पोहरादेवीसारख्या पवित्र ठिकाणीही सरकारकडून राजकारण खेळले जात आहे. तेथे तोंड बघून निधीचे वितरण केले जात असून महंत सुनील महाराजांच्या परिसरात निधी दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता जाती-धर्माच्या नावावर ते मते मागायला येतील. मात्र, यामध्ये गुरफुटून न जाता तुम्ही पोटा-पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारा. अदानी, अंबानींच्या मुलांना ज्या दर्जाचे शिक्षण मिळते ते शिक्षण कष्टकऱ्यांच्या मुलांना कधी मिळणार, असा सवाल करीत या सरकारच्या काळात महाराष्ट्राची सर्वस्तरात पीछेहाट झाल्याचे त्या म्हणाल्या.

प्रारंभी संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कापसाचे दर पडले आहे, तीच परिस्थिती सोयाबीनची आहे. दुसरीकडे महागाई वाढली असून हा संताप नागरिकांनी येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSushma Andhareसुषमा अंधारेYavatmalयवतमाळState Governmentराज्य सरकार