शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

आदिवासी बांधवांच्या ४४० कोटींच्या खावटी कर्जाचा सरकारला विसर; राज्यभरात नाराजीचा सूर

By रूपेश उत्तरवार | Updated: January 12, 2023 11:47 IST

११ लाख बांधवांपुढे पेच

यवतमाळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात मिळावा म्हणून दरवर्षी खावटी कर्ज वितरित केले जाते. मात्र, २०२२ मध्ये राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी कर्ज मिळालेच नाही. या कर्जाचा सरकारला विसर पडल्याचा आरोप होत आहे. नव्याने खावटी कर्जाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. चार हजार रुपयांप्रमाणे ११ लाख ५० हजार बांधवांना खावटी कर्जासाठी ४४० कोटी रुपये लागणार आहेत.

१९७० मध्ये राज्यात आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज योजना हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्यात धान्य नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमार ओढावत होती. अशावेळी मदतीचा हात म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज दिले जात होते. यामध्ये धान्य आणि रोख रकमेचा समावेश होता. कोरोनाकाळात आदिवासी बांधवांना ५० टक्के धान्य आणि ५० टक्के आर्थिक मदत या स्वरूपात खावटी कर्ज देण्यात आले. मात्र, २०२२ मध्ये खावटी कर्ज मिळाले नाही.

या खावटी कर्जावर आदिवासींचे वार्षिक नियोजन विसंबून राहते. मिळणारी मदत या कुटुंबासाठी मोलाची आहे; परंतु ही मदत न मिळाल्याने आदिवासी बांधवांची निराशा झाली आहे. २०२१ मध्ये खावटी कर्ज योजनेच्या माध्यमातून ७० टक्के धान्य आणि ३० टक्के आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये चवळी, मीठ, तूर डाळ, चना, मटकी, उडीद डाळ, वटाणा, साखर, गरम मसाला, मिरची पावडर, चहा पावडर आणि तेलाचा समावेश होता.

आदिवासी विकास विभागाकडून नव्याने खावटी कर्जाचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठविला जाणार आहे. त्यामध्ये एका कुटुंबाला चार हजार रुपयांचे खावटी कर्ज देण्याचे नियोजन आहे. यामध्ये ७० टक्के धान्य आणि ३० टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे यावेळी गहू आणि तांदूळ देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे; परंतु अद्याप निर्णय झालेला नाही.

पावसाळ्यापूर्वी याबाबत निर्णय झाला तरच २०२३ मध्ये खावटी कर्जाची रक्कम आणि धान्य आदिवासी बांधवांच्या पदरात पडण्यास हातभार लागणार आहे.

..तर कुपोषण टळेल

आदिवासी बांधव दऱ्या-खोऱ्यात आणि दुर्गम भागात राहतात. त्यांना शासनाकडून खावटी कर्ज मिळाले तर पूरक पोषण आहार मिळेल. यामुळे होणारे कुपोषण टळण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.

आदिवासी विकास विभागाने खावटी कर्जासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतलेले आहे. चार हजार रुपयांप्रमाणे खावटी कर्ज देण्यात यावे, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव असणार आहे. त्यामध्ये ७० टक्के धान्य आणि ३० टक्के रोख रक्कम असणार आहे.

- जयराम राठोड, महाव्यवस्थापक आदिवासी विकास विभाग, नाशिक

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार