शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

केरळ पूरग्रस्तांना मदतीस शासकीय कर्मचाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:02 IST

केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे.

ठळक मुद्देथेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना पैसे देणार नव्या पेन्शन योजनेचा आठ लाख कर्मचारी काढणार वचपा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. आपले एक दिवसाचे वेतन मदत निधीसाठी कापू नये, असे लेखी नकारपत्र या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजना लादल्याचा वचपा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे.२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. त्याऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लादण्यात आली आहे. ही योजना रद्द करून जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी गेल्या पाच वर्षापासून कर्मचारी रस्त्यावर उतरून झगडत आहे. मात्र शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. डीसीपीएसमुळे कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या कुटुंबीयांची अजीबात काळजी न करणारे महाराष्ट्र शासन आता आमच्याकडून केरळच्या मदतीसाठी पैसे कापण्यासाठी कसे सरसावले, असा प्रतिप्रश्न नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे.शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, लिपीक अशा जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांचा या संघटनेत समावेश आहे. संघटनेने केरळसाठी वेतन कपातीस लेखी नकारपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० कर्मचाऱ्यांनी आपल्या विभाग प्रमुखांकडे हे नकारपत्र सोपविले आहे.२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करणाऱ्या जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपुढे आज जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे राज्य शासन ढुंकूनही पाहायला तयार नाही. त्यामुळेच जुनी पेन्शन योजना लागू न करणाऱ्या शासनाला धडा शिकविण्यासाठी केरळ मदतीस नकार देत असल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नदीम पटेल यांनी सांगितले.

थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना पैसे देणारमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना वेतनातून मदत निधी देण्याचे आवाहन केले आहे. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अनुभव वाईट असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी शेतकऱ्यांना मदतीच्या नावाने वेतन कपात करण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना २०० ते ४०० रुपयेच देण्यात आले. त्यामुळे आता केरळच्या मदतीसाठी आमच्या वेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे घेतले जाऊ नये, त्याऐवजी आम्ही राज्यस्तरावर निधी एकत्र करून थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करू, असे मत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नदीम पटेल यांनी व्यक्त केले.

सरकारवर नफेखोरीचा आरोपमहाराष्ट्र सरकार केरळ पूरपीडितांना २५ कोटी मदत देणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार आहे. राज्य शासनाचे जवळपास १८ लाख कर्मचारी असून त्यांच्या वेतन कपातीतून शासन सुमारे २७५ कोटी जमा करणार आहे. त्यामुळे केरळला मदत देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासन चक्क २५० कोटींचा नफा करून घेणार आहे, असा आरोप जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नेते करीत आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर