शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आदिवासी बांधवांच्या ४४० कोटींच्या खावटी कर्जाचा सरकारला विसर; राज्यभरात नाराजीचा सूर

By रूपेश उत्तरवार | Updated: January 12, 2023 11:47 IST

११ लाख बांधवांपुढे पेच

यवतमाळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात मिळावा म्हणून दरवर्षी खावटी कर्ज वितरित केले जाते. मात्र, २०२२ मध्ये राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी कर्ज मिळालेच नाही. या कर्जाचा सरकारला विसर पडल्याचा आरोप होत आहे. नव्याने खावटी कर्जाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. चार हजार रुपयांप्रमाणे ११ लाख ५० हजार बांधवांना खावटी कर्जासाठी ४४० कोटी रुपये लागणार आहेत.

१९७० मध्ये राज्यात आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज योजना हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्यात धान्य नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमार ओढावत होती. अशावेळी मदतीचा हात म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज दिले जात होते. यामध्ये धान्य आणि रोख रकमेचा समावेश होता. कोरोनाकाळात आदिवासी बांधवांना ५० टक्के धान्य आणि ५० टक्के आर्थिक मदत या स्वरूपात खावटी कर्ज देण्यात आले. मात्र, २०२२ मध्ये खावटी कर्ज मिळाले नाही.

या खावटी कर्जावर आदिवासींचे वार्षिक नियोजन विसंबून राहते. मिळणारी मदत या कुटुंबासाठी मोलाची आहे; परंतु ही मदत न मिळाल्याने आदिवासी बांधवांची निराशा झाली आहे. २०२१ मध्ये खावटी कर्ज योजनेच्या माध्यमातून ७० टक्के धान्य आणि ३० टक्के आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये चवळी, मीठ, तूर डाळ, चना, मटकी, उडीद डाळ, वटाणा, साखर, गरम मसाला, मिरची पावडर, चहा पावडर आणि तेलाचा समावेश होता.

आदिवासी विकास विभागाकडून नव्याने खावटी कर्जाचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठविला जाणार आहे. त्यामध्ये एका कुटुंबाला चार हजार रुपयांचे खावटी कर्ज देण्याचे नियोजन आहे. यामध्ये ७० टक्के धान्य आणि ३० टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे यावेळी गहू आणि तांदूळ देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे; परंतु अद्याप निर्णय झालेला नाही.

पावसाळ्यापूर्वी याबाबत निर्णय झाला तरच २०२३ मध्ये खावटी कर्जाची रक्कम आणि धान्य आदिवासी बांधवांच्या पदरात पडण्यास हातभार लागणार आहे.

..तर कुपोषण टळेल

आदिवासी बांधव दऱ्या-खोऱ्यात आणि दुर्गम भागात राहतात. त्यांना शासनाकडून खावटी कर्ज मिळाले तर पूरक पोषण आहार मिळेल. यामुळे होणारे कुपोषण टळण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.

आदिवासी विकास विभागाने खावटी कर्जासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतलेले आहे. चार हजार रुपयांप्रमाणे खावटी कर्ज देण्यात यावे, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव असणार आहे. त्यामध्ये ७० टक्के धान्य आणि ३० टक्के रोख रक्कम असणार आहे.

- जयराम राठोड, महाव्यवस्थापक आदिवासी विकास विभाग, नाशिक

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार