शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 21:55 IST

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्देवाघाडीच्या पाण्यावर सिंचन : शहर विकास आघाडीचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. हा प्रश्न घेऊन घाटी-घाटंजी शहर विकास आघाडीने मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. तहसीलदारांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बांधकाम सभापती अनिल घोडे, आरोग्य सभापती विजय रामटेके, नगरसेवक सैयद फिरोज आदी उपस्थित होते.शहराला सन १९७५ पासून नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. वाघाडी धरणातून पाणी घेऊन शहराला पुरविले जाते. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील १.२५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित केले आहे. त्यातील ०.७५ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर नगरपरिषदेने केला आहे. ०.५० द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. आरक्षित पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. मात्र अनेक शेतकºयांनी मोटरपंपाद्वारे या पाण्याचा उपसा सिंचनासाठी करणे सुरू केले आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.नगरपरिषदेतर्फे सिंचन विभागाकडे सहा लाख रुपयांचा भरणा आरक्षित पाण्यापोटी केला जातो. याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. उपलब्ध पाणी जून २०१८ पर्यंत शहराला कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. वाघाडी धरण ते पाणी पुरवठा योजनेच्या प्लांटपर्यंत मोटारपंप बंद करण्याची कारवाई विद्युत व महसूल विभागाकडून अपेक्षित आहे.यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. वैयक्तिक स्रात आटत चालले आहे. त्यामुळे संपूर्ण भिस्त नळ योजनेवर आहे. अशातच १० ते २० हॉर्सपॉवरच्या मोटारपंपाद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेला साठा उपसला जात आहे. हा प्रश्न अधिकाºयांकडे मांडण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी