शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जलस्रोतांचे जीआयएस मॅपिंग

By admin | Updated: April 6, 2015 00:13 IST

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जलस्रोताची संपूर्ण

जीपीएस सयंत्राचा वापर : अक्षांश-रेखांशानुसार स्रोतांचा नकाशायवतमाळ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जलस्रोताची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी जीआयएस मॅपींगव्दारे नकाशा तयार केला जात आहे. गुगल अर्थवर प्रत्येक जलस्रोताची पाणी गुणवत्तेसह संपूर्ण माहिती अपलोड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३२ गावातील स्रोतांचे अक्षांश-रेखांश निश्चित करून माहिती टाकण्यात येईल. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जलरक्षक नेमण्यात येणार आहे. जैविक आणि रासायनिक अशा दोन्ही कीटच्या माध्यमातून पाण्याची तपासणी केली जाते. त्याची प्रतवारी सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येते. प्राथमिकस्तरावरच्या तपासणीनंतर जिल्ह्यातील सहा उपविभागीय प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासण्यात येते. आता या जलस्रोतांची निगराणी ठेवण्यासाठी डिजीटल नकाशा तयार केल्या जात आहे.गुगल अर्थवर हा नकाशा जीपीएस सयंत्राच्या माध्यमातून अपलोड केला जाणार आहे. ३२ गावातील जलस्रोतांचे जीआयएस मॅपींग करून त्याच्या अक्षांश-रेखांशसह संपूर्ण माहिती गुगल अर्थवर टाकण्यात आली. हे काम सुरूवातीला पाणी गुणवत्ता सल्लागाराकडून करण्यात आले. आता संपूर्ण जिल्ह्यातीलच जलस्रोताचे मॅपींग करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांनी भूजल सर्वेक्षण विभागातील संचालक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार जीआयएस मॅपींगचे काम सुरू आहे. गुगल अर्थवर जलस्रोतातील गुणधर्माची संपूर्ण माहिती राहणार आहे. त्यात जैविक घटकांचे प्रमाण काय, रासायनिक घटक कोणते ही माहिती एका क्लिकवर होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वेळकाढूपणा आणि पाणी गुणवत्ता सनियंत्रक कार्यक्रमात अधिकाधिक सुस्पष्टता आणण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दूषीत पाणी पिल्यामुळे दुर्धर आजार बळावले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याने गंभीर समस्या निर्माण केली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जीआयएस मॅपींग पद्धतीचा चांगला उपयोग होणार आहे. जिल्ह्यातील जलस्रोताची माहिती तत्काळ मिळणार असून दूषित कोणते, त्यावर उपाययोजना कोणत्या आदीबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती मिळणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)जलजन्य आजार थांबविण्याचा प्रयत्न पाणी गुणवत्ता कार्यक्रमाच्या माध्यमातून जलजन्य आजारांचा प्रसार थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात ६० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. ते टाळण्यासाठीच जलस्रोत शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठीच जिल्हाभर अभियान राबविले जात आहे.