शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

२६ वर्षांनंतर पोहोचले गोखी प्रकल्पाचे पाणी

By admin | Updated: April 16, 2016 01:59 IST

अकोलाबाजार : मुख्य कालवा शेतातून असूनही पिकांना सिंचन करण्यासाठी पाणी मिळत नव्हते.

अकोलाबाजार : मुख्य कालवा शेतातून असूनही पिकांना सिंचन करण्यासाठी पाणी मिळत नव्हते. कामठवाडा शिवारातील शेतकरी अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी करीत होते. परंतु अकोलाबाजार शिवाराच्यापुढे पाणी चढत नसल्यामुळे शेतकरी आतापर्यंत रबी पिकापासून वंचित होते. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेऊन तब्बल २६ वर्षानंतर पाटबंधारे विभागाकडून मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात आली असून कामठवाडा, कुऱ्हाड शिवारापर्यंत ५९ किलोमीटरची लाईन टाकून प्रकल्पाचे पाणी सोडून नुकतीच चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना आपल्या शेतात रबी पिकांच्या सिंचनासाठी लाभ घेता येणार आहे.गोखी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची लांबी ६४ किलोमीटर असून आतापर्यंत अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे कामठवाडापर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहे. २०१६-१७ च्या रबी हंगामसाठी वितरिका, गेट व पाटसरी दुरुस्ती करून मुख्य कालव्याची ६४ किलोमीटरपर्यंत दुरुस्ती करण्याची मागणी आहे. आतापर्यंत ५१ किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांना रबीसाठी सुरळीत पाणी मिळत असून २०१६-१७ पासून खैरगाव, मांजर्डा व कामठवाडाच्या १४०० हेक्टरमध्ये शेतकऱ्यांना रबी हंगामात सिंचन करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून कामठवाडा येथे सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन केले. पाणी पोहचत असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. (वार्ताहर)