शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 00:22 IST

शेतात राबत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावलेल्या दोन आजींची यशोगाथा.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : गुणवत्तेवर कुणाची मक्तेदारी थोडीच असते? संधी मिळाली तर गरीबही शेवटच्या चेंडूवर सिक्सर हाणू शकतो. होय, वावरात काबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजींनीही यंदा परीक्षा दिली अन् नुसती परीक्षाच दिली नाहीतर चक्क ९८ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावला आहे.

काय म्हणता हे खरे नाही? तर वाचा आता सविस्तर.... हातात कधीही पाटीपुस्तक न धरलेल्या, कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उतारवयात शिक्षणाची संधी मिळताच संधीचे सोने करणाऱ्या या आजी एकट्याच नाहीत बरं का! त्या आहेत दोघी. एकीचे नाव आहे मिरा मोतिराम पेंदोर. तिचे वय आहे ५५ वर्षे. अन् दुसरीचे नाव आहे सुशिला पुंजाराम ढोक. तिचे वय आहे ६५ वर्षे. अन् दोघींनीही गुण मिळविलेत ९८ टक्के ! 

दहावी-बारावीच्या परीक्षेत शिकवणी लावून मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नव्हे. तर प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील ‘टाॅप’ वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे. प्रौढ असाक्षरांना शिकवून १७ मार्च रोजी त्यांची १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील एकंदर १२ हजार ४५२ प्रौढांनी पेपर दिला. त्यातील ११ हजार २७१ प्रौढांनी बाजी मारली. पण त्यातल्या त्यात मिरा पेंदोर आणि सुशिला ढोक या दोन आजीबाईंनी चक्क ९८ टक्के गुण घेत शिक्षण यंत्रणेलाही चकीत करुन टाकले आहे. या वयात एका ठिकाणी स्थिर बसून बारीक अक्षरे पाहून वाचणे, लिहिणे तसे कठीणच असते. पण या आजींनी तब्बल दोन तासांचा पेपर एकाग्रचित्ताने सोडविला अन् गुणवत्तेचा षटकार मारला ! 

कोण आहेत या आजीबाई?यातील सुशिला पुंजाराम ढोक या ६५ वर्षांच्या आजी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ गावच्या. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी परीक्षा दिली. वृद्ध पती, दोन मुले, एक मुलगी, नातू अशा गोतावळ्यात त्या रमलेल्या. घरच्या चार एकर वावरात याही वयात त्या राबतात. तर मिरा मोतिराम पेंदोर या ५५ वर्षांच्या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार गावच्या. परिस्थिती बेताचीच. आयुष्यभर शिकण्याची संधीच मिळाली नाही. यंदा संधी येताच अकोलाबाजारच्या केके स्प्रिंगडेल शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी पेपर दिला.

पटकावले पैकीच्या पैकी गुण ! १५० गुणांच्या परीक्षेत ५०-५० गुणांचे तीन पेपर होते. त्यात सुशिला ढोक यांनी एकंदर १४६ गुण मिळविले. वाचन आणि लेखन या दोन पेपरमध्ये ५० पैकी ५० गुण मिळविले. तर संख्याज्ञानात त्यांना ४६ गुण मिळाले. मिरा पेंदोर यांनीही १४७ गुणांची कमाई केली. त्यात लेखनाच्या पेपरमध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण आहेत. वाचनात ४९ आणि संख्याज्ञानाच्या पेपरमध्ये ४८ गुण मिळाले.

स्वत:हून केला अभ्यासघारफळच्या शाळेत सुशिला ढोक यांची असाक्षर परीक्षार्थी म्हणून नोंद झाली होती. त्यामुळे शिक्षक आणि नव भारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांनी वेळोवेळी घरी येऊन सुशिला आजीला शिकविले. पण आजीला स्वत: शिक्षणाची ओढ लागल्याने त्यांनी स्वत:हून बराच अभ्यास केला. परीक्षा आहे असे कळल्यावर तर त्यांनी अभ्यास वाढविला, असे सुशिला ढोक यांच्या नातीने सांगितले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ