शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माल व्यापार्‍यांचा, सातबारा शेतकर्‍यांचा

By admin | Updated: May 22, 2014 01:35 IST

शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

घाटंजी : शेतकर्‍यांच्या पडत्या बाजूचा फायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे. यावर व्यापारी धार्जीण्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कुठलेही नियंत्रण नाही. परिणामी दिवसेंदिवस शेतकरी नाडवला जात आहे. सध्या खरिपाची लगबग सुरू आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज आहे. याच बाबींचा गैरफायदा व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर १५ ते २0 दिवसांपासून ६0 ते ७0 शेतकर्‍यांनी हरभरा विकायला आणला आहे. जवळपास एक हजार २00 ते एक हजार ५00 क्विंटल हरभरा याठिकाणी पडून आहे. हा शेतमाल खरेदी करावा, यासाठी शेतकरी बाजार समितीकडे अर्ज, विनंत्या करत आहे. एकीकडे शेतकर्‍यांचा माल खरेदीस टाळाटाळ केली जात आहे तर दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल मात्र खरेदी होत आहे. व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दरात खरेदी करतात. हाच माल व्यापारी शेतकर्‍यांच्या सातबारावर जादा दराने विकतात.

एकीकडे शेतकर्‍यांच्या मालाला भाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे व्यापार्‍यांचा माल जादा दराने खरेदी करायचा हे धोरण बाजार समितीने अवलंबिले आहे. प्रशासक आणि सचिव जाणीवपूर्वक शेतकर्‍यांचा माल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी शेतकर्‍यांनी उठाव केला असता तालुका सहायक निबंधकांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी सचिवाने हरभरा खरेदी करण्याची परवानगी सोमवारपर्यंंतच असल्याचे सांगितले. यावर निबंधकांनी १५-२0 दिवसांपासून पडून असलेल्या हरभरा खरेदी का केला नाही, असा प्रश्न केला. त्यावर प्रशासक आणि सचिव उत्तर देऊ शकले नाही. त्याचवेळी निबंधकांनी तत्काळ खरेदी करण्याच्या सूचना सचिवांना केल्या. मात्र व्यापारी धार्जीण्या सचिव आणि प्रशासकाने हा आदेश धुडकावून लावला.

शेतकर्‍यांना खरिपासाठी बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी माल विकणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन त्यांची अडवणूक सुरू आहे. प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)