शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 00:22 IST

शेतात राबत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावलेल्या दोन आजींची यशोगाथा.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : गुणवत्तेवर कुणाची मक्तेदारी थोडीच असते? संधी मिळाली तर गरीबही शेवटच्या चेंडूवर सिक्सर हाणू शकतो. होय, वावरात काबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजींनीही यंदा परीक्षा दिली अन् नुसती परीक्षाच दिली नाहीतर चक्क ९८ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावला आहे.

काय म्हणता हे खरे नाही? तर वाचा आता सविस्तर.... हातात कधीही पाटीपुस्तक न धरलेल्या, कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उतारवयात शिक्षणाची संधी मिळताच संधीचे सोने करणाऱ्या या आजी एकट्याच नाहीत बरं का! त्या आहेत दोघी. एकीचे नाव आहे मिरा मोतिराम पेंदोर. तिचे वय आहे ५५ वर्षे. अन् दुसरीचे नाव आहे सुशिला पुंजाराम ढोक. तिचे वय आहे ६५ वर्षे. अन् दोघींनीही गुण मिळविलेत ९८ टक्के ! 

दहावी-बारावीच्या परीक्षेत शिकवणी लावून मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नव्हे. तर प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील ‘टाॅप’ वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे. प्रौढ असाक्षरांना शिकवून १७ मार्च रोजी त्यांची १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील एकंदर १२ हजार ४५२ प्रौढांनी पेपर दिला. त्यातील ११ हजार २७१ प्रौढांनी बाजी मारली. पण त्यातल्या त्यात मिरा पेंदोर आणि सुशिला ढोक या दोन आजीबाईंनी चक्क ९८ टक्के गुण घेत शिक्षण यंत्रणेलाही चकीत करुन टाकले आहे. या वयात एका ठिकाणी स्थिर बसून बारीक अक्षरे पाहून वाचणे, लिहिणे तसे कठीणच असते. पण या आजींनी तब्बल दोन तासांचा पेपर एकाग्रचित्ताने सोडविला अन् गुणवत्तेचा षटकार मारला ! 

कोण आहेत या आजीबाई?यातील सुशिला पुंजाराम ढोक या ६५ वर्षांच्या आजी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ गावच्या. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी परीक्षा दिली. वृद्ध पती, दोन मुले, एक मुलगी, नातू अशा गोतावळ्यात त्या रमलेल्या. घरच्या चार एकर वावरात याही वयात त्या राबतात. तर मिरा मोतिराम पेंदोर या ५५ वर्षांच्या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार गावच्या. परिस्थिती बेताचीच. आयुष्यभर शिकण्याची संधीच मिळाली नाही. यंदा संधी येताच अकोलाबाजारच्या केके स्प्रिंगडेल शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी पेपर दिला.

पटकावले पैकीच्या पैकी गुण ! १५० गुणांच्या परीक्षेत ५०-५० गुणांचे तीन पेपर होते. त्यात सुशिला ढोक यांनी एकंदर १४६ गुण मिळविले. वाचन आणि लेखन या दोन पेपरमध्ये ५० पैकी ५० गुण मिळविले. तर संख्याज्ञानात त्यांना ४६ गुण मिळाले. मिरा पेंदोर यांनीही १४७ गुणांची कमाई केली. त्यात लेखनाच्या पेपरमध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण आहेत. वाचनात ४९ आणि संख्याज्ञानाच्या पेपरमध्ये ४८ गुण मिळाले.

स्वत:हून केला अभ्यासघारफळच्या शाळेत सुशिला ढोक यांची असाक्षर परीक्षार्थी म्हणून नोंद झाली होती. त्यामुळे शिक्षक आणि नव भारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांनी वेळोवेळी घरी येऊन सुशिला आजीला शिकविले. पण आजीला स्वत: शिक्षणाची ओढ लागल्याने त्यांनी स्वत:हून बराच अभ्यास केला. परीक्षा आहे असे कळल्यावर तर त्यांनी अभ्यास वाढविला, असे सुशिला ढोक यांच्या नातीने सांगितले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ