शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

आदिवासी बांधवांच्या ४४० कोटींच्या खावटी कर्जाचा सरकारला विसर; राज्यभरात नाराजीचा सूर

By रूपेश उत्तरवार | Updated: January 12, 2023 11:47 IST

११ लाख बांधवांपुढे पेच

यवतमाळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात मिळावा म्हणून दरवर्षी खावटी कर्ज वितरित केले जाते. मात्र, २०२२ मध्ये राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी कर्ज मिळालेच नाही. या कर्जाचा सरकारला विसर पडल्याचा आरोप होत आहे. नव्याने खावटी कर्जाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. चार हजार रुपयांप्रमाणे ११ लाख ५० हजार बांधवांना खावटी कर्जासाठी ४४० कोटी रुपये लागणार आहेत.

१९७० मध्ये राज्यात आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज योजना हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्यात धान्य नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमार ओढावत होती. अशावेळी मदतीचा हात म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज दिले जात होते. यामध्ये धान्य आणि रोख रकमेचा समावेश होता. कोरोनाकाळात आदिवासी बांधवांना ५० टक्के धान्य आणि ५० टक्के आर्थिक मदत या स्वरूपात खावटी कर्ज देण्यात आले. मात्र, २०२२ मध्ये खावटी कर्ज मिळाले नाही.

या खावटी कर्जावर आदिवासींचे वार्षिक नियोजन विसंबून राहते. मिळणारी मदत या कुटुंबासाठी मोलाची आहे; परंतु ही मदत न मिळाल्याने आदिवासी बांधवांची निराशा झाली आहे. २०२१ मध्ये खावटी कर्ज योजनेच्या माध्यमातून ७० टक्के धान्य आणि ३० टक्के आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये चवळी, मीठ, तूर डाळ, चना, मटकी, उडीद डाळ, वटाणा, साखर, गरम मसाला, मिरची पावडर, चहा पावडर आणि तेलाचा समावेश होता.

आदिवासी विकास विभागाकडून नव्याने खावटी कर्जाचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठविला जाणार आहे. त्यामध्ये एका कुटुंबाला चार हजार रुपयांचे खावटी कर्ज देण्याचे नियोजन आहे. यामध्ये ७० टक्के धान्य आणि ३० टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे यावेळी गहू आणि तांदूळ देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे; परंतु अद्याप निर्णय झालेला नाही.

पावसाळ्यापूर्वी याबाबत निर्णय झाला तरच २०२३ मध्ये खावटी कर्जाची रक्कम आणि धान्य आदिवासी बांधवांच्या पदरात पडण्यास हातभार लागणार आहे.

..तर कुपोषण टळेल

आदिवासी बांधव दऱ्या-खोऱ्यात आणि दुर्गम भागात राहतात. त्यांना शासनाकडून खावटी कर्ज मिळाले तर पूरक पोषण आहार मिळेल. यामुळे होणारे कुपोषण टळण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.

आदिवासी विकास विभागाने खावटी कर्जासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतलेले आहे. चार हजार रुपयांप्रमाणे खावटी कर्ज देण्यात यावे, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव असणार आहे. त्यामध्ये ७० टक्के धान्य आणि ३० टक्के रोख रक्कम असणार आहे.

- जयराम राठोड, महाव्यवस्थापक आदिवासी विकास विभाग, नाशिक

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार