शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

घाटंजीत चटणी-भाकर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:30 IST

दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले.तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे शेतकरी संतापले आहे. संतप्त शेतकरी येत्या निवडणुकीत शिल्लक ठेवलेली चटणी वापरतील. ती साखर, तूप खाणाऱ्यांना सहन होणार नाही, असा इशारा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी दिला. मोर्चा तहसीलवर धडकेल्यानंतर ते सभेत बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड.विजयाताई धोटे, मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, किरण कुमरे, शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे उपस्थित होते. नापिकीसह जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यासाठी नुकसान भरपाई कोणत्याही अटीशिवाय मिळावी, अथवा त्यासाठी विशेष विम्याची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.शैलेश इंगोले यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या मोर्चात शेतकरी चटणी-भाकर घेऊन सहभागी झाले. आदिवासी दंडारीत पारंपारिक वेशभूषेत केलेल्या नृत्यांमुळे मोर्चाने घाटंजीकरांचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तेथे शेतकऱ्यांनी मोठ्या टोपल्यात भाकरी गोळा करून तहसीलदार हामंद यांच्या स्वाधीन केल्या. भाकरींचे दान मुख्यमंत्र्यांना पोहचविण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा, आदी मागण्या यावेळी शेतकºयांनी केल्या.

टॅग्स :Morchaमोर्चा