शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 21:55 IST

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्देवाघाडीच्या पाण्यावर सिंचन : शहर विकास आघाडीचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. हा प्रश्न घेऊन घाटी-घाटंजी शहर विकास आघाडीने मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. तहसीलदारांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बांधकाम सभापती अनिल घोडे, आरोग्य सभापती विजय रामटेके, नगरसेवक सैयद फिरोज आदी उपस्थित होते.शहराला सन १९७५ पासून नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. वाघाडी धरणातून पाणी घेऊन शहराला पुरविले जाते. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील १.२५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित केले आहे. त्यातील ०.७५ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर नगरपरिषदेने केला आहे. ०.५० द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. आरक्षित पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. मात्र अनेक शेतकºयांनी मोटरपंपाद्वारे या पाण्याचा उपसा सिंचनासाठी करणे सुरू केले आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.नगरपरिषदेतर्फे सिंचन विभागाकडे सहा लाख रुपयांचा भरणा आरक्षित पाण्यापोटी केला जातो. याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. उपलब्ध पाणी जून २०१८ पर्यंत शहराला कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. वाघाडी धरण ते पाणी पुरवठा योजनेच्या प्लांटपर्यंत मोटारपंप बंद करण्याची कारवाई विद्युत व महसूल विभागाकडून अपेक्षित आहे.यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. वैयक्तिक स्रात आटत चालले आहे. त्यामुळे संपूर्ण भिस्त नळ योजनेवर आहे. अशातच १० ते २० हॉर्सपॉवरच्या मोटारपंपाद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेला साठा उपसला जात आहे. हा प्रश्न अधिकाºयांकडे मांडण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी