शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जिल्ह्यात जलस्रोतांचे जीआयएस मॅपिंग

By admin | Updated: April 6, 2015 00:13 IST

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जलस्रोताची संपूर्ण

जीपीएस सयंत्राचा वापर : अक्षांश-रेखांशानुसार स्रोतांचा नकाशायवतमाळ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जलस्रोताची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी जीआयएस मॅपींगव्दारे नकाशा तयार केला जात आहे. गुगल अर्थवर प्रत्येक जलस्रोताची पाणी गुणवत्तेसह संपूर्ण माहिती अपलोड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३२ गावातील स्रोतांचे अक्षांश-रेखांश निश्चित करून माहिती टाकण्यात येईल. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जलरक्षक नेमण्यात येणार आहे. जैविक आणि रासायनिक अशा दोन्ही कीटच्या माध्यमातून पाण्याची तपासणी केली जाते. त्याची प्रतवारी सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येते. प्राथमिकस्तरावरच्या तपासणीनंतर जिल्ह्यातील सहा उपविभागीय प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासण्यात येते. आता या जलस्रोतांची निगराणी ठेवण्यासाठी डिजीटल नकाशा तयार केल्या जात आहे.गुगल अर्थवर हा नकाशा जीपीएस सयंत्राच्या माध्यमातून अपलोड केला जाणार आहे. ३२ गावातील जलस्रोतांचे जीआयएस मॅपींग करून त्याच्या अक्षांश-रेखांशसह संपूर्ण माहिती गुगल अर्थवर टाकण्यात आली. हे काम सुरूवातीला पाणी गुणवत्ता सल्लागाराकडून करण्यात आले. आता संपूर्ण जिल्ह्यातीलच जलस्रोताचे मॅपींग करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवांनी भूजल सर्वेक्षण विभागातील संचालक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार जीआयएस मॅपींगचे काम सुरू आहे. गुगल अर्थवर जलस्रोतातील गुणधर्माची संपूर्ण माहिती राहणार आहे. त्यात जैविक घटकांचे प्रमाण काय, रासायनिक घटक कोणते ही माहिती एका क्लिकवर होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वेळकाढूपणा आणि पाणी गुणवत्ता सनियंत्रक कार्यक्रमात अधिकाधिक सुस्पष्टता आणण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दूषीत पाणी पिल्यामुळे दुर्धर आजार बळावले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याने गंभीर समस्या निर्माण केली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जीआयएस मॅपींग पद्धतीचा चांगला उपयोग होणार आहे. जिल्ह्यातील जलस्रोताची माहिती तत्काळ मिळणार असून दूषित कोणते, त्यावर उपाययोजना कोणत्या आदीबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती मिळणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)जलजन्य आजार थांबविण्याचा प्रयत्न पाणी गुणवत्ता कार्यक्रमाच्या माध्यमातून जलजन्य आजारांचा प्रसार थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात ६० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. ते टाळण्यासाठीच जलस्रोत शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठीच जिल्हाभर अभियान राबविले जात आहे.