शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आत्मा योजनेतील दुग्ध व्यवसायातून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न

By admin | Updated: March 2, 2015 02:11 IST

शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्ग साथ देईलच याची खात्री नाही. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे.

यवतमाळ : शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्ग साथ देईलच याची खात्री नाही. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे. त्यातच दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय निवडल्यास उत्पन्नाचे एक शाश्वत साधन निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशाच जोडधंद्याची निवड केल्याने झरी जामणी तालुक्यातील बंदी वाढोणा येथील सोनबा दमडू टेकाम याला शास्वत उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे. सोनबा दमडू टेकाम या शेतकऱ्याकडे कोरडवाहू तीन हेक्टर इतकी जमीन आहे. या जमिनीत ते खरीप हंगामात कापूस, तूर, ज्वारी यासारखी पीके घ्यायचे. यातून त्यांना ६० ते ६५ हजाराचे उत्पन्न मिळायचे. या कमी उत्पन्नात त्यांना आपले कुटुंब चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी शेतीस पूरक जोडधंदा सुरु करण्याचे ठरविले होते. त्यातुनच त्यांनी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शाश्वत शेती प्रकल्पाची माहिती घेतली व दुग्धव्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.दुग्ध व्यवसायाची पुरेपुर माहिती नसल्याने राज्य कृषी विस्तार कार्यक्रम अर्थात आत्मा अंतर्गत अभ्यासदौरा व प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायास सुरुवात केली. प्रशिक्षणात पोषक आहार कोरडा चारा जसे ज्वारी, मका, गतवर्षीय पिकांची कुटी, सोयाबीन व तुर पिकाचे कुटार यापासून जनावरांसाठी पोषक आहार तयार करणे तसेच गायींच्या गोठ्याचे व्यवस्थापन व गायींच्या पाणी व आहाराच्या बाबींची शास्त्रोक्त माहिती झाली. प्रशिक्षणानंतर योजनेतून अनुदानावर दोन संकरीत गाई त्यांनी खरेदी केल्या. या दोन गायींपासून त्यांना सकाळी १० व संध्याकाळी १० असे २० लिटर दुधाचे उत्पादन सुरु झाले. बाजारात प्रति लिटर २० रुपये याप्रमाणे दर मिळत असल्याने मासिक मिळकत १२ हजार व खर्च दोन हजार रुपये जाता निव्वळ मासिक नफा १० हजार रुपये इतका शिल्लक राहत आहे. आत्माचे प्रशिक्षण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदानावर मिळालेल्या संकरीत गायीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होवू शकलो, असे शेतकरी सोनबा दमडू टेकाम यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)