शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

काय सांगता, ४३६ रुपयात मिळवा दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:00 IST

जीवन ज्योतीने जागविली उमेद : चार हजार नागरिक पुढे सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत ४३६ रुपयात विमा संरक्षण दिले जाते. यात विमा संरक्षण घेतलेल्या कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारात मृत्यू झाल्यास योजनेतून दोन लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. यासाठी लाभार्थ्याला दरवर्षी योजनेत समाविष्ट होण्यासाठी रिनिव्ह करावे लागणार आहे.

१८ ते ५० वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत समाविष्ट होता येते. या योजनेत समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांचे बँक खाते अथवा पोस्ट खाते असणे बंधनकारक आहे. या खात्यातून लाभार्थ्यांचे पैसे थेट विमा रकमेत वळते होतात. या योजनेत वर्षाकाठी लाभार्थ्याला ४३६ रुपये भरावे लागतात. या योजनेत विमा रक्कम जमा झाल्यानंतर वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. आतापर्यंत तीन हजार ९४४ नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. 

काय आहे प्रधानमंत्री जीवनज्योती योजना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या योजनेत ४३६ रुपयात वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अपघाती निधन झाल्यावर ही मदत मोलाची ठरते. 

क्लेम कसा आणि कुठे करणार योजनेत क्लेमसाठी पोस्टमास्तरकडे अर्ज करायचा आहे. डेथ संदर्भात नॉमिनी अर्ज करायचा आहे. यानंतर या योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या वारसाच्या खात्यात ही रक्कम वळती होते.

तीन हजार ९४४ जणांनी भरले पैसे या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ९४४ जणांनी प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेतून स्वतःचे विमा संरक्षण करून घेतले आहे. या योजनेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे. यातून कुटुंबाला मदत होणार आहे.

"या योजनेकरिता अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी मोजकीच रक्कम वर्षभरासाठी गुंतवावी लागते. यामुळे ही योजना सर्वांना सोयीची ठरणारी आहे."- गजानन जाधव, डाक अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना