शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

माल व्यापार्‍यांचा, सातबारा शेतकर्‍यांचा

By admin | Updated: May 22, 2014 01:35 IST

शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

घाटंजी : शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे. यावर व्यापारी धार्जीण्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कुठलेही नियंत्रण नाही. परिणामी दिवसेंदिवस शेतकरी नाडवला जात आहे. सध्या खरिपाची लगबग सुरू आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज आहे. याच बाबींचा गैरफायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर १५ ते २0 दिवसांपासून ६0 ते ७0 शेतकर्‍यांनी हरभरा विकायला आणला आहे. जवळपास एक हजार २00 ते एक हजार ५00 क्विंटल हरभरा याठिकाणी पडून आहे. हा शेतमाल खरेदी करावा, यासाठी शेतकरी बाजार समितीकडे अर्ज, विनंत्या करत आहे. एकीकडे शेतकर्‍यांचा माल खरेदीस टाळाटाळ केली जात आहे तर दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल मात्र खरेदी होत आहे. व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दरात खरेदी करतात. हाच माल व्यापारी शेतकर्‍यांच्या सातबारावर जादा दराने विकतात.

एकीकडे शेतकर्‍यांच्या मालाला भाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल जादा दराने खरेदी करायचा हे धोरण बाजार समितीने अवलंबिले आहे. प्रशासक आणि सचिव जाणीवपूर्वक शेतकर्‍यांचा माल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी शेतकर्‍यांनी उठाव केला असता तालुका सहायक निबंधकांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी सचिवाने हरभरा खरेदी करण्याची परवानगी सोमवारपर्यंंतच असल्याचे सांगितले. यावर निबंधकांनी १५-२0 दिवसांपासून पडून असलेल्या हरभरा खरेदी का केला नाही, असा प्रश्न केला. त्यावर प्रशासक आणि सचिव उत्तर देऊ शकले नाही. त्याचवेळी निबंधकांनी तत्काळ खरेदी करण्याच्या सूचना सचिवांना केल्या. मात्र व्यापारी धार्जीण्या सचिव आणि प्रशासकाने हा आदेश धुडकावून लावला.

शेतकर्‍यांना खरिपासाठी बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी माल विकणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन त्यांची अडवणूक सुरू आहे. प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)