शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

भारतीय तृण धान्याला जगभरातून मागणी; शेतकऱ्यांना मिळणार आठ लाख किट्स

By रूपेश उत्तरवार | Updated: May 26, 2023 08:00 IST

Nagpur News राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर तृणधान्याची किट दिली जाणार आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने हाती घेतले आहे.

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जागतिक पातळीवर साजरे केले जात आहे. मात्र, जगभरात तृणधान्याचा तुटवडा आहे. दुसरीकडे राज्यात तृणधान्याचे उत्पादन भुईसपाट झाले आहे. याला पुनरुज्जीवित करण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर किट दिली जाणार आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने हाती घेतले आहे.

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आराेग्य उत्तम राखण्यासाठी तृणधान्य हे पौष्टिक धान्य म्हणून ऊर्जा प्रदान करते. यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा आणि कोदो या धान्याचा समावेश आहे. यामुळे जगभरात या धान्याची मागणी वाढली आहे. तृणधान्याची मागणी वाढत असताना उत्पादन मात्र शून्य होण्याच्या वाटेवर आहे. शेतकरी अशा धान्याची लागवडच करीत नाही. बाजारात या धान्याला मागणी असतानाही याचे उत्पादन होत नाही, ही बाब लक्षात घेता, कृषी विभागाने याच्या मिनी किट तयार केल्या आहेत. त्या १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

यात खरीप ज्वारीचे बियाणे २०० ग्रॅम, बाजरी १०० ग्रॅम, राजगिरा १०० ग्रॅम, राळा २०० ग्रॅम आणि कोदो २०० ग्रॅम बियाणे दिले जाणार आहे. यातून उत्पादित धान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे. याशिवाय यातून बियाणे तयार करून पुढील दोन वर्षे शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येणार आहे. यामुळे तृणधान्याचे बियाणे घरीच तयार करता येणार आहे. अशा आठ लाख किट राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्याला तृणधान्याच्या दोन लाख किट दिल्या जाणार आहेत. यातून तृणधान्याची लागवड वाढेल. याच्या उत्पादकतेत भर पडण्यास मदत होणार आहे.

अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेती