शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Updated: April 16, 2016 01:55 IST

नैसगिक आपत्तीत शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता येणाऱ्या संकटाचा सामना धिराने करावा, सरकार आपल्या पाठीशी आहे,

किशोर तिवारी : मुळावा येथे ‘सरकार आपल्या दारी’ मुळावा : नैसगिक आपत्तीत शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता येणाऱ्या संकटाचा सामना धिराने करावा, सरकार आपल्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे केले.उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे सरकार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किशोर तिवारी यांनी महसूल, कृषी, ग्रामविकास, महावितरण, पोलीस, आरोग्य, शिक्षण विभागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच आदिवासी शेतकरी, शेतमजूर विधवांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंडितराव पांगरकर यांनी इसापूर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची मागणी केली. तिवारी यांनी माहिती घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन केले. तसेच कोणतेही समस्या आल्यास माझ्याशी संपर्क साधा असेही सांगितले.कार्यक्रमात राम पाठक, रामराव जामकर, मंचकराव कदम, कुमार कानडे, रमेश शिंदे, अविनाश कदम आदींनी समस्या मांडल्या. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला, तहसीलदार भगवान कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता टेकाळे, वीज वितरणचे उपअभियंता राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पवार, पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, दुय्यम निबंधक पी.डी. दहीवाळ, ग्रामसेवक एस.पी. बोंडे, टी.एस. माने, के.डी. बारकड, तलाठी जनार्दन सावळकर, मंडल अधिकारी राजेंद्र मून, शहाजी खडसे उपस्थित होते. (वार्ताहर)