शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

दारू दिली, आता पाणीही द्या! यवतमाळात पालकमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:52 IST

पालकमंत्री मदन येरावार यांनी शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमहिला पोलीस कॉन्स्टेबल जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नियोजनशून्य कामाच्या पद्धतीमुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालकमंत्री मदन येरावार यांनी विशेष प्रयत्न करीत शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी  काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.सर्वप्रथम मोर्चेकरी नगरपरिषद कार्यालयापुढे गोळा झाले. तेथे पाण्याच्या मागणीसाठी घोषणा दिल्या जात असतानाच पाण्यासाठी आणखी एक मोर्चा पालिकेवर धडकला. उमरसरा, संकटमोचन रोड परिसरातील सुमारे दोनशे महिलांचा हा मोर्चा आल्यानंतर दोन्ही मोर्चेकऱ्यांनी एकत्रितरित्या पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच केले. तेथे आधीच प्रचंड पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता. दत्तचौक मागार्ने मोर्चा पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडकल्यानंतर महिलांनी सोबत आणलेले रिकामे मडके फोडून निषेध केला. एक ते दीड तास घोषणाबाजी सुरू होती. मोर्चेकऱ्यांनी पालकमंत्र्यांना फोन करून चचेर्साठी बाहेर या, म्हणून विनवणी केली. मात्र, पालकमंत्री आले नाही.पालकमंत्री न आल्याने संतप्त महिलांनी बांगड्या फोडून पालकमंत्री हाय हाय, पालकमंत्री राजीनामा द्या, या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. तर दारू दिली आता पाणीही द्या असे नारे लावत दारूच्या बॉटलही फोडण्यात आल्या. यात एक काचेचा तुकडा उडून बंदोबस्तावरील महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या डोळ्याला लागून दुखापत झाली. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना दमदाटी करून निघून जाण्यास सांगितले. शेवटी मोर्चेकरी प्रचंड घोषणाबाजी करत निघून गेले. यावेळी पालकमंत्र्यांच्या घरापुढे फुटलेल्या बांगड्या मडक्यांच्या तुकड्यांचा खच पडला होता.काँग्रेसला केवळ राजकारण करायचे आहे- पालकमंत्रीपालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बेंबळाचे पाणी आणण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत. टंचाई जनतेला आहे, कंत्राटदाराला थोडीच आहे? पाणीपुरवठ्याची तारीख मी जाहीर केली म्हणूनच काम गतीने होत आहे. तारीख दिली नसती तर वेळ लागला असता. आता काँग्रेसवाल्यांना राजकारण करायचे आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी त्यांच्या नेत्याला प्रश्न का विचारले नाही? जनता मात्र आम्हाला पूर्ण सहकार्य करीत आहे.

टॅग्स :Waterपाणी