शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

 सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचा - पालकमंत्री मदन येरावार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 18:15 IST

सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

यवतमाळ - सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्रोतगृह सभागृहात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर, सहकारी बँकेचे संचालक नितीन खर्चे, सहकार भारतीचे अध्यक्ष अमित भिसे, सुदर्शन भालेराव, राजू जाधव, उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.देशाला सहकार क्षेत्राची ओळख महाराष्ट्राने करून दिली, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, “बिना सहकार, नाही उध्दार” ऐवजी आता “ बिना संस्कार…नाही सहकार” असा विचार करण्याची गरज आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या विचारावर मार्गक्रमण केले तर समाजातील शेवटच्या उपेक्षित माणसापर्यंत लाभ पोहचण्यास मदत होईल. सर्वसामान्य शेतक-यांचा जवळचा संबंध सहकार क्षेत्रासोबत येत असतो. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या जवळपास 4 लक्ष 60 हजार ऐवढी आहे. कर्जमाफीसाठी या सर्व शेतक-यांची जनसुविधा केंद्र, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टल, विविध सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्याने ऑनलाईन नोंदणी करण्यात यश आले. कनेक्टिव्हीटीची समस्या असूनसुध्दा त्यावर मात करीत दीड महिन्यात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केला आहे. या माध्यमातून सहकार चळवळीचा शेवटच्या माणसासाठी उपयोग व्हावा यासाठी सहकार परिषद अधिक भक्कम होणे काळाची गरज आहे. शेखर सरेगावकर यांनी सहकार क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा. सहकाराबद्दल एक भावना निर्माण होण्यासाठी संपूर्ण विदर्भात सहकार परिषदेचे आयोजन होत आहे. विकासाचा रथ शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार योजना, कृषी मार्गदर्शन योजना, अंत्योदय, घरकूल जागा खरेदी योजना, सौभाग्य बिजली योजना आदी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांच्या कल्याणसाठी सरकार संवेदनशील असून त्यासाठी सहकार भारतीसारख्या संस्थांची जोड आवश्यक आहे. तूर खरेदीला प्रथमच सरकारने मुदतवाढ दिली आहे. उडीद, मूग, कापूस, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतरच शेतक-यांनी आपला माल खरेदीसाठी आणणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतक-यांना खरेदीसाठी आता तात्काळत बसावे लागणार नाही. शेतक-यांचे हित जोपासणे महत्वाचे असून सरकार त्यादृष्टीने वाटचाल करीत आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला बँक, विविध पतसंस्था जनहिताचे काम करीत आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सहकारी संस्था, विविध पतसंस्था, महिला बँक आदींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

31 ऑक्टो. रोजी एकता दौडचे आयोजन31 ऑक्टो. 2017 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात येणार आहे. या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने 31 ऑक्टो. रोजी सकाळी 7.30 वाजता समता मैदान येथून एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. या एकता दौडमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार