शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

घाटंजीत चटणी-भाकर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:30 IST

दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले.तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे शेतकरी संतापले आहे. संतप्त शेतकरी येत्या निवडणुकीत शिल्लक ठेवलेली चटणी वापरतील. ती साखर, तूप खाणाऱ्यांना सहन होणार नाही, असा इशारा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी दिला. मोर्चा तहसीलवर धडकेल्यानंतर ते सभेत बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड.विजयाताई धोटे, मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, किरण कुमरे, शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे उपस्थित होते. नापिकीसह जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यासाठी नुकसान भरपाई कोणत्याही अटीशिवाय मिळावी, अथवा त्यासाठी विशेष विम्याची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.शैलेश इंगोले यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या मोर्चात शेतकरी चटणी-भाकर घेऊन सहभागी झाले. आदिवासी दंडारीत पारंपारिक वेशभूषेत केलेल्या नृत्यांमुळे मोर्चाने घाटंजीकरांचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तेथे शेतकऱ्यांनी मोठ्या टोपल्यात भाकरी गोळा करून तहसीलदार हामंद यांच्या स्वाधीन केल्या. भाकरींचे दान मुख्यमंत्र्यांना पोहचविण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा, आदी मागण्या यावेळी शेतकºयांनी केल्या.

टॅग्स :Morchaमोर्चा