शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

माल व्यापार्‍यांचा, सातबारा शेतकर्‍यांचा

By admin | Updated: May 22, 2014 01:35 IST

शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

घाटंजी : शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे. यावर व्यापारी धार्जीण्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कुठलेही नियंत्रण नाही. परिणामी दिवसेंदिवस शेतकरी नाडवला जात आहे. सध्या खरिपाची लगबग सुरू आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज आहे. याच बाबींचा गैरफायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर १५ ते २0 दिवसांपासून ६0 ते ७0 शेतकर्‍यांनी हरभरा विकायला आणला आहे. जवळपास एक हजार २00 ते एक हजार ५00 क्विंटल हरभरा याठिकाणी पडून आहे. हा शेतमाल खरेदी करावा, यासाठी शेतकरी बाजार समितीकडे अर्ज, विनंत्या करत आहे. एकीकडे शेतकर्‍यांचा माल खरेदीस टाळाटाळ केली जात आहे तर दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल मात्र खरेदी होत आहे. व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दरात खरेदी करतात. हाच माल व्यापारी शेतकर्‍यांच्या सातबारावर जादा दराने विकतात.

एकीकडे शेतकर्‍यांच्या मालाला भाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल जादा दराने खरेदी करायचा हे धोरण बाजार समितीने अवलंबिले आहे. प्रशासक आणि सचिव जाणीवपूर्वक शेतकर्‍यांचा माल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी शेतकर्‍यांनी उठाव केला असता तालुका सहायक निबंधकांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी सचिवाने हरभरा खरेदी करण्याची परवानगी सोमवारपर्यंंतच असल्याचे सांगितले. यावर निबंधकांनी १५-२0 दिवसांपासून पडून असलेल्या हरभरा खरेदी का केला नाही, असा प्रश्न केला. त्यावर प्रशासक आणि सचिव उत्तर देऊ शकले नाही. त्याचवेळी निबंधकांनी तत्काळ खरेदी करण्याच्या सूचना सचिवांना केल्या. मात्र व्यापारी धार्जीण्या सचिव आणि प्रशासकाने हा आदेश धुडकावून लावला.

शेतकर्‍यांना खरिपासाठी बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी माल विकणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन त्यांची अडवणूक सुरू आहे. प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)