शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वन व्यवस्थापनाच्या हिशेबात गौडबंगाल

By admin | Updated: November 13, 2014 23:07 IST

यवतमाळ वनवृत्तातील वन व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात शासनाची लाखो रुपयांची रक्कम अनेक वर्षांपासून पडून असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या समित्यांनी हा निधी खर्चही केला नाही

वनवृत्तात ९९१ समित्या : लाखोंचा निधी पडून, आॅडिटही नाहीयवतमाळ : यवतमाळ वनवृत्तातील वन व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात शासनाची लाखो रुपयांची रक्कम अनेक वर्षांपासून पडून असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या समित्यांनी हा निधी खर्चही केला नाही किंवा शासनाला परतही केला नाही. या निधीच्या खर्चात गौडबंगाल असल्याचीही माहिती आहे. यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी २ नोव्हेंबरला पांढरकवडा, ३ ला पुसद, ४ ला अकोला तर ५ नोव्हेंबरला यवतमाळ वनविभागाची आढावा बैठक घेतली. त्यात अवैध वृक्षतोड, बीट निहाय स्थिती, वन गुन्हा प्रकरणांचा निपटारा, वन गुन्ह्यांची नोंदणी, न्यायालयीन प्रकरणे, जप्त वाहने व त्यांची विल्हेवाट, साहित्य खरेदी, दोषारोपपत्र, प्रलंबित प्रकरणे, वन जमिनीवरील अतिक्रमण, त्यांची न्यायालयीन प्रकरणे, जमीन महसूल कारवाई, कॅम्पाअंतर्गत पर्यायी वनीकरण व रोपवन कामे, पूर्व पावसाळी कामे, रोपवाटिका, उपचार नकाशे अंदाजपत्रके, कुपांची तोडणी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीला दिलेले अनुदान, झालेला खर्च, शिल्लक रकमा आदी मुद्यांवर आढावा घेतला. त्यावेळी काही गंभीर प्रकार उघडकीस आले. यवतमाळ वनवृत्तातील चार विभागात ९९१ संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. त्यामध्ये अकोला विभागात २३५, पांढरकवडा २४१, पुसद २४५ तर यवतमाळ वन विभागातील २७० वन व्यवस्थापन समित्यांचा समावेश आहे. त्यातील १५७ समित्या शंभर टक्के कार्यरत आहेत. ३७८ समित्या काही प्रमाणात कार्यरत आहेत. मात्र तब्बल ४५६ वन व्यवस्थापन समित्या सक्रियच नसल्याचे दिसून आले. १९९८ पासून वनवृत्तात वन व्यवस्थापन समित्या टप्प्याटप्प्याने स्थापन करण्यात आल्या. गावातील प्रत्येक कुटुंबातील एक जण या समितीचा सदस्य असून त्यातूनच कार्यकारी समिती निवडली गेली. त्यापैकीच एक या समितीचा अध्यक्ष ठरला. तर सचिवाची जबाबदारी वनपालाकडे देण्यात आली. अध्यक्ष-सचिवांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनाचा निधी खर्च केला गेला. त्याचे आॅडिटही झालेले नाही. हा निधी वापरला गेला नाही किंवा शासनाला परतही केला गेला नाही. समितीचे सचिव असलेल्या काही वनपालांची बदली झाली, कुणी सेवानिवृत्त झाले तर काही निलंबित झाले. त्यामुळे या समित्यांचेच आर्थिक व्यवस्थापन कोलमडले. या समित्यांच्या निधीवर संपूर्ण नियंत्रणाची जबाबदारी उपवनसंरक्षकांची होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या सर्वबाबी मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांच्या आढावा बैठकीत उघड झाल्यानंतर त्यांनी संबंधित वन अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. या समित्यांमार्फत खर्च झालेल्या निधीतही बऱ्याच भानगडी असल्याचे समजते. आॅडिटच झाले नसल्याने या भानगडी व आर्थिक गोंधळावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आजही सक्रिय असलेल्या समित्यांना त्यांच्या उद्दीष्ट व मागणीच्या प्रस्तावानुसार शासन निधी देते. मात्र त्याचे नियमित आॅडिट होत नसल्याने गैरव्यवहार दडपले जात असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)