शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

२६ वर्षांनंतर पोहोचले गोखी प्रकल्पाचे पाणी

By admin | Updated: April 16, 2016 01:59 IST

अकोलाबाजार : मुख्य कालवा शेतातून असूनही पिकांना सिंचन करण्यासाठी पाणी मिळत नव्हते.

अकोलाबाजार : मुख्य कालवा शेतातून असूनही पिकांना सिंचन करण्यासाठी पाणी मिळत नव्हते. कामठवाडा शिवारातील शेतकरी अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी करीत होते. परंतु अकोलाबाजार शिवाराच्यापुढे पाणी चढत नसल्यामुळे शेतकरी आतापर्यंत रबी पिकापासून वंचित होते. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेऊन तब्बल २६ वर्षानंतर पाटबंधारे विभागाकडून मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात आली असून कामठवाडा, कुऱ्हाड शिवारापर्यंत ५९ किलोमीटरची लाईन टाकून प्रकल्पाचे पाणी सोडून नुकतीच चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना आपल्या शेतात रबी पिकांच्या सिंचनासाठी लाभ घेता येणार आहे.गोखी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची लांबी ६४ किलोमीटर असून आतापर्यंत अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे कामठवाडापर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहे. २०१६-१७ च्या रबी हंगामसाठी वितरिका, गेट व पाटसरी दुरुस्ती करून मुख्य कालव्याची ६४ किलोमीटरपर्यंत दुरुस्ती करण्याची मागणी आहे. आतापर्यंत ५१ किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांना रबीसाठी सुरळीत पाणी मिळत असून २०१६-१७ पासून खैरगाव, मांजर्डा व कामठवाडाच्या १४०० हेक्टरमध्ये शेतकऱ्यांना रबी हंगामात सिंचन करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून कामठवाडा येथे सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन केले. पाणी पोहचत असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. (वार्ताहर)