शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 00:22 IST

शेतात राबत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावलेल्या दोन आजींची यशोगाथा.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : गुणवत्तेवर कुणाची मक्तेदारी थोडीच असते? संधी मिळाली तर गरीबही शेवटच्या चेंडूवर सिक्सर हाणू शकतो. होय, वावरात काबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजींनीही यंदा परीक्षा दिली अन् नुसती परीक्षाच दिली नाहीतर चक्क ९८ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावला आहे.

काय म्हणता हे खरे नाही? तर वाचा आता सविस्तर.... हातात कधीही पाटीपुस्तक न धरलेल्या, कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उतारवयात शिक्षणाची संधी मिळताच संधीचे सोने करणाऱ्या या आजी एकट्याच नाहीत बरं का! त्या आहेत दोघी. एकीचे नाव आहे मिरा मोतिराम पेंदोर. तिचे वय आहे ५५ वर्षे. अन् दुसरीचे नाव आहे सुशिला पुंजाराम ढोक. तिचे वय आहे ६५ वर्षे. अन् दोघींनीही गुण मिळविलेत ९८ टक्के ! 

दहावी-बारावीच्या परीक्षेत शिकवणी लावून मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नव्हे. तर प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील ‘टाॅप’ वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे. प्रौढ असाक्षरांना शिकवून १७ मार्च रोजी त्यांची १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील एकंदर १२ हजार ४५२ प्रौढांनी पेपर दिला. त्यातील ११ हजार २७१ प्रौढांनी बाजी मारली. पण त्यातल्या त्यात मिरा पेंदोर आणि सुशिला ढोक या दोन आजीबाईंनी चक्क ९८ टक्के गुण घेत शिक्षण यंत्रणेलाही चकीत करुन टाकले आहे. या वयात एका ठिकाणी स्थिर बसून बारीक अक्षरे पाहून वाचणे, लिहिणे तसे कठीणच असते. पण या आजींनी तब्बल दोन तासांचा पेपर एकाग्रचित्ताने सोडविला अन् गुणवत्तेचा षटकार मारला ! 

कोण आहेत या आजीबाई?यातील सुशिला पुंजाराम ढोक या ६५ वर्षांच्या आजी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ गावच्या. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी परीक्षा दिली. वृद्ध पती, दोन मुले, एक मुलगी, नातू अशा गोतावळ्यात त्या रमलेल्या. घरच्या चार एकर वावरात याही वयात त्या राबतात. तर मिरा मोतिराम पेंदोर या ५५ वर्षांच्या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार गावच्या. परिस्थिती बेताचीच. आयुष्यभर शिकण्याची संधीच मिळाली नाही. यंदा संधी येताच अकोलाबाजारच्या केके स्प्रिंगडेल शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी पेपर दिला.

पटकावले पैकीच्या पैकी गुण ! १५० गुणांच्या परीक्षेत ५०-५० गुणांचे तीन पेपर होते. त्यात सुशिला ढोक यांनी एकंदर १४६ गुण मिळविले. वाचन आणि लेखन या दोन पेपरमध्ये ५० पैकी ५० गुण मिळविले. तर संख्याज्ञानात त्यांना ४६ गुण मिळाले. मिरा पेंदोर यांनीही १४७ गुणांची कमाई केली. त्यात लेखनाच्या पेपरमध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण आहेत. वाचनात ४९ आणि संख्याज्ञानाच्या पेपरमध्ये ४८ गुण मिळाले.

स्वत:हून केला अभ्यासघारफळच्या शाळेत सुशिला ढोक यांची असाक्षर परीक्षार्थी म्हणून नोंद झाली होती. त्यामुळे शिक्षक आणि नव भारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांनी वेळोवेळी घरी येऊन सुशिला आजीला शिकविले. पण आजीला स्वत: शिक्षणाची ओढ लागल्याने त्यांनी स्वत:हून बराच अभ्यास केला. परीक्षा आहे असे कळल्यावर तर त्यांनी अभ्यास वाढविला, असे सुशिला ढोक यांच्या नातीने सांगितले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ