शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

भारतीय तृण धान्याला जगभरातून मागणी; शेतकऱ्यांना मिळणार आठ लाख किट्स

By रूपेश उत्तरवार | Updated: May 26, 2023 08:00 IST

Nagpur News राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर तृणधान्याची किट दिली जाणार आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने हाती घेतले आहे.

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जागतिक पातळीवर साजरे केले जात आहे. मात्र, जगभरात तृणधान्याचा तुटवडा आहे. दुसरीकडे राज्यात तृणधान्याचे उत्पादन भुईसपाट झाले आहे. याला पुनरुज्जीवित करण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर किट दिली जाणार आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने हाती घेतले आहे.

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आराेग्य उत्तम राखण्यासाठी तृणधान्य हे पौष्टिक धान्य म्हणून ऊर्जा प्रदान करते. यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा आणि कोदो या धान्याचा समावेश आहे. यामुळे जगभरात या धान्याची मागणी वाढली आहे. तृणधान्याची मागणी वाढत असताना उत्पादन मात्र शून्य होण्याच्या वाटेवर आहे. शेतकरी अशा धान्याची लागवडच करीत नाही. बाजारात या धान्याला मागणी असतानाही याचे उत्पादन होत नाही, ही बाब लक्षात घेता, कृषी विभागाने याच्या मिनी किट तयार केल्या आहेत. त्या १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

यात खरीप ज्वारीचे बियाणे २०० ग्रॅम, बाजरी १०० ग्रॅम, राजगिरा १०० ग्रॅम, राळा २०० ग्रॅम आणि कोदो २०० ग्रॅम बियाणे दिले जाणार आहे. यातून उत्पादित धान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे. याशिवाय यातून बियाणे तयार करून पुढील दोन वर्षे शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येणार आहे. यामुळे तृणधान्याचे बियाणे घरीच तयार करता येणार आहे. अशा आठ लाख किट राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्याला तृणधान्याच्या दोन लाख किट दिल्या जाणार आहेत. यातून तृणधान्याची लागवड वाढेल. याच्या उत्पादकतेत भर पडण्यास मदत होणार आहे.

अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेती