शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

अब्बाजानच्या निकाहसाठी मुलींनीच घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

फिरोज नजर खॉं पठाण (५५) हे वणी तालुक्यातील घोन्सा येथील रहिवासी आहेत. त्यांना यास्मिन अजीज पठाण, शमा फारूख शेख, शाहिन शाकीर शेख व परवीन इरफान खान या चार विवाहित मुली आहेत. फिरोज नजर खॉं पठाण हे त्यांची दिवंगत पत्नी सुलताना यांच्यासह घोन्सा येथे वास्तव्याला होते. मात्र २७ एप्रिलला सुलताना यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि फिरोज यांच्या आयुष्याला रितेपण आले. पत्नीच्या निधनानंतर ते त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी शमा फारूख शेख यांच्या घरी राहत होते.

ठळक मुद्देवणी शहरातील अनोखी घटना : आयुष्याच्या सायंकाळी मिळाला कुटुंबाचा आधार, समाजापुढे निर्माण केला वेगळा आदर्श

 संतोष कुंडकरलोकमत न्यूज नेटवर्कवणी : तरुणपणात माणसात रग असते, ताकद असते. अशावेळी तारूण्यातील एकाकीपणाचे पान अलगद आणि सहज उलटविता येते. परंतु पत्नीची खरी गरज असते ती आयुष्याच्या सायंकाळीच. कारण वृद्धापकाळात सहचारिणीकडून मिळणारा मानसिक आधारच जगण्यासाठी प्रेरणा सदैैव देत राहतो. वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असलेल्या व सहा महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर एकाकी झालेल्या फिरोज नजर खॉ पठाण यांच्याही अंधारलेल्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी त्यांच्या चार मुलींनी पुढाकार घेतला आणि या मुलींनी रविवारी सायंकाळी एका विधवा महिलेशी आपल्या ह्यअब्बाजानह्ण चा ह्यनिकाहह्ण लावून देऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला.फिरोज नजर खॉं पठाण (५५) हे वणी तालुक्यातील घोन्सा येथील रहिवासी आहेत. त्यांना यास्मिन अजीज पठाण, शमा फारूख शेख, शाहिन शाकीर शेख व परवीन इरफान खान या चार विवाहित मुली आहेत. फिरोज नजर खॉं पठाण हे त्यांची दिवंगत पत्नी सुलताना यांच्यासह घोन्सा येथे वास्तव्याला होते. मात्र २७ एप्रिलला सुलताना यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि फिरोज यांच्या आयुष्याला रितेपण आले. पत्नीच्या निधनानंतर ते त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी शमा फारूख शेख यांच्या घरी राहत होते. वडिलांचे एकाकीपण सर्वांनाच अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे चारही मुली व जावयांनी एकत्र येऊन वडिलांना कुणाचा तरी आधार मिळावा, यासाठी त्यांचा पुन्हा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. फिरोज यांनी मात्र याला विरोध केला. मात्र नंतर तेही विवाहासाठी तयार झालेत. अशातच फिरोज यांची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी शाहिन हिच्या परिचयातील परवीन मजीद शेख या विधवा महिलेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परवीन त्यांच्या आईकडे राहतात. त्यांना वडिल नाहीत. त्यांच्या सर्व बहिणींचे लग्न झाले आहे. त्यांनीही हा प्रस्ताव मान्य केला आणि अखेर विवाहाची तारिख ठरली. रविवारी १८ आक्टोबरला सायंकाळी ५ वाजता परवीन यांच्या घरी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे हा अनोखा विवाह लावून देण्यात आला. यावेळी दोन्ही कुटुंबातील मोजके लोक उपस्थित होते. या विवाहाने समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे.

टॅग्स :marriageलग्न