शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वसंत साखर कारखाना भाडे तत्त्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:05 IST

पाच तालुक्यातील १७ हजार ऊस उत्पादकांची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यास अध्यक्षांसह संचालक मंडळ राजी झाले आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळ राजी : टोकाई साखर कारखान्याच्या चेअरमनसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पाच तालुक्यातील १७ हजार ऊस उत्पादकांची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यास अध्यक्षांसह संचालक मंडळ राजी झाले आहे. यासंदर्भात टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड.शिवाजीराव जाधव यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे आता कारखाना सुरू होण्याबाबत ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गत वर्षापासून बंद पडला आहे. उमरखेड, महागाव, पुसद, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना अतिशय महत्वाचा आहे. आर्थिक विपन्नावस्थेमुळे बंद असलेला कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरु आहे. हा कारखाना मराठवाड्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेण्यास इच्छुक आहे. या संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजीराव जाधव यांच्यासोबत उमरखेडच्या कृषी महाविद्यालयात बैठक झाली.यावेळी पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत पाटील दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नाथराव कदम, पूर्णा साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव भोसले, विलासराव नादरे, अवंतिका कंपनीचे संचालक किसनराव देवरे, मनोज कनेवार, मधुकर पाष्टे, मोतीराम बोंडे, जितेंद्र महाजन, सुनील बागल, विजय पवार, टोकाई कारखान्याचे एमडी मालेगावकर, चिफ अकाऊंटंट इबितवार, शेतकी अधिकारी अशोक कदम यांच्यासह वसंतचे अध्यक्ष माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर आदी उपस्थित होते.या सर्व घडामोडीमुळे वसंतवर अवलंबून असलेले १७ हजार सभासद, कामगार, वाहन चालक, पुरवठाधारक व अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.साखर आयुक्तांकडे प्रस्तावऊस उत्पादकांचे पेमेंट, एफआरपी, बँकेचे कर्ज, कामगारांचे वेतन तसेच आजची असलेली स्थिती यावर मात करीत हा कारखाना लवकरच भाडे तत्वावर दिला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठविला जाईल, असे अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना