शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पूरग्रस्तांना मदतीस शासकीय कर्मचाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:02 IST

केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे.

ठळक मुद्देथेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना पैसे देणार नव्या पेन्शन योजनेचा आठ लाख कर्मचारी काढणार वचपा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र राज्यभरातील सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. आपले एक दिवसाचे वेतन मदत निधीसाठी कापू नये, असे लेखी नकारपत्र या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजना लादल्याचा वचपा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे.२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. त्याऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लादण्यात आली आहे. ही योजना रद्द करून जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी गेल्या पाच वर्षापासून कर्मचारी रस्त्यावर उतरून झगडत आहे. मात्र शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. डीसीपीएसमुळे कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या कुटुंबीयांची अजीबात काळजी न करणारे महाराष्ट्र शासन आता आमच्याकडून केरळच्या मदतीसाठी पैसे कापण्यासाठी कसे सरसावले, असा प्रतिप्रश्न नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे.शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, लिपीक अशा जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांचा या संघटनेत समावेश आहे. संघटनेने केरळसाठी वेतन कपातीस लेखी नकारपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० कर्मचाऱ्यांनी आपल्या विभाग प्रमुखांकडे हे नकारपत्र सोपविले आहे.२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करणाऱ्या जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपुढे आज जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे राज्य शासन ढुंकूनही पाहायला तयार नाही. त्यामुळेच जुनी पेन्शन योजना लागू न करणाऱ्या शासनाला धडा शिकविण्यासाठी केरळ मदतीस नकार देत असल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नदीम पटेल यांनी सांगितले.

थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना पैसे देणारमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना वेतनातून मदत निधी देण्याचे आवाहन केले आहे. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अनुभव वाईट असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी शेतकऱ्यांना मदतीच्या नावाने वेतन कपात करण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना २०० ते ४०० रुपयेच देण्यात आले. त्यामुळे आता केरळच्या मदतीसाठी आमच्या वेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे घेतले जाऊ नये, त्याऐवजी आम्ही राज्यस्तरावर निधी एकत्र करून थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करू, असे मत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नदीम पटेल यांनी व्यक्त केले.

सरकारवर नफेखोरीचा आरोपमहाराष्ट्र सरकार केरळ पूरपीडितांना २५ कोटी मदत देणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार आहे. राज्य शासनाचे जवळपास १८ लाख कर्मचारी असून त्यांच्या वेतन कपातीतून शासन सुमारे २७५ कोटी जमा करणार आहे. त्यामुळे केरळला मदत देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासन चक्क २५० कोटींचा नफा करून घेणार आहे, असा आरोप जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नेते करीत आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर